शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रत्नागिरी : वाहतूक पोलिसाचा प्रामाणिकपणा, पोलिसांची प्रतिमा उंचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 16:16 IST

वाहतूक पोलीसही माणसेच असतात आणि अनेक प्रसंगात त्यांची माणुसकी, त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येते. रत्नागिरी वाहतूक शाखेतील पोलीस सुभाष शिरधनकर यांनीही एका प्रसंगातून असाच प्रामाणिकपणा दाखवून पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे.

ठळक मुद्देप्रामाणिकपणा दाखवून पोलिसांची प्रतिमा उंचावलीरस्त्यात पडलेला मोबाईल केला परत रेझिंग डेनिमित्त घडला अनोखा उपक्रम

रत्नागिरी : वाहतूक पोलीस हा कायमच साऱ्यांच्या टिकेचा धनी. त्याने शिस्त दाखवली तरी त्याच्यावर टीका आणि त्याने कोणाला कारवाई न करता कोणाला सोडून दिले तरी त्याने चिरीमिरी घेतल्याची टीका. पण वाहतूक पोलीसही माणसेच असतात आणि अनेक प्रसंगात त्यांची माणुसकी, त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येते.

रत्नागिरी वाहतूक शाखेचे पोलीस सुभाष शिरधनकर यांनीही एका प्रसंगातून असाच प्रामाणिकपणा दाखवून पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे.रत्नागिरीच्या जेलनाका भागात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा ते पावणेसातच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरूणाचा मोबाईल खाली पडला. काहीतरी रस्त्यावर पडल्याचे  वाहतूक शाखेतील पोलीस वाहतूक पोलीस शिरधनकर यांच्या लक्षात आले.

तो मोबाईल असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वाहतूक शाखेचे निरीक्षक अयुब खान यांना हा प्रकार सांगितला. मोबाईलवरील दूरध्वनी क्रमांकांशी संपर्क साधत त्यांनी हा मोबाईल कोणाचा आहे, याची माहिती मिळवली.रत्नागिरीच्या गवळीवाडा येथे राहणाऱ्या रोहीत कैलास आठवले याचा हा मोबाईल असल्याचे समजल्यानंतर त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. अर्धा ते पाऊण तासात रोहीत आठवले यांना त्यांचा रस्त्यात पडलेला मोबाईल परत मिळाला.

आठवले हे रत्नागिरी नगर परिषदेचे कर्मचारी आहेत. त्यांच्या मोबाईलची किंमत ५२ हजार रूपये इतकी आहे. आठवले यांनी त्यासाठी देऊ केलेले बक्षिसही शिरधनकर यांनी नाकारले. रेझिंग डेनिमित्त पोलीस अनेक उपक्रम करतात. त्याचदिवशी हा अनोखा उपक्रम घडला आणि पोलिसांची मान उंचावली. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtraffic policeवाहतूक पोलीस