शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी - कोल्हापूर महामार्ग खड्ड्यात, बांधकाम खाते अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 14:42 IST

road, ratnagiri, kolhapur, sefty, highway कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा प्रमुख महामार्ग म्हणून राष्ट्रीय महामार्ग १६६कडे पाहिले जाते. कोल्हापूरहून कोकणात होणारी बहुतांश वाहतूक रत्नागिरी - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग १६६ वरून होते. २४ तास सुरू असणारा हा महामार्ग अक्षरशः खड्ड्यात गेला आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर या संपूर्ण महामार्गाची दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्दे रत्नागिरी - कोल्हापूर महामार्ग खड्ड्यात

सागर पाटीलटेंभ्ये : कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा प्रमुख महामार्ग म्हणून राष्ट्रीय महामार्ग १६६कडे पाहिले जाते. कोल्हापूरहून कोकणात होणारी बहुतांश वाहतूक रत्नागिरी - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग १६६ वरून होते. २४ तास सुरू असणारा हा महामार्ग अक्षरशः खड्ड्यात गेला आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर या संपूर्ण महामार्गाची दुरवस्था झाली आहे.१३१ किलोमीटरच्या प्रवासात प्रवाशांना जवळपास हजार खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो. काही खड्डे १५ ते २० सेंटीमीटर खोल गेले आहेत. या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणे जोखमीचे बनले आहे. याचा सर्वाधिक प्रतिकूल परिणाम अत्यवस्थ रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्ण वाहिकांना बसत आहे.

अशा परिस्थितीतही बांधकाम खाते खड्डे भरण्याची तसदी घेताना दिसत नाही. शासन व प्रशासन यापैकी कोणालाही या महामार्गाच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने प्रवासी व स्थानिक ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.रत्नागिरी - कोल्हापूर - सोलापूर हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग १६६ म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या राष्ट्रीय महामार्गावर काही मूलभूत समस्या जाणवत आहेत. सातत्याने होणारे अपघात लक्षात घेता हा महामार्ग अपघातांचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जात आहे.

या समस्या दूर करण्यासाठी शासन व्यवस्था अथवा बांधकाम खाते यापैकी कोणीही विशेष प्रयत्न करत नसल्याचे या महामार्गावरील स्थानिक लोकांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.

यावर्षी कोविड आजाराच्या प्रादुर्भावामुळे जवळपास मार्च महिन्यापासून आजपर्यंत या महामार्गावरून पूर्ण क्षमतेने वाहतूक चालू असल्याचे पाहायला मिळत नाही. असे असताना पाली ते मलकापूर या अंतरात अनेक खड्डे पडले आहेत. आंबा ते मलकापूर या दरम्यानही अनेक खड्डे आहेत. खड्डे हे बहुतांश वळणावर पडले असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे.वळणावर खड्डेकोल्हापूर - सांगली व उर्वरित पश्चिम महाराष्ट्रासह बेळगाव येथून रत्नागिरी व विशिष्ट कोकणात होणारी बहुतांश वाहतूक या राष्ट्रीय महामार्गावरून होते. हा महामार्ग चोवीस तास सुरू असतो. या महामार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते.अपघाताला आमंत्रककोकणात व विशेषत: रत्नागिरीमध्ये पर्यटन व देवदर्शनासाठी जाणारे प्रवासी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या महामार्गावर सातत्याने गर्दी असते. वाहतूक व अपघाताचे प्रमाण लक्षात घेता महामार्गाचे चौपदरीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरीpwdसार्वजनिक बांधकाम विभाग