शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

Ratnagiri: आधी वडील, मग आई आणि दोन मुले, एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता, दापोलीत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 12:09 IST

Ratnagiri:  रत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ आहे यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.

- शिवाजी गोरे

रत्नागिरीरत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ आहे यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी दापोली पोलिसांनी एक नियुक्त केले असून त्यांचा शोध अद्याप सुरू आहे. या घटनेमुळे दापोली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

2 जुलै रोजी दापोली तालूक्यातील विसापूर  गावातील पाथरीकोंड येथील आपल्या राहत्या घरातून भरत भेलेकर (34) हा दुपारी 2.30 च्या सुमारास बेपत्ता झाला.दुसऱ्याच दिवशी 3 जुलै रोजी भरत भेलेकर याची पत्नी सुगंधा भेलेकर ही सकाळी 9.30 च्या सुमारास मुलांना शाळेत सोडायला जाते असे सांगून आराध्य ( 7) व श्री (4) या आपल्या मुलांना  मुगीज शाळा नंबर 1 या जिल्हा परिषदेच्या शाळेत घेवून जाते सांगून घरातून निघून गेली तीसुध्दा अद्याप परतलीच नसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भरत याला घरातून निघून जाण्याची सवय आहे तो यापूर्वी पण असाच बेपत्ता झाला होता पण यावेळी पत्नी व दोन लहान मुले ही बेपत्ता झाल्याने सगळेच नातेवाईक व ग्रामस्थ चिंतेत असून शोशोध सुरू आहे.

या सगळ्या खळबळजनक प्रकाराचा छडा लावण्यासाठी पोलीसांसमोर हे मोठा आव्हान आहे. उपनिरीक्षक दर्जाचे नेतृत्वाखाली नेमण्यात आलेले पथक या कुटुंबाच्या शोधार्थ रवाना झाले आहे लवकरच काही माहिती हाती मिळेल असा विश्वास पोलिसांना आहे. मात्र या प्रकरणी अद्यापतरी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यामागे काही घरगुती भांडण किंवा अन्य काही घातपाताची तर नाही ना ? याचाही तपास पोलिसांनी युध्दपातळीवर सुरू केला आहे. 

दापोली तालूक्यातील विसापूर  गावातील पाथरीकोंड येथील आपल्या राहत्या घरातून भरत भेलेकर (34) हा दुपारी 2.30 च्या सुमारास त्याचा चुलत भाऊ सहदेव दत्ताराम भेलेकर यांच्यासोबत मंडणगड तालूक्यातील कुंबळे या ठिकाणी लाकडी पट्टी आणणे करीता जात आहे असे सांगून घरातून निघून गेला. तो अदयापपर्यंत घरी आलेलाच नाही. दुकानात जातो असे सांगून निघून गेलेल्या भरत भेलेकरचा कुटूंबासह नातेवाई मित्र मंडळीनी सर्वत्र शोध घेवून देखील तो कुठेच न सापल्यामुळे अखेर दापोली पोलीस ठाण्यात  भरत भेलेकर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. भरत भेलकर नापत्ता झाल्याच्या नेमके दुस-याच दिवशी 3 जुलै रोजी भरत भेलेकर याची  पत्नी सुगंधा भेलेकर ही सकाळी 9.30 च्या सुमारास मुलांना शाळेत सोडायला जाते असे सांगून आराध्य ( 7) व श्री (4) या आपल्या मुलांना  मुगीज शाळा नंबर 1 या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणासाठी घेवून घरातून निघून गेली तीसुध्दा परत सायंकाळपर्यंत आपल्या घरी पुन्हा  परतलीच नाही.

आराध्य व श्री या चिमुकल्यांचा तसेच  सुगंधा हिचा सगळीकडे शोध घेण्यात आला मात्र ते तिघेही सापडलेले नाहीत तिच्या नातेवाईक व मित्रमंडळींकडेही चौकशी करण्यात आली मात्र त्यांचा कोठेही  ठावठिकाणा लागलाच नाही. दूरध्वनीवरही संपर्क  केला गेला मात्र  संपर्कच होत  नसल्यामुळे अखेर सुगंधा भेलेकर बेपत्ता झाल्याची तर आराध्य व श्री या दोघा लहान बालकांचे अपहरण झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.असुन अज्ञात संशयीतांवर भा.द.वि.क. 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळया प्रकरणी घटनेतील प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे सहा्ययक पोलीस फौजदार मिलींद चव्हाण हे  करत आहेत. तालुका पोलीस निरीक्षक श्री. अहिरे यांनी यासाठी खास एका पथकाची नियुक्ती केली आहे

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFamilyपरिवारMissingबेपत्ता होणं