शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

रत्नागिरी : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 15:02 IST

विद्यार्थ्यांमधील भविष्यातील साहित्यिक घडविण्यासाठी ग्रंथमहोत्सव उपयोगी ठरणार आहेत. समाजात वाचन चळवळ रूजविणे, हे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चांगल्या पुस्तकांमुळे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो, त्यामुळे वाचन संस्कृती वृध्दिंगत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहा सावंत यांनी केले.

ठळक मुद्देभविष्यातील साहित्यिक घडविण्यासाठी ग्रंथमहोत्सव उपयोगी : स्नेहा सावंतराष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातंर्गत महोत्सवमाध्यमिक शिक्षण विभाग, तालिमी इम्दादिया कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन मिस्त्री हायस्कूल येथे पाचव्या ग्रंथ महोत्सवाचे आयोजन

रत्नागिरी : विद्यार्थ्यांमधील भविष्यातील साहित्यिक घडविण्यासाठी ग्रंथमहोत्सव उपयोगी ठरणार आहेत. समाजात वाचन चळवळ रूजविणे, हे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चांगल्या पुस्तकांमुळे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो, त्यामुळे वाचन संस्कृती वृध्दिंगत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहा सावंत यांनी केले.राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातंर्गत माध्यमिक शिक्षण विभाग आणि तालिमी इम्दादिया कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मिस्त्री हायस्कूल येथे पाचव्या ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात तीन दिवस चालणाया ग्रंथमहोत्सवाचा उद्देश स्पष्ट केला. ग्रंथ महोत्सवाचे जिल्हा समन्वयक नथुराम देवळेकर यांनी तीन दिवसीय कार्यक्रमाचा आढावा घेतला.प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थी व शिक्षकांसाठी ग्रंथ अमूल्य ठेवा आहे. डिजीटल युगात एका क्लिकवर माहितीचा खजाना उपलब्ध होत असला तरी ती माहिती ग्रंथातून आलेली असते. त्यामुळे ग्रंथातील माहिती शाश्वत असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती चे सभापती दीपक नागले यांनी ग्रंथ महोत्सव इंटरनेटमुळे वाचनसंस्कृती लोप पावत आहे. जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता उत्कृष्ट असली तरी स्पर्धा परीक्षांमध्ये येथील विद्यार्थी मागे पडत आहेत. त्यामुळे तरूणांनी वाचन संस्कृती जोपासणे आवश्यक असल्याचे सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीliteratureसाहित्यSchoolशाळा