शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रत्नागिरी : आमदारांकडून अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची खरडपट्टी, उदय सामंत आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 16:29 IST

तालुक्यातील बसणी -मांडवकरवाडी येथे नळकनेक्शन देण्यावरुन घाटी-कोकणी असा वाद निर्माण करणाऱ्या तसेच महिला सरपंचांना अपात्र व पोलिसी कारवाईची धमकी देणाऱ्या ग्रामपंचायत विभागाच्या प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकाºयासह कर्मचाऱ्यांची आमदार उदय सामंत यांनी ग्रामस्थांसमोरच खरडपट्टी काढली़

ठळक मुद्देआमदारांकडून अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची खरडपट्टी, उदय सामंत आक्रमक महिला सरपंचांना अयोग्य वागणूक

रत्नागिरी : तालुक्यातील बसणी -मांडवकरवाडी येथे नळकनेक्शन देण्यावरुन घाटी-कोकणी असा वाद निर्माण करणाऱ्या तसेच महिला सरपंचांना अपात्र व पोलिसी कारवाईची धमकी देणाऱ्या ग्रामपंचायत विभागाच्या प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांची आमदार उदय सामंत यांनी ग्रामस्थांसमोरच खरडपट्टी काढली़बसणी - मांडवकरवाडीमध्ये पाणीपुरवठा योजनेचे स्टॅण्डपोस्ट असतानाही कनेक्शन देण्यासाठी सरपंचांवर ग्रामपंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस़ एस़ आहेर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्याने दबाव टाकताना आताच्या आता नळकनेक्शन द्या अन्यथा पोलीस कारवाई आणि अपात्र ठरविण्याची धमकी सरपंचांना दिली होती़ याप्रकरणी बुधवारी आमदार सामंत, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह शिवसेना पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदेला भेट दिली़ त्यावेळी सर्व सभापती, सदस्य उदय बने, बाबू म्हाप उपस्थित होते़प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना अध्यक्षा स्वरुपा साळवी यांच्या केबीनमध्ये बोलावून झाल्याप्रकाराबद्दल आमदार सामंत यांनी चांगलेच फैलावर घेतले़ यावेळी संबंधितांनी कानावर हात ठेवले़ यावेळी आमदार सामंत यांनी आपण धमकी देणारे कोण, पुढारीपण करायचे असेल तर नोकरी सोडा, त्याचबरोबर यापुढे जिल्ह्यातील कोणत्याही सरपंचांना अशाप्रकारे वागणूक द्याल तर याद राखा, अशा शब्दात सुनावले़ त्याचबरोबर कोकणी-घाटी वाद निर्माण केल्याने जिल्हाप्रमुख चाळके, बने आणि म्हाप यांनीही कानउघडणी केली़ यावेळी सामंत यांचे अध्यक्षा स्वरुपा साळवी यांनी स्वागत केले़अधिकारी गप्पआमदार सामंत यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने संबंधित अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली होती़ यावेळी उदय बने यांनी एवढा विषय असताना अध्यक्षांसमोर का ठेवला नाही, असाही प्रश्न उपस्थित केला़ यावेळी संबंधित अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी