शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी :  चाफेतील मांजरेकर कुटुंब प्रथम मानकरी, कन्या वन समृध्दी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 13:47 IST

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या कन्या वन समृध्दी योजनेची पहिली मानकरी रत्नागिरी तालुक्यातील चाफे - वरचीवाडी येथील माधवी मोहन मांजरेकर यांची कन्या ठरली आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागातर्फे मांजरेकर कुटुंबाला दहा रोपे भेट देण्यात आली असून, मांजरेकर कुटुंबियांनी त्यांच्या जागेत या झाडांची लागवड केली आहे.

ठळक मुद्देचाफेतील मांजरेकर कुटुंब प्रथम मानकरी, कन्या वन समृध्दी योजना सामाजिक वनीकरण विभागातर्फे केले होते आयोजन

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या कन्या वन समृध्दी योजनेची पहिली मानकरी रत्नागिरी तालुक्यातील चाफे - वरचीवाडी येथील माधवी मोहन मांजरेकर यांची कन्या ठरली आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागातर्फे मांजरेकर कुटुंबाला दहा रोपे भेट देण्यात आली असून, मांजरेकर कुटुंबियांनी त्यांच्या जागेत या झाडांची लागवड केली आहे.चाफे - वरचीवाडी येथील माधवी मांजरेकर यांच्या सर्व्हे क्रमांक १४२/२ या क्षेत्रात वनीकरण विभागाने दिलेल्या साग, काजू, आंबा, जांभूळ अशा दहा रोपांची लागवड करण्यात आली आहे. वनक्षेत्राव्यतिरिक्त जास्तीत जास्त वनेत्तर क्षेत्र वृक्षलागवडीखाली आणण्याबरोबरच ज्या शेतकरी कुटुंबांमध्ये मुलगी जन्माला येईल, अशा दाम्पत्यांना दहा रोपे विनामूल्य दिली जाणार आहेत. पर्यावरण, वृक्ष लागवड व संगोपन आणि संवर्धन, जैवविविधता इत्यादीबाबत सध्याच्या व भावी पिढीमध्ये आवड व रूची निर्माण करण्याचा उद्देश यामागे आहे.या योजनेतून मुलगा आणि मुलगी समान असून, महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी सामाजिक संदेश देणे, मुलींच्या घटत्या संख्येवर अशा योजनांद्वारे काही प्रमाणात नियंत्रण मिळवणे हादेखील कन्या वन समृध्दी योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी मुलीचा जन्म झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नाव नोंदणी केल्यानंतर विहीत नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन केले होते.

ज्या शेतकरी दाम्पत्याला मुलगी होईल, त्या दाम्पत्याने मुलीसाठी तिच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या पावसाळ्यात दिनांक १ ते ७ जुलैअखेर दहा झाडे लावण्याची संमत्ती अर्जाद्वारे द्यावी. तसेच वृक्षारोपणासाठी दहा खड्डे खोदून ठेवणे आवश्यक आहे.सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेतून या दाम्पत्याला दहा रोपे ग्रामपंचायतीमार्फत दिली जाणार असून, त्यामध्ये पाच साग रोपे, दोन आंबा रोपे, फणस, जांभूळ, चिंच यांचे प्रत्येकी एक रोप दिले जाणार आहे. लागवडीनंतर या रोपांचे फोटो काढून शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीला सादर करावयाचे आहेत.

ग्रामपंचायतींनी ही सर्व माहिती एकत्रित करून तालुकास्तरावरील वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण विभाग यांना दिनांक ३१ जुलैपर्यंत पाठविणे आवश्यक आहे. लागवड केलेल्या झाडांपासून मिळणारे सर्व उत्पन्न हे मुलीचा कौशल्य विकास, उच्चशिक्षण आणि रोजगार मिळवणे व मुलींच्या उज्वल भविष्यासाठी शेतकºयांना त्यांच्या ऐच्छिकतेनुसार वापरण्यास मुभा राहणार आहे. 

टॅग्स :environmentवातावरणRatnagiriरत्नागिरी