शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

रत्नागिरी : सागरी मार्ग दुपदरीकरण आराखडाही रडतखडत, महामार्ग केंद्र सरकारकडे, रेवस-आरोंदा अंतर ५७० किलोमीटरचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 17:02 IST

रायगड जिल्ह्यातील रेवस येथून सुरू होऊन रत्नागिरीच्या सागरी किनाऱ्यावरून थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आरोंदापर्यंत जाणाऱ्या ५७० किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्गाचे काम अद्यापही रखडले आहे.

ठळक मुद्देरेवस-आरोंदा अंतर ५७० किलोमीटरचेसागरी मार्ग दुपदरीकरण आराखडाही रडतखडतरत्नागिरी जिल्ह्यात १८ पूल उभारले जाणारसिंधुदुर्ग जिल्ह्यात १० पूल उभारले जाणार

रत्नागिरी : रायगड जिल्ह्यातील रेवस येथून सुरू होऊन रत्नागिरीच्या सागरी किनाऱ्यावरून थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आरोंदापर्यंत जाणाऱ्या ५७० किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्गाचे काम अद्यापही रखडले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महामार्गाचे काम सुरू आहे. त्यानंतर नव्याने या मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी महामार्ग विकास आराखडा बनविण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू आहे. वर्षभराचा कालावधी उलटूनही याबाबतचा विकास आराखडा तयार झालेला नसल्याने हे काम रखडले आहे.सागरातून बंदराबंदरांमध्ये होणारी जलवाहतूक बंद झाल्यानंतर किनारपट्टी भागातील विकासाच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे. त्यामुळे सागरी भागातून महामार्गाची संकल्पना पुढे आली. मात्र, गेल्या १५ वर्षांच्या काळातही हा सागरी महामार्ग पूर्ण होऊ शकला नाही.

राज्य शासनाकडे त्यासाठी निधी नसल्याने हे काम रखडले, असे सांगितले जात आहे. आता हा सागरी महामार्ग केंद्र शासनाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला.

या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देतानाच ५७० किलोमीटरच्या या रस्त्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोकणातील या मार्गाला महामार्गाचा दर्जा दिला आहे. तसेच १० हजार कोटी रुपयांची तरतूदही या कामासाठी करण्यात आली आहे.

या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यामुळे रस्ता रुंदीकरण आवश्यक ठरले आहे. त्यामुळेच रस्त्याची नव्याने उभारणी व रुंदीकरणासाठी महामार्ग विभागातर्फे या रस्त्याचा विकास आराखडा (डीपीआर) बनविण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे.

विकास आराखडा बनविण्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी व सिंंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सागरी महामार्ग हा किनारपट्टी भागासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. किनारपट्टी भागातील पर्यटन विस्तारही मोठ्या प्रमाणात होत असून, महामार्ग रुंदीकरणानंतर पर्यटनाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.रत्नागिरी जिल्ह्यात १८ पूल उभारले जाणारकोकणच्या सागरी भागाच्या विकासासाठी वरदान ठरणाऱ्या ५७० किलोमीटर लांबीच्या महामार्गावर रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ४१ पूल उभारले जाणार आहेत. या मार्गावर एकूण ८२ पूल उभारावे लागणार आहेत. त्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० पूल, तर रत्नागिरी जिल्ह्यात १८ पूल उभारले जाणार आहेत. ठाणे विभागातही १३ पूल उभारले जाणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणेच सागरी महामार्ग विकासाला हातभार लावणारा ठरणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग