शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

रत्नागिरी :  घरफोडीच्या गुन्ह्यातील ४ जणांची टोळी ६ महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:30 IST

रत्नागिरी शहरामध्ये राहणाऱ्या व घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या ४ जणांच्या टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशानुसार ९ डिसेंबर २०१८ पासून जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देघरफोडीच्या गुन्ह्यातील ४ जणांची टोळी जिल्ह्यातून तडीपार६ महिन्यांसाठी कारवाई

रत्नागिरी : रत्नागिरी शहरामध्ये राहणाऱ्या व घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या ४ जणांच्या टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशानुसार ९ डिसेंबर २०१८ पासून जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये आकिब जिक्रिया वस्ता (२१, राजिवडा), मकबुल सलाउद्दीन दावत (१९, राजिवडा, रत्नागिरी), उजैफ तन्वीर वस्ता (१९, राजिवडा, आदमपूर, रत्नागिरी), मोहम्मद अदनान इरफान वस्ता (१९, लिमयेवाडी, कर्ला, रत्नागिरी) यांचा समावेश आहे. त्यांना रविवारी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी शहर पोलीस स्थानकाला परिणामकारक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गुन्हेगारांची अद्ययावत यादी पोलिसानी बनवली.

त्यानुसार रत्नागिरी शहराअंतर्गत गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी करण्यात येणाऱ्या कारवाईअंतर्गत या चार जणांच्या टोळीला जिल्ह्यातून हद्दपार करावे, अशी मागणी करणारा प्रस्ताव शहर पोलीस स्थानकातून जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आला होता.त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी आवश्यक चौकशी केली व या टोळीच्या हद्दपारीची शिफारस केली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रविवारी या टोळीची हद्दपारी जाहीर करून गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस