शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

रत्नागिरी :पडीक जमिनीवर फुलवली फळबाग, लागवडीबरोबरच मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 17:59 IST

तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजना पोहोचवत असतानाच पडीक जमिनीवर नाणीज येथील आर. के. डवरी यांनी फळबागायत फुलवली आहे. तसेच भाडेतत्वावर जागा घेऊन त्यामध्ये भात, भाजीपाला, कलिंगडाचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न डवरी यांनी केला आहे.

ठळक मुद्देपडीक जमिनीवर फुलवली फळबाग, लागवडीबरोबरच मार्गदर्शनभात, भाजीपाल्यासह कलिंगड उत्पादनाचाही केला प्रयत्न

मेहरून नाकाडेरत्नागिरी : तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजना पोहोचवत असतानाच पडीक जमिनीवर नाणीज येथील आर. के. डवरी यांनी फळबागायत फुलवली आहे. तसेच भाडेतत्वावर जागा घेऊन त्यामध्ये भात, भाजीपाला, कलिंगडाचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न डवरी यांनी केला आहे.विविध कारणास्तव शेतकरी आपली जागा पडीक ठेवतात. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना लागवडीसाठी प्रोत्साहित करून शास्त्रशुध्द पध्दतीने फळबाग लागवड कशी करावी. तसेच शेतकऱ्यांना शेतीचे महत्त्व पटवून देतानाच त्यांना प्रत्यक्ष लागवडीसाठी उद्युक्त करण्याचे काम डवरी करीत आहेत.

याशिवाय पाली, पाथरट, नाणीज येथे शेतकऱ्यांकडून जागा भाड्याने घेऊन त्यामध्ये त्यांनी भातपिकाची लागवड केली आहे. भात काढणीनंतर भाजीपाला व कलिंगड पिकाची लागवड डवरी करतात. भाताची लागवड मात्र ते कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त चारसुत्री पद्धतीने करतात. त्यामुळे सगुणा पद्धतीपेक्षा परिसरातील शेतकरी चारसुत्री पद्धतीचाच अवलंब अधिक करू लागले आहेत.

चारसुत्री पध्दतीत उत्पादनही चांगले येत असल्याचे डवरी यांचे मत आहे. भात काढणीनंतर ते भाजीपाला व कलिंगड लागवड करीत असल्याने परिसरातील ग्रामस्थांना स्थानिक पालेभाज्या, कलिंगडे सहज उपलब्ध होत आहेत. त्यांनी अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून लागवडीसाठी प्रवृत्त केले आहे.डोंगराळ, कातळावरील पडीक जमिनीमध्ये शेतकऱ्यांच्या सहकार्याने आंबा, काजूची फळबाग त्यांनी फुलवली आहे. कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त लागवड तंत्राचा अवलंब करतानाच वेळोवेळी सफाई, खत व्यवस्थापन केले तर नक्कीच चांगले उत्पन्न फळबागायतीद्वारे मिळते, असा त्यांचा दावा असून, शेतकऱ्यांनाही याचे महत्त्व पटले आहे.

नाणीज, पाली परिसरातील शेतकऱ्यांना ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यामुळे येथील शेतकरी आता कांदा, बटाटा, हरभरा, तूर, गहू, ज्वारीसारखी पिके घेऊ लागले आहेत. आजकाल शेतीत मजुरांची समस्या भेडसावते. त्यासाठी शेतकऱ्यांचे गट स्थापन करून सहकारातून शेती केल्याने ती फायदेशीर ठरत आहे. अधिकाधिक क्षेत्र पिकाखाली येऊन शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होत आहे.उन्नत शेती योजनेतून नाणीज येथील दहा हेक्टर क्षेत्रामध्ये ५० शेतकऱ्यांनी काजूची लागवड केली आहे. लागवडीचे तंत्र पटवून देत असतानाच किडींचा प्रादूर्भाव झाल्यास कोणती कीटकनाशके वापरावी, याबाबतही डवरी मार्गदर्शन करीत आहेत. चारसुत्री भातलागवड करण्याबरोबरच नाणीज येथे त्यांनी कीड सर्वेक्षण मोहिम सुरू केली असून, यासाठी तेथील दोन प्लॉटची निवड केली आहे.

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना भात पिकाचे कीडीपासून कसे संरक्षण करावे, याची माहिती देतानाच कीटकनाशके घरच्या घरी कशी तयार करावी, याचेही प्रात्यक्षिक दिले आहे.

सेंद्रीय शेतीचे महत्त्व पटवून देतानाच गांडूळ खत, कंपोस्ट खत शेतावर तयार करण्याबरोबर शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे येथील शेतकऱ्यांना वळविले आहे. शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी योग्य मार्गदर्शन करण्याबरोबरच अधिक उत्पन्न देणारे वाण कसे निवडावे यासाठी डवरी त्यांना मदत करतात.शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहणे गरजेचे असून, त्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. स्वत: शेती करतानाच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना जमीन पडीक न ठेवता त्यामध्ये विविध प्रकारचे उत्पादन घेण्यासाठी ते प्रवृत्त करीत आहेत. त्यामुळे या परिसरातील ग्रमास्थांचा शेतीकडे ओढा वाढला आहे.

कोकणातील मातीत कोणत्याही प्रकारची पिके घेता येतात. शिवाय उत्पन्नही चांगले येते, हे त्यांनी पटवून दिले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चंद्रकांत इरमल यांनी ज्वारी, कांदा, बटाटा, पावटा, हरभरा ही पिके घेऊन त्यातून भरघोस उत्पन्न मिळवले आहे....तर नंदनवन फुलेल

कोकणात शेतकऱ्यांचे जागा पडीक टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याऐवजी पडीक जमिनीचा पोत पाहून फळबाग किंवा अन्य पिकांची लागवड करणे आवश्यक आहे. यामुळे जागा लागवडीखाली येईल व शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नदेखील प्राप्त होईल. विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतकरी पडीक जमिनीवर नंदनवन फुलवू शकतात.

टॅग्स :fruitsफळेFarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी