शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

रत्नागिरी - कोल्हापूर महामार्ग खड्ड्यात, बांधकाम खाते अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 14:42 IST

road, ratnagiri, kolhapur, sefty, highway कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा प्रमुख महामार्ग म्हणून राष्ट्रीय महामार्ग १६६कडे पाहिले जाते. कोल्हापूरहून कोकणात होणारी बहुतांश वाहतूक रत्नागिरी - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग १६६ वरून होते. २४ तास सुरू असणारा हा महामार्ग अक्षरशः खड्ड्यात गेला आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर या संपूर्ण महामार्गाची दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्दे रत्नागिरी - कोल्हापूर महामार्ग खड्ड्यात

सागर पाटीलटेंभ्ये : कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा प्रमुख महामार्ग म्हणून राष्ट्रीय महामार्ग १६६कडे पाहिले जाते. कोल्हापूरहून कोकणात होणारी बहुतांश वाहतूक रत्नागिरी - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग १६६ वरून होते. २४ तास सुरू असणारा हा महामार्ग अक्षरशः खड्ड्यात गेला आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर या संपूर्ण महामार्गाची दुरवस्था झाली आहे.१३१ किलोमीटरच्या प्रवासात प्रवाशांना जवळपास हजार खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो. काही खड्डे १५ ते २० सेंटीमीटर खोल गेले आहेत. या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणे जोखमीचे बनले आहे. याचा सर्वाधिक प्रतिकूल परिणाम अत्यवस्थ रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्ण वाहिकांना बसत आहे.

अशा परिस्थितीतही बांधकाम खाते खड्डे भरण्याची तसदी घेताना दिसत नाही. शासन व प्रशासन यापैकी कोणालाही या महामार्गाच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने प्रवासी व स्थानिक ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.रत्नागिरी - कोल्हापूर - सोलापूर हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग १६६ म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या राष्ट्रीय महामार्गावर काही मूलभूत समस्या जाणवत आहेत. सातत्याने होणारे अपघात लक्षात घेता हा महामार्ग अपघातांचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जात आहे.

या समस्या दूर करण्यासाठी शासन व्यवस्था अथवा बांधकाम खाते यापैकी कोणीही विशेष प्रयत्न करत नसल्याचे या महामार्गावरील स्थानिक लोकांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.

यावर्षी कोविड आजाराच्या प्रादुर्भावामुळे जवळपास मार्च महिन्यापासून आजपर्यंत या महामार्गावरून पूर्ण क्षमतेने वाहतूक चालू असल्याचे पाहायला मिळत नाही. असे असताना पाली ते मलकापूर या अंतरात अनेक खड्डे पडले आहेत. आंबा ते मलकापूर या दरम्यानही अनेक खड्डे आहेत. खड्डे हे बहुतांश वळणावर पडले असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे.वळणावर खड्डेकोल्हापूर - सांगली व उर्वरित पश्चिम महाराष्ट्रासह बेळगाव येथून रत्नागिरी व विशिष्ट कोकणात होणारी बहुतांश वाहतूक या राष्ट्रीय महामार्गावरून होते. हा महामार्ग चोवीस तास सुरू असतो. या महामार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते.अपघाताला आमंत्रककोकणात व विशेषत: रत्नागिरीमध्ये पर्यटन व देवदर्शनासाठी जाणारे प्रवासी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या महामार्गावर सातत्याने गर्दी असते. वाहतूक व अपघाताचे प्रमाण लक्षात घेता महामार्गाचे चौपदरीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरीpwdसार्वजनिक बांधकाम विभाग