शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वाशीपाठोपाठ पुण्यातही रत्नागिरी हापूस दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:12 IST

हवामानातील बदलामुळे यावर्षी हंगाम उशिरा असताना सुध्दा आॅगस्टमध्ये आलेल्या मोहोराची शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतल्यामुळेच तयार झालेला आंबा विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. मात्र, याचे प्रमाण अत्यल्प आहे.

रत्नागिरी :  विविध नैसर्गिक दुष्टचक्रातून वाचलेला हापूस तयार झाला असून, वाशी - मुंबई पाठोपाठ पुण्यातही हापूस विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. मुंबईत पेटीला दहा हजार रूपये तर पुण्यात मात्र सर्वोच्च दर प्राप्त झाला आहे. पाच डझनाच्या पेटीला २१ हजार ५०० रूपये इतका भाव मिळाला आहे.

दापोली, राजापूर येथील आंबा जानेवारी बाजारात आला आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील १२ पेट्या तसेच पावस येथील मुकादम यांच्या बागेतील आंबा फेब्रुवारीत मुंबई मार्केटमध्ये विक्रीस पाठविण्यात आला असतानाच आता पुणे मार्केटमध्येही आंबा विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे यावर्षी हंगाम उशिरा असताना सुध्दा आॅगस्टमध्ये आलेल्या मोहोराची शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतल्यामुळेच तयार झालेला आंबा विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. मात्र, याचे प्रमाण अत्यल्प आहे.

रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये गावातील शेतकरी सुभाष मनोहर खाडे यांच्या बागेतून आंबापेटी पुणे मार्केटयार्डात विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे. गतवर्षी पुणे मार्केट यार्डात  डिसेंबरमध्ये आंबा विक्रीसाठी दाखल झाला होता. मात्र यावर्षी फेब्रुवारीत आला आहे. यावर्षीच्या हंगामातील आंबा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यातच बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र क्यार, माहा सारखी वादळे, लांबलेला पाऊस यातून वाचलेला आंबा तयार झाला असून, शेतकऱ्यांनी तो विक्रीसाठी पाठविण्यास सुरूवात केली आहे. यावर्षी उत्पादन कमी असल्याने आंब्याला दर चांगला प्राप्त होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना दर्जेदार हापूस मात्र मे महिन्यातच उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणPuneपुणे