शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Ratnagiri: आधी वडील, मग आई आणि दोन मुले, एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता, दापोलीत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 12:09 IST

Ratnagiri:  रत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ आहे यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.

- शिवाजी गोरे

रत्नागिरीरत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ आहे यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी दापोली पोलिसांनी एक नियुक्त केले असून त्यांचा शोध अद्याप सुरू आहे. या घटनेमुळे दापोली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

2 जुलै रोजी दापोली तालूक्यातील विसापूर  गावातील पाथरीकोंड येथील आपल्या राहत्या घरातून भरत भेलेकर (34) हा दुपारी 2.30 च्या सुमारास बेपत्ता झाला.दुसऱ्याच दिवशी 3 जुलै रोजी भरत भेलेकर याची पत्नी सुगंधा भेलेकर ही सकाळी 9.30 च्या सुमारास मुलांना शाळेत सोडायला जाते असे सांगून आराध्य ( 7) व श्री (4) या आपल्या मुलांना  मुगीज शाळा नंबर 1 या जिल्हा परिषदेच्या शाळेत घेवून जाते सांगून घरातून निघून गेली तीसुध्दा अद्याप परतलीच नसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भरत याला घरातून निघून जाण्याची सवय आहे तो यापूर्वी पण असाच बेपत्ता झाला होता पण यावेळी पत्नी व दोन लहान मुले ही बेपत्ता झाल्याने सगळेच नातेवाईक व ग्रामस्थ चिंतेत असून शोशोध सुरू आहे.

या सगळ्या खळबळजनक प्रकाराचा छडा लावण्यासाठी पोलीसांसमोर हे मोठा आव्हान आहे. उपनिरीक्षक दर्जाचे नेतृत्वाखाली नेमण्यात आलेले पथक या कुटुंबाच्या शोधार्थ रवाना झाले आहे लवकरच काही माहिती हाती मिळेल असा विश्वास पोलिसांना आहे. मात्र या प्रकरणी अद्यापतरी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यामागे काही घरगुती भांडण किंवा अन्य काही घातपाताची तर नाही ना ? याचाही तपास पोलिसांनी युध्दपातळीवर सुरू केला आहे. 

दापोली तालूक्यातील विसापूर  गावातील पाथरीकोंड येथील आपल्या राहत्या घरातून भरत भेलेकर (34) हा दुपारी 2.30 च्या सुमारास त्याचा चुलत भाऊ सहदेव दत्ताराम भेलेकर यांच्यासोबत मंडणगड तालूक्यातील कुंबळे या ठिकाणी लाकडी पट्टी आणणे करीता जात आहे असे सांगून घरातून निघून गेला. तो अदयापपर्यंत घरी आलेलाच नाही. दुकानात जातो असे सांगून निघून गेलेल्या भरत भेलेकरचा कुटूंबासह नातेवाई मित्र मंडळीनी सर्वत्र शोध घेवून देखील तो कुठेच न सापल्यामुळे अखेर दापोली पोलीस ठाण्यात  भरत भेलेकर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. भरत भेलकर नापत्ता झाल्याच्या नेमके दुस-याच दिवशी 3 जुलै रोजी भरत भेलेकर याची  पत्नी सुगंधा भेलेकर ही सकाळी 9.30 च्या सुमारास मुलांना शाळेत सोडायला जाते असे सांगून आराध्य ( 7) व श्री (4) या आपल्या मुलांना  मुगीज शाळा नंबर 1 या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणासाठी घेवून घरातून निघून गेली तीसुध्दा परत सायंकाळपर्यंत आपल्या घरी पुन्हा  परतलीच नाही.

आराध्य व श्री या चिमुकल्यांचा तसेच  सुगंधा हिचा सगळीकडे शोध घेण्यात आला मात्र ते तिघेही सापडलेले नाहीत तिच्या नातेवाईक व मित्रमंडळींकडेही चौकशी करण्यात आली मात्र त्यांचा कोठेही  ठावठिकाणा लागलाच नाही. दूरध्वनीवरही संपर्क  केला गेला मात्र  संपर्कच होत  नसल्यामुळे अखेर सुगंधा भेलेकर बेपत्ता झाल्याची तर आराध्य व श्री या दोघा लहान बालकांचे अपहरण झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.असुन अज्ञात संशयीतांवर भा.द.वि.क. 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळया प्रकरणी घटनेतील प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे सहा्ययक पोलीस फौजदार मिलींद चव्हाण हे  करत आहेत. तालुका पोलीस निरीक्षक श्री. अहिरे यांनी यासाठी खास एका पथकाची नियुक्ती केली आहे

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFamilyपरिवारMissingबेपत्ता होणं