शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
2
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
5
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
6
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
7
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
8
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
9
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
10
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
11
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
12
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
13
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
14
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
15
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
16
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
17
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
18
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
19
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
20
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाच्या गुणवत्तेची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 15:43 IST

मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे या महामार्गाच्या कामाची गुणवत्ता व दर्जाबाबत आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी, असे पत्र पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांनी परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे.

ठळक मुद्देमुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाच्या गुणवत्तेची चौकशी करानितीन गडकरी यांच्याकडे पालकमंत्र्यांची पत्राद्वारे विनंती

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे भविष्यात या मार्गावरील अपघातांत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

भविष्यातील वाढते अपघात टाळायचे असतील तर या महामार्गाच्या कामाची गुणवत्ता व दर्जाबाबत आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी, असे पत्र पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांनी परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे. नुकत्याच कोकणात झालेल्या दौऱ्यात ही बाब वायकर यांच्या निदर्शनास आली आहे.मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण प्रकल्प हा केंद्र शासनाकडून मंजूर असून, या मार्गाचे काम सध्या सुरू आहे. यासाठी आवश्यक जमीनही संपादित करण्यात आली आहे. त्यानंतर या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील गावांमध्ये व शहरांतर्गत वाहतुकीत झालेली वाढ विचारात घेता, दळणवळणासाठी चांगले रस्ते जनतेला उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जिल्ह्याची भौगोलिक स्थिती डोंगराळ असून, जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे येथील रस्त्यांची लवकर दुरवस्था होत असल्याचे वायकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.वायकर यांनी आपल्या जिल्हा दौऱ्यावेळी चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी केली असता, सध्या सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असून, केवळ मातीचे थरांवर क्राँक्रिटीकरण केले जात आहे. या रस्त्याचा पायाच मजबूत नसल्याने मुसळधार पावसात ही माती वाहून जाऊ शकते. तसेच माती रस्त्यावर आल्यास अपघाताचा धोका असून, या प्रकरणी तातडीने लक्ष देण्याची विनंती गडकरी यांना पालकमंत्री रवींद्र वायकर केली आहे.उच्चस्तर चौकशी हवीमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास अपघातांच्या प्रमाणात वाढ होऊ शकते. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या महामार्गाच्या कामाची गुणवत्ता व दर्जाची आपल्या स्तरावरुन चौकशी करण्यात यावी, अशी विनंती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केंद्र्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरीRavindra Vaikarरवींद्र वायकरNitin Gadkariनितीन गडकरी