शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : मनविसेनेचा महाराष्ट्र सैनिक मेळावा, अडचणीच्या काळात साथ देणारे खरे निष्ठावंत : वैभव खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 14:18 IST

सुमारे दहा वर्षांच्या कालखंडात अनेकजण आले, अनेकजण सोडून गेले. पण अडचणीच्या काळात ज्यांनी साथ दिली ते खरे निष्ठावंत! कोणताही पक्ष कधी संपत नसतो, मनसेलादेखील अच्छे दिन येतील, मात्र, थोडा संयम ठेवा, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा महाराष्ट्र सैनिक मेळावा मेळाव्यात २०० विद्यार्थ्यांनी केला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश

रत्नागिरी : सुमारे दहा वर्षांच्या कालखंडात अनेकजण आले, अनेकजण सोडून गेले. पण अडचणीच्या काळात ज्यांनी साथ दिली ते खरे निष्ठावंत! कोणताही पक्ष कधी संपत नसतो, मनसेलादेखील अच्छे दिन येतील, मात्र, थोडा संयम ठेवा, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले.रत्नागिरीतील जे. के. फाईल येथील साईमंगल कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा महाराष्ट्र सैनिक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी मनविसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नीलेश सावंत, मुंबई विद्यापीठ माजी सिनेट सदस्य गणेश चव्हाण, दक्षिण रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख अमोल साळुंखे, जितेंद्र चव्हाण, सुनील साळवी, छोटू खामकर, सिद्धेश धुळप, गुरूप्रसाद चव्हाण उपस्थित होते.वैभव खेडेकर यांच्या हस्ते शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. व्यासपीठावरील उपस्थितांना रोपटे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खेडेकर म्हणाले की, मी घडलो तो विद्यार्थी सेनेतूनच घडलो. तुमचासारखा सामान्य कुटुंबातील होतो. माझ्या मागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. माझ्या घरात कोणताही ग्रामपंचायत सदस्य नव्हता. आपल्यासारख्या प्रामाणिक युवकांना घेऊन मी सामाजिक कार्याला सुरूवात केली. विद्यार्थी सेनेत काम करताना कोणतेही कार्यक्षेत्र नसते, असे ते म्हणाले.पक्षाच्या हिताचे कोणतेही प्रश्न घेऊन आपण आंदोलन छेडले तर ते पक्षाच्या ध्येय धोरणातील एक प्रकार असेल. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच आपल्या जीवनात समाजकारणाची सुरूवात होते. यावेळी अनेक राजकीय पक्षांशी संबंध येतो. याच काळात आपल्यातील नेतृत्व घडवण्याची सुरुवात विद्यार्थी सेनेतून होते. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यात विद्यार्थी सेना महत्त्वाची भूमिका बजावते, असे वैभव खेडेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिपीन शिंदे यांनी केले.अनेकांचा प्रवेशमहाराष्ट्र नवनिर्माण सेना मजबूत करण्यासाठी विद्यार्थी सेनेपासूनच सुरूवात करण्यात येत आहे. त्यामुळे या मेळाव्यात सुमारे २०० विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश केला. आयटीआय, गोगटे - जोगळेकर महाविद्यालय, लोकनेते श्यामरावजी पेजे महाविद्यालय, शिवारआंबेरे आणि नवनिर्माण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मनविसेत प्रवेश केला. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMNSमनसे