शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाच्या गुणवत्तेची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 15:43 IST

मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे या महामार्गाच्या कामाची गुणवत्ता व दर्जाबाबत आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी, असे पत्र पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांनी परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे.

ठळक मुद्देमुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाच्या गुणवत्तेची चौकशी करानितीन गडकरी यांच्याकडे पालकमंत्र्यांची पत्राद्वारे विनंती

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे भविष्यात या मार्गावरील अपघातांत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

भविष्यातील वाढते अपघात टाळायचे असतील तर या महामार्गाच्या कामाची गुणवत्ता व दर्जाबाबत आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी, असे पत्र पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांनी परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे. नुकत्याच कोकणात झालेल्या दौऱ्यात ही बाब वायकर यांच्या निदर्शनास आली आहे.मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण प्रकल्प हा केंद्र शासनाकडून मंजूर असून, या मार्गाचे काम सध्या सुरू आहे. यासाठी आवश्यक जमीनही संपादित करण्यात आली आहे. त्यानंतर या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील गावांमध्ये व शहरांतर्गत वाहतुकीत झालेली वाढ विचारात घेता, दळणवळणासाठी चांगले रस्ते जनतेला उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जिल्ह्याची भौगोलिक स्थिती डोंगराळ असून, जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे येथील रस्त्यांची लवकर दुरवस्था होत असल्याचे वायकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.वायकर यांनी आपल्या जिल्हा दौऱ्यावेळी चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी केली असता, सध्या सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असून, केवळ मातीचे थरांवर क्राँक्रिटीकरण केले जात आहे. या रस्त्याचा पायाच मजबूत नसल्याने मुसळधार पावसात ही माती वाहून जाऊ शकते. तसेच माती रस्त्यावर आल्यास अपघाताचा धोका असून, या प्रकरणी तातडीने लक्ष देण्याची विनंती गडकरी यांना पालकमंत्री रवींद्र वायकर केली आहे.उच्चस्तर चौकशी हवीमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास अपघातांच्या प्रमाणात वाढ होऊ शकते. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या महामार्गाच्या कामाची गुणवत्ता व दर्जाची आपल्या स्तरावरुन चौकशी करण्यात यावी, अशी विनंती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केंद्र्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरीRavindra Vaikarरवींद्र वायकरNitin Gadkariनितीन गडकरी