शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : प्रत्येक तालुक्यात आंबा महोत्सव,  कृषी उत्पन्न बाजार समिती,  पणन मंडळानेही घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 16:03 IST

रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रत्येक तालुक्यात महामार्गालगत आंबा विक्रीसाठी शेड उभारून तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आंबा महोत्सव भरविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य पणन मंडळानेदेखील त्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे.

ठळक मुद्दे- आंबा, काजूप्रमाणे आता सुपारीचाही समावेश पीक कर्जामध्ये होणार- शासनाने सुपारी पीक कर्जाला मान्यता दिली असून, लवकरच अधिकृत घोषणाही होणार आहे.- शेतकरी ते ग्राहक थेट आंबा विक्रीसाठी प्रयत्न.- मंडणगड, दापोली, खेड, सावर्डे, लांजा, रत्नागिरी येथे आंबा विक्रीसाठी स्टॉल उभारणार.

रत्नागिरी : रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रत्येक तालुक्यात महामार्गालगत आंबा विक्रीसाठी शेड उभारून तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आंबा महोत्सव भरविण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य पणन मंडळानेदेखील त्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या आंब्याची विक्री शेतकऱ्याला स्वत:च करता येणार आहे. यापुढे उत्पादक ते ग्राहक अशी संकल्पना राबविण्याचा बाजार समितीचा संकल्प आहे.रत्नागिरी हापूसला ग्राहकांकडून चांगली मागणी होत असतानाच त्याच दरम्यान कर्नाटकचा हापूस आंबा बाजारात येतो. व्यापारीवर्ग मात्र ग्राहकांची दिशाभूल करून रत्नागिरी हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री करतो.

कमी किंमतीत कर्नाटक हापूस खरेदी करून तो चढ्या दराने रत्नागिरी हापूस म्हणून विक्री केला जातो. यामध्ये व्यापाऱ्यांचा फायदा होतो व गरीब शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होते. हे टाळण्यासाठी बाजार समितीने तालुकापातळीवर आंबा महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी, सचिव किरण महाजन, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील, सहाय्यक उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी हे जिल्हाभर दौरा करून शेतकऱ्यांना याबाबत माहिती देत आहेत.

बाजार समितीच्या आवारात आंबा लिलाव शेड बांधण्यात आली असून, यावर्षी आंबा पिकाच्या हंगामात परिसरातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे माल विक्रीची संधी उपलब्ध होणार आहे.

यासाठी शेतकऱ्यांकडील आंब्याच्या थेट खरेदीसाठी मुंबई, पुणे येथील व्यापाऱ्यांना रत्नागिरीत बोलावण्यात येणार असून, याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला स्वत: दर ठरवून विक्री करण्याची संधी प्राप्त होणार आहे.काजू पीक तारणशेतकऱ्यांना काजू बीसाठी ७५ टक्के किंवा ८० रूपये किलोप्रमाणे ६ टक्के व्याजाने पीक तारण कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज शेतकऱ्यांनी १८० दिवसात फेडावयाचे आहे.

विविध कार्यकारी सोसायटी किंवा बाजार समितीने नियोजन केलेल्या गोडावूनमध्ये काजू पीक तारण म्हणून ठेवायचे आहे. चांगला दर काजूला मिळाल्यावर त्याची विक्री करू न हे कर्ज फेडता येणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीagricultureशेती