शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

रत्नागिरी : मनविसेनेचा महाराष्ट्र सैनिक मेळावा, अडचणीच्या काळात साथ देणारे खरे निष्ठावंत : वैभव खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 14:18 IST

सुमारे दहा वर्षांच्या कालखंडात अनेकजण आले, अनेकजण सोडून गेले. पण अडचणीच्या काळात ज्यांनी साथ दिली ते खरे निष्ठावंत! कोणताही पक्ष कधी संपत नसतो, मनसेलादेखील अच्छे दिन येतील, मात्र, थोडा संयम ठेवा, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा महाराष्ट्र सैनिक मेळावा मेळाव्यात २०० विद्यार्थ्यांनी केला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश

रत्नागिरी : सुमारे दहा वर्षांच्या कालखंडात अनेकजण आले, अनेकजण सोडून गेले. पण अडचणीच्या काळात ज्यांनी साथ दिली ते खरे निष्ठावंत! कोणताही पक्ष कधी संपत नसतो, मनसेलादेखील अच्छे दिन येतील, मात्र, थोडा संयम ठेवा, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले.रत्नागिरीतील जे. के. फाईल येथील साईमंगल कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा महाराष्ट्र सैनिक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी मनविसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नीलेश सावंत, मुंबई विद्यापीठ माजी सिनेट सदस्य गणेश चव्हाण, दक्षिण रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख अमोल साळुंखे, जितेंद्र चव्हाण, सुनील साळवी, छोटू खामकर, सिद्धेश धुळप, गुरूप्रसाद चव्हाण उपस्थित होते.वैभव खेडेकर यांच्या हस्ते शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. व्यासपीठावरील उपस्थितांना रोपटे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खेडेकर म्हणाले की, मी घडलो तो विद्यार्थी सेनेतूनच घडलो. तुमचासारखा सामान्य कुटुंबातील होतो. माझ्या मागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. माझ्या घरात कोणताही ग्रामपंचायत सदस्य नव्हता. आपल्यासारख्या प्रामाणिक युवकांना घेऊन मी सामाजिक कार्याला सुरूवात केली. विद्यार्थी सेनेत काम करताना कोणतेही कार्यक्षेत्र नसते, असे ते म्हणाले.पक्षाच्या हिताचे कोणतेही प्रश्न घेऊन आपण आंदोलन छेडले तर ते पक्षाच्या ध्येय धोरणातील एक प्रकार असेल. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच आपल्या जीवनात समाजकारणाची सुरूवात होते. यावेळी अनेक राजकीय पक्षांशी संबंध येतो. याच काळात आपल्यातील नेतृत्व घडवण्याची सुरुवात विद्यार्थी सेनेतून होते. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यात विद्यार्थी सेना महत्त्वाची भूमिका बजावते, असे वैभव खेडेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिपीन शिंदे यांनी केले.अनेकांचा प्रवेशमहाराष्ट्र नवनिर्माण सेना मजबूत करण्यासाठी विद्यार्थी सेनेपासूनच सुरूवात करण्यात येत आहे. त्यामुळे या मेळाव्यात सुमारे २०० विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश केला. आयटीआय, गोगटे - जोगळेकर महाविद्यालय, लोकनेते श्यामरावजी पेजे महाविद्यालय, शिवारआंबेरे आणि नवनिर्माण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मनविसेत प्रवेश केला. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMNSमनसे