शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

रत्नागिरी : मराठा समिती तिसरी आघाडी स्थापणार, दिवाळीदिवशी नवीन पक्षाचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 17:09 IST

मराठा समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आश्वासने देऊन झुलवत ठेवले. समाजाचं अस्तित्व उभे करण्यासाठी तसेच मराठ्यांना भविष्यात नेतृत्व मिळवून देण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. अन्य समाजांना एकत्र घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

ठळक मुद्देमराठा समिती तिसरी आघाडी स्थापणारदिवाळीदिवशी नवीन पक्षाचा झेंडा

रत्नागिरी : मराठा समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आश्वासने देऊन झुलवत ठेवले. समाजाचं अस्तित्व उभे करण्यासाठी तसेच मराठ्यांना भविष्यात नेतृत्व मिळवून देण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. अन्य समाजांना एकत्र घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.दिवाळी पाडव्यादिवशी नवीन पक्षाचे नाव श्री रायरेश्वर मंदिरात झेंडा लावून घोषित करणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष राज्य समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.शासनाने फसवणूक केल्यामुळेच ठोक आंदोलन सुरू झाले. ३६ मराठ्यांनी आत्महत्या केली. विविध पक्षांनी मराठा समाजाची चेष्टा केली आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी आता मतदार बँक तयार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आतापर्यंत सरकारने समाजाला गृहीत धरून प्रश्न सोडविलेले नाहीत. समाजाचा विकास करण्यासाठी, प्रश्न सोडविण्यासाठी स्वराज्य निर्माण करण्यासाठी विचार विनियम सुरू असतानाच सोशल मीडियावरून तसेच विविध सर्वेक्षणताून स्वतंत्र पक्षाची मागणी पुढे आली.कोल्हापूर, कणवकलीतही यासाठी चांगला प्रतिसाद लाभला. नवीन पक्षाच्या स्थापनेसाठी अकरा कोअर कमिटी व पाच हजार मराठा बांधव रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेणार असून, पाडव्याला पक्षाचे नाव घोषित करण्यात येणार आहे. याबाबत दि. २८ रोजी ठाणे, २९ रोजी कल्याण, दि. ३० रोजी मुंबईत मेळावा आयोजित केला आहे.

मराठा बांधव समाजासाठी कोणत्याही पक्षाची उमेदवारी न घेता समाजासाठी प्रामाणिक राहणार आहे. मुस्लिम, धनगर, लिंगायत समाजातील नाराज मंडळी भेट घेत असून, वेळ पडल्यास त्यांनाही सोबत घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्यात येणार आहे. एकदाच परंतु जातीसाठी मतदान करा, असे आवाहन पाटील यांनी केले.फायदा मिळाला नाहीजोपर्यंत कोर्टातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ओबीसी धर्तीवर शिक्षणात ५० टक्के सवलत, अण्णासाहेब साठे आर्थिक विकास महामंडळातर्फे बिनव्याजी दहा लाख रूपये कर्ज, वसतिगृह अशा सात सवलतींचे अध्यादेश काढल्याचे घोषित केले. परंतु त्याचा फायदा झालेला नाही, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाRatnagiriरत्नागिरी