शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील तिडेतील कलिंगड शेती संकटात, शेतकरी चांगलेच अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 14:29 IST

तिडे-आदिवासीवाडी येथे आदिवासी समाजातील बांधवांकडून केली जाणारी कलिगंडाच्या पिकांची समूहशेती यंदाच्या हंगामात विविध कारणांनी अडचणीत आली आहे. गेल्या आठ वर्षांपासून तिडे आदिवासीवाडी येथील आदिवासी समाजातील ४२ कुटुंबे भारजा नदीतील पाण्याचा वापर करुन कलिगंडाची शेती करत आहेत.

ठळक मुद्देमंडणगड तालुक्यातील तिडेतील कलिंगड शेती संकटातदहा टन कलिंगडाचा माल शिल्लक, शेतकरी अडचणीत

मंडणगड : तिडे-आदिवासीवाडी येथे आदिवासी समाजातील बांधवांकडून केली जाणारी कलिगंडाच्या पिकांची समूहशेती यंदाच्या हंगामात विविध कारणांनी अडचणीत आली आहे. गेल्या आठ वर्षांपासून तिडे आदिवासीवाडी येथील आदिवासी समाजातील ४२ कुटुंबे भारजा नदीतील पाण्याचा वापर करुन कलिगंडाची शेती करत आहेत.कलिगंडाच्या शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध असल्याने या सुविधांचा वापर करुन परजिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर लाभाची शेती मंडणगड तालुक्यात करीत असून, येथील सामान्य शेतकरी केवळ आपल्या भुईभाड्यात समाधानी असतानाच महिलांचा विशेष सहभाग असलेल्या तिडे - आदिवासीवाडी येथील आदिवासी समाजबांधवांनी आपला पारंपरिक व्यवसाय बंद करुन सर्व अडचणींवर मात करत कलिंगड शेतीचा प्रयोग यशस्वी केला.

यंदा मात्र या शेतीत अडचणींवर अडचणी येत असल्याने या महिला शेतकरी अडचणीत आल्या आहेत. तांत्रिक कारणांमुळे कलिंगड उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यातच भरीस भर म्हणून कलिंगडाचा हंगाम पंधरा दिवस उशिराने सुरु झाला. हे कमी होते की काय म्हणून मोठ्या प्रमाणावर येथील कलिंगडाची खरेदी करणारे व्यापारी यंदा याठिकाणी खरेदीसाठी आलेच नाहीत व जे आले त्यांनी भाव अगदीच पाडून मागितला.बाजारात कलिंगडाचा दर वीस रुपये प्रतिकिलो असताना शेतकऱ्यांना जागेवर आठ किंवा नऊ रुपयांचा दर प्रतिकिलो मागे दिला जात आहे. यंदा हा दर शेतकऱ्यांनी तीन ते चार रुपये प्रतिकिलो इतका खाली आणला आहे.

तालुक्यातील तिडे येथील आदिवासी शेतकऱ्यांकडे अजूनही सुमारे दहा टनाच्या आसपास कलिंगडाचा माल शिल्लक आहे. त्यामुळे येथील शेतकरी चांगलेच अडचणीत आले असून, शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी मदतीचे हात पुढे येणे आवश्यक आहे़

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी