शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात म्हाडा देणार २५००पेक्षा अधिक घरे : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 10:57 IST

कोकण म्हाडाकडून जिल्ह्याच्या विविध भागात असलेल्या जागांमध्ये अडीच हजारपेक्षा अधिक घरे उभारून त्याची सोडत (लॉटरी) काढली जाणार आहे. यामध्ये पंतप्रधान आवास योजनेतील व म्हाडाच्या योजनेतील घरांचा समावेश राहणार असल्याची माहिती

ठळक मुद्दे, रत्नागिरी  जिल्ह्यच्या विविध भागात म्हाडाची जागापंतप्रधान आवास योजनेतील व म्हाडाच्या योजनेतील घरांचा समावेश

रत्नागिरी : कोकण म्हाडाकडून जिल्ह्याच्या विविध भागात असलेल्या जागांमध्ये अडीच हजारपेक्षा अधिक घरे उभारून त्याची सोडत (लॉटरी) काढली जाणार आहे. यामध्ये पंतप्रधान आवास योजनेतील व म्हाडाच्या योजनेतील घरांचा समावेश राहणार असल्याची माहिती महाराष्ट गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी गुरूवारी येथे दिली. 

रत्नागिरी जिल्हा दौºयात म्हाडाच्या जागा व पूर्ण झालेल्या प्रकल्पांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सामंत पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्यासमवेत कोकण म्हाडाचे मुख्याधिकारी विजय लहाने उपस्थित होते. सामंत म्हणाले, जिल्ह्यात म्हाडाच्या घरांची अनेकांना आवश्यकता आहे. राज्यातही पंतप्रधान आवास योजनेची कार्यवाही सुरू असताना त्यामध्ये रत्नागिरी, वाशिम व नंदूरबार जिल्ह्यात त्या योजनेतून एकही घर लाभार्थींना देण्यात आलेले नाही. त्यामुळे म्हाडा राबवित असलेल्या नवीन प्रकल्पांमध्ये पंतप्रधान आवाससाठीची घरे व म्हाडाच्या योजनेतील घरांचा समावेश राहणार आहे. 

चिपळूणमधील म्हाडाच्या मालकीच्या ११ एकर जागेतील घरांचा प्रकल्प १९८८ पासून प्रलंबित होता. या प्रकल्पाची पाहणी करून यातील ४० टक्के जागा मूळ मालकांना घरे उभारण्यासाठी भाडेपट्टातत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या जागेवर मूळ मालकांनी आपली घरे उभारावयाची आहेत. या ४० टक्के जागेतील काही जागा महामार्ग चौपदरीकरणात गेली आहे. त्याची जी नुकसानभरपाई असेल ती मूळ जागा मालकांच्या सोसायटीला दिली जाईल. या जागेतील ६० टक्के जागेवर म्हाडाकडून तीन टप्प्यात एकूण १५०० घरे उभारली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात यातील ५०० घरे उभारली जाणार असून, त्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होईल. त्यामध्ये २५० घरे म्हाडा योजनेतून, तर २५० घरे ही पंतप्रधान आवास योजनेतून लॉटरी पध्दतीने दिली जाणार आहेत. 

उदय सामंत म्हणाले -- पंतप्रधान आवास योजनेचे २०२२पर्यंतचे जिल्ह्याचे उद्दिष्ट१००६१ घरांचे आहे. मात्र, जिल्ह्यात या योजनेतून एकही घर लाभार्थीला मिळालेले नाही. म्हाडाच्या मार्फत या योजनेतील १९०० घरे जिल्ह्यात होऊ शकतील. - नाचणे येथील ५ एकर जागा राज्य सरकारने शासकीय कर्मचारी वसाहतीसाठी दिली होती. त्या जागेत शासकीय कर्मचाºयांसाठी ३०० व जनतेसाठी ३०० अशी ६०० घरे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. - टीआरपीजवळ अतुलित बलधामजवळ ही जागा असून, त्याबाबतच्या प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. रत्नागिरीच्या झोपडपट्टीतील सुमारे ८०० घरांचे सर्वेक्षण करून तेथे म्हाडाची घरे उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास रत्नागिरी नगर परिषदेला सांगितले आहे.  

टॅग्स :PMRDAपीएमआरडीएRatnagiriरत्नागिरी