शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
2
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
3
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
4
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
5
मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू
6
दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद राहणार ४ महिने रिक्त;  विधानसभेतील पदाचा निर्णयही प्रलंबित
7
झारखंडमधील ACB पथकाने अटक केलेला अमित साळुंखे कोण?; संजय राऊतांचा शिंदे पिता-पुत्रावर खळबळजनक आरोप
8
घटनेच्या उद्देशिकेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवणार का?; केंद्र सरकारने संसदेत दिले उत्तर
9
इलेक्ट्रिक टुव्हीलरनंतर आता थ्री-व्हीलर! 'या' कंपनीने बाजारात उतरवले रिक्षाचे २ मॉडेल्स; किंमत आणि फीचर्स काय?
10
श्रावण शुक्रवार: नैवेद्याला करा 'कोकोनट मलई खीर'; तांदळाच्या खिरीला खोबऱ्याचा ट्विस्ट!
11
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारतर्फे अभ्यासक्रम पुरवणार; आशिष शेलारांचे आश्वासन
12
थायलंड-कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच; आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू; UN'ने बोलावली आपत्कालीन बैठक
13
NSDL IPO: बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या
14
पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य
15
आता नाशिकची वाईन अन् केरळची ताडी थेट ब्रिटनमध्ये मिळणार! यूकेमध्ये विक्रीचा मार्ग मोकळा
16
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
17
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड
18
ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...
19
OYO कांड! विवाहित प्रेयसीसोबत पकडले, प्रियकराने विवस्त्रावस्थेतच हायवेवरून धूम ठोकली... 
20
लिव्ह इनमधील २४ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू; सैयारा सिनेमा पाहून काय घडले? पोलीस हैराण 

Ratnagiri: राजापुरात पूर, महामार्गावर साठले पाणी

By मनोज मुळ्ये | Updated: July 7, 2024 19:10 IST

Ratnagiri Rain News: मुसळधार पावसामुळे रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राजापूर शहरात पूर आला आहे. शनिवारपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अर्जुना नदीचे पाणी जवाहर चौकात आले आहे. महामार्गावर राजापूर तालुक्यातील हातीवले येथे पाणीच पाणी झाले आहे.

राजापूर - मुसळधार पावसामुळे रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राजापूर शहरात पूर आला आहे. शनिवारपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अर्जुना नदीचे पाणी जवाहर चौकात आले आहे. महामार्गावर राजापूर तालुक्यातील हातीवले येथे पाणीच पाणी झाले आहे. महामार्गावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने अनेक ठिकाणी ही समस्या उद्भवली आहे.

गेले दोन-तीन दिवस राजापूर तालुक्यात मुसळधार पावसाने ठाण मांडले आहे. शनिवारी दिवसभर पडत असलेला पाऊस रात्रीही कायम असल्याने रविवारी सकाळी अर्जुना नदीच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली. दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान नदीचे पाणी शहरातील जवाहर चौकात आले. पावसाचा जैर आधिक असल्याने व्यापाऱ्यांनी आधीच दुकानातील सामानाची हलवाहलवी केली.

शहरात पाणी भरत असतानाच महामार्गावरही पाणीच पाणी झाले होते. महामार्ग रुंदीकरणांमध्ये राजापूर तालुक्यातील हातीवले येथे टोल नाका उभारण्यात आला आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने पाणी साठत आहे. रविवारी दुपारच्या दरम्यान हातिवले टोलनाक्यानजीकही पाणीच पाणी झाले होते. वाहनचालकांना या पाण्यातूनच वाट काढावी लागत होती. पावसाचा जोर कायम राहिला तर या भागातील वाहतूक काही काळ थांबवून ठेवावी लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस