शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी :पडीक जमिनीवर फुलवली फळबाग, लागवडीबरोबरच मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 17:59 IST

तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजना पोहोचवत असतानाच पडीक जमिनीवर नाणीज येथील आर. के. डवरी यांनी फळबागायत फुलवली आहे. तसेच भाडेतत्वावर जागा घेऊन त्यामध्ये भात, भाजीपाला, कलिंगडाचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न डवरी यांनी केला आहे.

ठळक मुद्देपडीक जमिनीवर फुलवली फळबाग, लागवडीबरोबरच मार्गदर्शनभात, भाजीपाल्यासह कलिंगड उत्पादनाचाही केला प्रयत्न

मेहरून नाकाडेरत्नागिरी : तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजना पोहोचवत असतानाच पडीक जमिनीवर नाणीज येथील आर. के. डवरी यांनी फळबागायत फुलवली आहे. तसेच भाडेतत्वावर जागा घेऊन त्यामध्ये भात, भाजीपाला, कलिंगडाचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न डवरी यांनी केला आहे.विविध कारणास्तव शेतकरी आपली जागा पडीक ठेवतात. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना लागवडीसाठी प्रोत्साहित करून शास्त्रशुध्द पध्दतीने फळबाग लागवड कशी करावी. तसेच शेतकऱ्यांना शेतीचे महत्त्व पटवून देतानाच त्यांना प्रत्यक्ष लागवडीसाठी उद्युक्त करण्याचे काम डवरी करीत आहेत.

याशिवाय पाली, पाथरट, नाणीज येथे शेतकऱ्यांकडून जागा भाड्याने घेऊन त्यामध्ये त्यांनी भातपिकाची लागवड केली आहे. भात काढणीनंतर भाजीपाला व कलिंगड पिकाची लागवड डवरी करतात. भाताची लागवड मात्र ते कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त चारसुत्री पद्धतीने करतात. त्यामुळे सगुणा पद्धतीपेक्षा परिसरातील शेतकरी चारसुत्री पद्धतीचाच अवलंब अधिक करू लागले आहेत.

चारसुत्री पध्दतीत उत्पादनही चांगले येत असल्याचे डवरी यांचे मत आहे. भात काढणीनंतर ते भाजीपाला व कलिंगड लागवड करीत असल्याने परिसरातील ग्रामस्थांना स्थानिक पालेभाज्या, कलिंगडे सहज उपलब्ध होत आहेत. त्यांनी अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून लागवडीसाठी प्रवृत्त केले आहे.डोंगराळ, कातळावरील पडीक जमिनीमध्ये शेतकऱ्यांच्या सहकार्याने आंबा, काजूची फळबाग त्यांनी फुलवली आहे. कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त लागवड तंत्राचा अवलंब करतानाच वेळोवेळी सफाई, खत व्यवस्थापन केले तर नक्कीच चांगले उत्पन्न फळबागायतीद्वारे मिळते, असा त्यांचा दावा असून, शेतकऱ्यांनाही याचे महत्त्व पटले आहे.

नाणीज, पाली परिसरातील शेतकऱ्यांना ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यामुळे येथील शेतकरी आता कांदा, बटाटा, हरभरा, तूर, गहू, ज्वारीसारखी पिके घेऊ लागले आहेत. आजकाल शेतीत मजुरांची समस्या भेडसावते. त्यासाठी शेतकऱ्यांचे गट स्थापन करून सहकारातून शेती केल्याने ती फायदेशीर ठरत आहे. अधिकाधिक क्षेत्र पिकाखाली येऊन शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होत आहे.उन्नत शेती योजनेतून नाणीज येथील दहा हेक्टर क्षेत्रामध्ये ५० शेतकऱ्यांनी काजूची लागवड केली आहे. लागवडीचे तंत्र पटवून देत असतानाच किडींचा प्रादूर्भाव झाल्यास कोणती कीटकनाशके वापरावी, याबाबतही डवरी मार्गदर्शन करीत आहेत. चारसुत्री भातलागवड करण्याबरोबरच नाणीज येथे त्यांनी कीड सर्वेक्षण मोहिम सुरू केली असून, यासाठी तेथील दोन प्लॉटची निवड केली आहे.

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना भात पिकाचे कीडीपासून कसे संरक्षण करावे, याची माहिती देतानाच कीटकनाशके घरच्या घरी कशी तयार करावी, याचेही प्रात्यक्षिक दिले आहे.

सेंद्रीय शेतीचे महत्त्व पटवून देतानाच गांडूळ खत, कंपोस्ट खत शेतावर तयार करण्याबरोबर शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे येथील शेतकऱ्यांना वळविले आहे. शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी योग्य मार्गदर्शन करण्याबरोबरच अधिक उत्पन्न देणारे वाण कसे निवडावे यासाठी डवरी त्यांना मदत करतात.शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहणे गरजेचे असून, त्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. स्वत: शेती करतानाच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना जमीन पडीक न ठेवता त्यामध्ये विविध प्रकारचे उत्पादन घेण्यासाठी ते प्रवृत्त करीत आहेत. त्यामुळे या परिसरातील ग्रमास्थांचा शेतीकडे ओढा वाढला आहे.

कोकणातील मातीत कोणत्याही प्रकारची पिके घेता येतात. शिवाय उत्पन्नही चांगले येते, हे त्यांनी पटवून दिले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चंद्रकांत इरमल यांनी ज्वारी, कांदा, बटाटा, पावटा, हरभरा ही पिके घेऊन त्यातून भरघोस उत्पन्न मिळवले आहे....तर नंदनवन फुलेल

कोकणात शेतकऱ्यांचे जागा पडीक टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याऐवजी पडीक जमिनीचा पोत पाहून फळबाग किंवा अन्य पिकांची लागवड करणे आवश्यक आहे. यामुळे जागा लागवडीखाली येईल व शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नदेखील प्राप्त होईल. विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतकरी पडीक जमिनीवर नंदनवन फुलवू शकतात.

टॅग्स :fruitsफळेFarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी