शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

Ratnagiri: राजापुरात पूर, महामार्गावर साठले पाणी

By मनोज मुळ्ये | Updated: July 7, 2024 19:10 IST

Ratnagiri Rain News: मुसळधार पावसामुळे रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राजापूर शहरात पूर आला आहे. शनिवारपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अर्जुना नदीचे पाणी जवाहर चौकात आले आहे. महामार्गावर राजापूर तालुक्यातील हातीवले येथे पाणीच पाणी झाले आहे.

राजापूर - मुसळधार पावसामुळे रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राजापूर शहरात पूर आला आहे. शनिवारपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अर्जुना नदीचे पाणी जवाहर चौकात आले आहे. महामार्गावर राजापूर तालुक्यातील हातीवले येथे पाणीच पाणी झाले आहे. महामार्गावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने अनेक ठिकाणी ही समस्या उद्भवली आहे.

गेले दोन-तीन दिवस राजापूर तालुक्यात मुसळधार पावसाने ठाण मांडले आहे. शनिवारी दिवसभर पडत असलेला पाऊस रात्रीही कायम असल्याने रविवारी सकाळी अर्जुना नदीच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली. दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान नदीचे पाणी शहरातील जवाहर चौकात आले. पावसाचा जैर आधिक असल्याने व्यापाऱ्यांनी आधीच दुकानातील सामानाची हलवाहलवी केली.

शहरात पाणी भरत असतानाच महामार्गावरही पाणीच पाणी झाले होते. महामार्ग रुंदीकरणांमध्ये राजापूर तालुक्यातील हातीवले येथे टोल नाका उभारण्यात आला आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने पाणी साठत आहे. रविवारी दुपारच्या दरम्यान हातिवले टोलनाक्यानजीकही पाणीच पाणी झाले होते. वाहनचालकांना या पाण्यातूनच वाट काढावी लागत होती. पावसाचा जोर कायम राहिला तर या भागातील वाहतूक काही काळ थांबवून ठेवावी लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस