शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

रत्नागिरी : मराठा समिती तिसरी आघाडी स्थापणार, दिवाळीदिवशी नवीन पक्षाचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 17:09 IST

मराठा समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आश्वासने देऊन झुलवत ठेवले. समाजाचं अस्तित्व उभे करण्यासाठी तसेच मराठ्यांना भविष्यात नेतृत्व मिळवून देण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. अन्य समाजांना एकत्र घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

ठळक मुद्देमराठा समिती तिसरी आघाडी स्थापणारदिवाळीदिवशी नवीन पक्षाचा झेंडा

रत्नागिरी : मराठा समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आश्वासने देऊन झुलवत ठेवले. समाजाचं अस्तित्व उभे करण्यासाठी तसेच मराठ्यांना भविष्यात नेतृत्व मिळवून देण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. अन्य समाजांना एकत्र घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.दिवाळी पाडव्यादिवशी नवीन पक्षाचे नाव श्री रायरेश्वर मंदिरात झेंडा लावून घोषित करणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष राज्य समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.शासनाने फसवणूक केल्यामुळेच ठोक आंदोलन सुरू झाले. ३६ मराठ्यांनी आत्महत्या केली. विविध पक्षांनी मराठा समाजाची चेष्टा केली आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी आता मतदार बँक तयार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आतापर्यंत सरकारने समाजाला गृहीत धरून प्रश्न सोडविलेले नाहीत. समाजाचा विकास करण्यासाठी, प्रश्न सोडविण्यासाठी स्वराज्य निर्माण करण्यासाठी विचार विनियम सुरू असतानाच सोशल मीडियावरून तसेच विविध सर्वेक्षणताून स्वतंत्र पक्षाची मागणी पुढे आली.कोल्हापूर, कणवकलीतही यासाठी चांगला प्रतिसाद लाभला. नवीन पक्षाच्या स्थापनेसाठी अकरा कोअर कमिटी व पाच हजार मराठा बांधव रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेणार असून, पाडव्याला पक्षाचे नाव घोषित करण्यात येणार आहे. याबाबत दि. २८ रोजी ठाणे, २९ रोजी कल्याण, दि. ३० रोजी मुंबईत मेळावा आयोजित केला आहे.

मराठा बांधव समाजासाठी कोणत्याही पक्षाची उमेदवारी न घेता समाजासाठी प्रामाणिक राहणार आहे. मुस्लिम, धनगर, लिंगायत समाजातील नाराज मंडळी भेट घेत असून, वेळ पडल्यास त्यांनाही सोबत घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्यात येणार आहे. एकदाच परंतु जातीसाठी मतदान करा, असे आवाहन पाटील यांनी केले.फायदा मिळाला नाहीजोपर्यंत कोर्टातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ओबीसी धर्तीवर शिक्षणात ५० टक्के सवलत, अण्णासाहेब साठे आर्थिक विकास महामंडळातर्फे बिनव्याजी दहा लाख रूपये कर्ज, वसतिगृह अशा सात सवलतींचे अध्यादेश काढल्याचे घोषित केले. परंतु त्याचा फायदा झालेला नाही, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाRatnagiriरत्नागिरी