शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

रत्नागिरी : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 15:02 IST

विद्यार्थ्यांमधील भविष्यातील साहित्यिक घडविण्यासाठी ग्रंथमहोत्सव उपयोगी ठरणार आहेत. समाजात वाचन चळवळ रूजविणे, हे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चांगल्या पुस्तकांमुळे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो, त्यामुळे वाचन संस्कृती वृध्दिंगत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहा सावंत यांनी केले.

ठळक मुद्देभविष्यातील साहित्यिक घडविण्यासाठी ग्रंथमहोत्सव उपयोगी : स्नेहा सावंतराष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातंर्गत महोत्सवमाध्यमिक शिक्षण विभाग, तालिमी इम्दादिया कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन मिस्त्री हायस्कूल येथे पाचव्या ग्रंथ महोत्सवाचे आयोजन

रत्नागिरी : विद्यार्थ्यांमधील भविष्यातील साहित्यिक घडविण्यासाठी ग्रंथमहोत्सव उपयोगी ठरणार आहेत. समाजात वाचन चळवळ रूजविणे, हे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चांगल्या पुस्तकांमुळे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो, त्यामुळे वाचन संस्कृती वृध्दिंगत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहा सावंत यांनी केले.राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातंर्गत माध्यमिक शिक्षण विभाग आणि तालिमी इम्दादिया कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मिस्त्री हायस्कूल येथे पाचव्या ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात तीन दिवस चालणाया ग्रंथमहोत्सवाचा उद्देश स्पष्ट केला. ग्रंथ महोत्सवाचे जिल्हा समन्वयक नथुराम देवळेकर यांनी तीन दिवसीय कार्यक्रमाचा आढावा घेतला.प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थी व शिक्षकांसाठी ग्रंथ अमूल्य ठेवा आहे. डिजीटल युगात एका क्लिकवर माहितीचा खजाना उपलब्ध होत असला तरी ती माहिती ग्रंथातून आलेली असते. त्यामुळे ग्रंथातील माहिती शाश्वत असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती चे सभापती दीपक नागले यांनी ग्रंथ महोत्सव इंटरनेटमुळे वाचनसंस्कृती लोप पावत आहे. जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता उत्कृष्ट असली तरी स्पर्धा परीक्षांमध्ये येथील विद्यार्थी मागे पडत आहेत. त्यामुळे तरूणांनी वाचन संस्कृती जोपासणे आवश्यक असल्याचे सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीliteratureसाहित्यSchoolशाळा