शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

रत्नागिरी : थ्रीप्समुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा धोक्यात, बागायतदारही संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 12:48 IST

थ्रीप्सचा प्रादुर्भाव महागडी कीटकनाशके वापरूनही आटोक्यात येत नसल्याने बागायतदारही संकटात.

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा हातात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, थ्रीप्सचा प्रादुर्भाव महागडी कीटकनाशके वापरूनही आटोक्यात येत नसल्याने बागायतदारही संकटात आहेत.

यावर्षी सर्वाधिक पालवीचे प्रमाण राहिले. ८० टक्के पालवी असल्याने शेतकरी पालवी कडक होऊन मोहर येण्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे थंडी पडलीच नाही. पहिल्या टप्प्यातील आंबा पीक दहा टक्केच होते. हा आंबा तयार होऊन बाजारात आला आहे. हा आंबा अल्प प्रमाणात आहे. १५०० ते ४५०० रूपये पेटी दराने विक्री सुरू आहे. एप्रिल अखेरपर्यंत पहिल्या टप्प्यातील आंबा बाजारात असला तरी याचे प्रमाण अत्यल्प राहणार आहे.

दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात मोहरच आला नाही. शेवटच्या टप्प्यात असलेल्या मोहराला फळधारणा झाली. मात्र, हवामानातील बदलामुळे थ्रीप्स, तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला. तुडतुड्यामुळे मोहर काळवंडला असून, थ्रीप्समुळे फळाचा आकार चिकू एवढा होऊन फळ गळही वाढली आहे.

संशोधन करणे आवश्यकमहागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही थ्रीप्स आटोक्यात येत नसल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा हातातून निसटला आहे. आतापर्यंत पीक वाचविण्यासाठी केला खर्च वाया गेल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. थ्रीप्स आटोक्यात न आल्यास पुढील वर्षीच्या उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो. याबाबत कृषी विभागाकडून संशोधन करणे आवश्यक आहे.थ्रीप्समुळे आंबा उत्पादन धोक्यात आले आहे. बाजारात थ्रीप्स प्रतिबंधात्मक कीटकनाशके उपलब्ध आहेत. महागडी कीटकनाशकांची फवारणी करूनही अपेक्षित फरक दिसत नाहीत. त्यामुळे कृषी विद्यापीठाने थ्रीप्सबाबत संशोधन करून प्रतिबंधात्मक कीटकनाशक बाजारात आणणे आवश्यक आहे.राजन कदमबागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा