शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : प्रत्येक तालुक्यात आंबा महोत्सव,  कृषी उत्पन्न बाजार समिती,  पणन मंडळानेही घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 16:03 IST

रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रत्येक तालुक्यात महामार्गालगत आंबा विक्रीसाठी शेड उभारून तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आंबा महोत्सव भरविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य पणन मंडळानेदेखील त्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे.

ठळक मुद्दे- आंबा, काजूप्रमाणे आता सुपारीचाही समावेश पीक कर्जामध्ये होणार- शासनाने सुपारी पीक कर्जाला मान्यता दिली असून, लवकरच अधिकृत घोषणाही होणार आहे.- शेतकरी ते ग्राहक थेट आंबा विक्रीसाठी प्रयत्न.- मंडणगड, दापोली, खेड, सावर्डे, लांजा, रत्नागिरी येथे आंबा विक्रीसाठी स्टॉल उभारणार.

रत्नागिरी : रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रत्येक तालुक्यात महामार्गालगत आंबा विक्रीसाठी शेड उभारून तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आंबा महोत्सव भरविण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य पणन मंडळानेदेखील त्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या आंब्याची विक्री शेतकऱ्याला स्वत:च करता येणार आहे. यापुढे उत्पादक ते ग्राहक अशी संकल्पना राबविण्याचा बाजार समितीचा संकल्प आहे.रत्नागिरी हापूसला ग्राहकांकडून चांगली मागणी होत असतानाच त्याच दरम्यान कर्नाटकचा हापूस आंबा बाजारात येतो. व्यापारीवर्ग मात्र ग्राहकांची दिशाभूल करून रत्नागिरी हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री करतो.

कमी किंमतीत कर्नाटक हापूस खरेदी करून तो चढ्या दराने रत्नागिरी हापूस म्हणून विक्री केला जातो. यामध्ये व्यापाऱ्यांचा फायदा होतो व गरीब शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होते. हे टाळण्यासाठी बाजार समितीने तालुकापातळीवर आंबा महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी, सचिव किरण महाजन, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील, सहाय्यक उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी हे जिल्हाभर दौरा करून शेतकऱ्यांना याबाबत माहिती देत आहेत.

बाजार समितीच्या आवारात आंबा लिलाव शेड बांधण्यात आली असून, यावर्षी आंबा पिकाच्या हंगामात परिसरातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे माल विक्रीची संधी उपलब्ध होणार आहे.

यासाठी शेतकऱ्यांकडील आंब्याच्या थेट खरेदीसाठी मुंबई, पुणे येथील व्यापाऱ्यांना रत्नागिरीत बोलावण्यात येणार असून, याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला स्वत: दर ठरवून विक्री करण्याची संधी प्राप्त होणार आहे.काजू पीक तारणशेतकऱ्यांना काजू बीसाठी ७५ टक्के किंवा ८० रूपये किलोप्रमाणे ६ टक्के व्याजाने पीक तारण कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज शेतकऱ्यांनी १८० दिवसात फेडावयाचे आहे.

विविध कार्यकारी सोसायटी किंवा बाजार समितीने नियोजन केलेल्या गोडावूनमध्ये काजू पीक तारण म्हणून ठेवायचे आहे. चांगला दर काजूला मिळाल्यावर त्याची विक्री करू न हे कर्ज फेडता येणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीagricultureशेती