शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : मराठा समिती तिसरी आघाडी स्थापणार, दिवाळीदिवशी नवीन पक्षाचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 17:09 IST

मराठा समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आश्वासने देऊन झुलवत ठेवले. समाजाचं अस्तित्व उभे करण्यासाठी तसेच मराठ्यांना भविष्यात नेतृत्व मिळवून देण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. अन्य समाजांना एकत्र घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

ठळक मुद्देमराठा समिती तिसरी आघाडी स्थापणारदिवाळीदिवशी नवीन पक्षाचा झेंडा

रत्नागिरी : मराठा समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आश्वासने देऊन झुलवत ठेवले. समाजाचं अस्तित्व उभे करण्यासाठी तसेच मराठ्यांना भविष्यात नेतृत्व मिळवून देण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. अन्य समाजांना एकत्र घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.दिवाळी पाडव्यादिवशी नवीन पक्षाचे नाव श्री रायरेश्वर मंदिरात झेंडा लावून घोषित करणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष राज्य समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.शासनाने फसवणूक केल्यामुळेच ठोक आंदोलन सुरू झाले. ३६ मराठ्यांनी आत्महत्या केली. विविध पक्षांनी मराठा समाजाची चेष्टा केली आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी आता मतदार बँक तयार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आतापर्यंत सरकारने समाजाला गृहीत धरून प्रश्न सोडविलेले नाहीत. समाजाचा विकास करण्यासाठी, प्रश्न सोडविण्यासाठी स्वराज्य निर्माण करण्यासाठी विचार विनियम सुरू असतानाच सोशल मीडियावरून तसेच विविध सर्वेक्षणताून स्वतंत्र पक्षाची मागणी पुढे आली.कोल्हापूर, कणवकलीतही यासाठी चांगला प्रतिसाद लाभला. नवीन पक्षाच्या स्थापनेसाठी अकरा कोअर कमिटी व पाच हजार मराठा बांधव रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेणार असून, पाडव्याला पक्षाचे नाव घोषित करण्यात येणार आहे. याबाबत दि. २८ रोजी ठाणे, २९ रोजी कल्याण, दि. ३० रोजी मुंबईत मेळावा आयोजित केला आहे.

मराठा बांधव समाजासाठी कोणत्याही पक्षाची उमेदवारी न घेता समाजासाठी प्रामाणिक राहणार आहे. मुस्लिम, धनगर, लिंगायत समाजातील नाराज मंडळी भेट घेत असून, वेळ पडल्यास त्यांनाही सोबत घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्यात येणार आहे. एकदाच परंतु जातीसाठी मतदान करा, असे आवाहन पाटील यांनी केले.फायदा मिळाला नाहीजोपर्यंत कोर्टातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ओबीसी धर्तीवर शिक्षणात ५० टक्के सवलत, अण्णासाहेब साठे आर्थिक विकास महामंडळातर्फे बिनव्याजी दहा लाख रूपये कर्ज, वसतिगृह अशा सात सवलतींचे अध्यादेश काढल्याचे घोषित केले. परंतु त्याचा फायदा झालेला नाही, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाRatnagiriरत्नागिरी