शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

  रत्नागिरी : सेवा समाप्तीचा आदेश कर्मचाऱ्यांनी झुगारला,  आंदोलन तीव्र करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 16:44 IST

सेवा समाप्तीचा जिल्हा परिषद प्रशासनाचा आदेश झुगारून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच आहे. पुढील टप्प्यातील लाँग मार्च आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे २५० कंत्राटी कर्मचारी नाशिकला रवाना झाले आहेत. अनेक अधिकारी कामावर हजर झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

ठळक मुद्देअधिकारी फुटले, कर्मचारी आंदोलनात, इतर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती एनआरएचएचच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरुच, लाँग मार्चसाठी जिल्ह्यातील २५० कर्मचारी नाशिकला रवाना १८ मेपासून नाशिक ते मुंबईपर्यंत लाँगमार्च

रत्नागिरी : सेवा समाप्तीचा जिल्हा परिषद प्रशासनाचा आदेश झुगारून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच आहे. पुढील टप्प्यातील लाँग मार्च आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे २५० कंत्राटी कर्मचारी नाशिकला रवाना झाले आहेत. अनेक अधिकारी कामावर हजर झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.शासनाने मागण्या मान्य न केल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या या १२०० कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. ते पहिल्या टप्प्यातील आंदोलनासाठी परिषद भवनासमोर बसले होते. त्यानंतरही शासनाने दखल न घेता उलट त्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली.येत्या ४८ तासात कामावर हजर न झाल्यास सेवा समाप्त करण्यात येईल, अशी नोटीस बुधवारी या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना बजावण्यात आली होती. नोटीसकडे दुर्लक्ष करुन एनआरएचएमच्या राज्य संघटनेच्या आदेशाचे पालन करीत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपले बेमुदत कामबंद आंदोलन सुरुच ठेवले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून बजावण्यात आलेल्या नोटीसमुळे जिल्ह्यातील सुमारे ४५ अधिकारी गुरुवारपासून कामावर रूजू झाले.प्रशासनाने बजावलेल्या सेवा समाप्तीच्या नोटीसला न जुमानता कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी नाशिकच्या दिशेने पावले उचलली आहेत. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून हे कर्मचारी नाशिक ते मुंबई असा १८ ते २८ मे लाँग मार्च काढणार आहेत. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे २५० कंत्राटी कर्मचारी रवाना झाले. ते खासगी गाड्या, रेल्वेने निघाले आहेत.आंदोलन सुरुचकाही जिल्ह्यांमध्ये शासनाने दिलेला आदेश झुगारून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरूच ठेवल्याने त्यांची सेवा समाप्त करण्यात आली. तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी न घाबरता आंदोलन सुरू ठेवले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीzpजिल्हा परिषदHealthआरोग्य