शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

वाशीपाठोपाठ पुण्यातही रत्नागिरी हापूस दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:12 IST

हवामानातील बदलामुळे यावर्षी हंगाम उशिरा असताना सुध्दा आॅगस्टमध्ये आलेल्या मोहोराची शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतल्यामुळेच तयार झालेला आंबा विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. मात्र, याचे प्रमाण अत्यल्प आहे.

रत्नागिरी :  विविध नैसर्गिक दुष्टचक्रातून वाचलेला हापूस तयार झाला असून, वाशी - मुंबई पाठोपाठ पुण्यातही हापूस विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. मुंबईत पेटीला दहा हजार रूपये तर पुण्यात मात्र सर्वोच्च दर प्राप्त झाला आहे. पाच डझनाच्या पेटीला २१ हजार ५०० रूपये इतका भाव मिळाला आहे.

दापोली, राजापूर येथील आंबा जानेवारी बाजारात आला आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील १२ पेट्या तसेच पावस येथील मुकादम यांच्या बागेतील आंबा फेब्रुवारीत मुंबई मार्केटमध्ये विक्रीस पाठविण्यात आला असतानाच आता पुणे मार्केटमध्येही आंबा विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे यावर्षी हंगाम उशिरा असताना सुध्दा आॅगस्टमध्ये आलेल्या मोहोराची शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतल्यामुळेच तयार झालेला आंबा विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. मात्र, याचे प्रमाण अत्यल्प आहे.

रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये गावातील शेतकरी सुभाष मनोहर खाडे यांच्या बागेतून आंबापेटी पुणे मार्केटयार्डात विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे. गतवर्षी पुणे मार्केट यार्डात  डिसेंबरमध्ये आंबा विक्रीसाठी दाखल झाला होता. मात्र यावर्षी फेब्रुवारीत आला आहे. यावर्षीच्या हंगामातील आंबा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यातच बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र क्यार, माहा सारखी वादळे, लांबलेला पाऊस यातून वाचलेला आंबा तयार झाला असून, शेतकऱ्यांनी तो विक्रीसाठी पाठविण्यास सुरूवात केली आहे. यावर्षी उत्पादन कमी असल्याने आंब्याला दर चांगला प्राप्त होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना दर्जेदार हापूस मात्र मे महिन्यातच उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणPuneपुणे