शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाच्या गुणवत्तेची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 15:43 IST

मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे या महामार्गाच्या कामाची गुणवत्ता व दर्जाबाबत आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी, असे पत्र पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांनी परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे.

ठळक मुद्देमुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाच्या गुणवत्तेची चौकशी करानितीन गडकरी यांच्याकडे पालकमंत्र्यांची पत्राद्वारे विनंती

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे भविष्यात या मार्गावरील अपघातांत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

भविष्यातील वाढते अपघात टाळायचे असतील तर या महामार्गाच्या कामाची गुणवत्ता व दर्जाबाबत आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी, असे पत्र पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांनी परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे. नुकत्याच कोकणात झालेल्या दौऱ्यात ही बाब वायकर यांच्या निदर्शनास आली आहे.मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण प्रकल्प हा केंद्र शासनाकडून मंजूर असून, या मार्गाचे काम सध्या सुरू आहे. यासाठी आवश्यक जमीनही संपादित करण्यात आली आहे. त्यानंतर या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील गावांमध्ये व शहरांतर्गत वाहतुकीत झालेली वाढ विचारात घेता, दळणवळणासाठी चांगले रस्ते जनतेला उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जिल्ह्याची भौगोलिक स्थिती डोंगराळ असून, जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे येथील रस्त्यांची लवकर दुरवस्था होत असल्याचे वायकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.वायकर यांनी आपल्या जिल्हा दौऱ्यावेळी चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी केली असता, सध्या सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असून, केवळ मातीचे थरांवर क्राँक्रिटीकरण केले जात आहे. या रस्त्याचा पायाच मजबूत नसल्याने मुसळधार पावसात ही माती वाहून जाऊ शकते. तसेच माती रस्त्यावर आल्यास अपघाताचा धोका असून, या प्रकरणी तातडीने लक्ष देण्याची विनंती गडकरी यांना पालकमंत्री रवींद्र वायकर केली आहे.उच्चस्तर चौकशी हवीमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास अपघातांच्या प्रमाणात वाढ होऊ शकते. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या महामार्गाच्या कामाची गुणवत्ता व दर्जाची आपल्या स्तरावरुन चौकशी करण्यात यावी, अशी विनंती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केंद्र्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरीRavindra Vaikarरवींद्र वायकरNitin Gadkariनितीन गडकरी