शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

रत्नागिरी जिल्ह्यात जलयुक्त शिवारची तिसऱ्या टप्प्यातील कामे रखडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 1:19 PM

राज्यातील प्रत्येक गाव पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले पाहिजे, यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्णत्त्वाच्या मार्गावर असताना तिसऱ्या टप्प्यासाठी अंतिम आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबंधारा बांधकाम निकषाच्या अडथळ्यांमुळे रखडपट्टी होण्याची शक्यतातीव्र उतारामुळे पाणी अडविणे कठीणसमतल जमिनीमुळे बंधाऱ्याचे काम रखडणार

रत्नागिरी : राज्यातील प्रत्येक गाव पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले पाहिजे, यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्णत्त्वाच्या मार्गावर असताना तिसऱ्या टप्प्यासाठी अंतिम आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यासाठी टंचाईग्रस्त गावांचीच निवड करण्यात आली आहे. परंतु, बंधारे बांधकामासाठीचे निकष हे कोकणच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता, राज्यासाठी एकसारखेच तयार केल्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील कामे रखडण्याची शक्यता आहे.तिसऱ्या टप्प्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ४० गावांची निवड करण्यात आली असून, यासाठी १८ कोटी १६ लाख २८ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. १ हजार ४२६ कामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विकास माथा ते पायथा या तत्त्वावर गावांची निवड करून वरच्या भागात ७० टक्के क्षेत्र व खालच्या भागात ३० टक्के विकासाची कामे हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभागाकडे१ हजार २७७ कामांचे उद्दिष्ट असून, १५९१.३० हेक्टर क्षेत्रावरील या कामांसाठी १२ कोटी ९६ लाख ९६ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे ७० कामांचे उद्दिष्ट असून, ४ कोटी ७० लाख ४३ हजार रूपयांचा निधी त्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडे अवघी तीन कामे सुपूर्द करण्यात आली असून, त्यासाठी ३ लाख ४० हजारांचा निधी मंजूर केला आहे. पंचायत समिती कृषी विभागाकडे ७६ कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी ४४ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.रत्नागिरी तालुक्यातील कामांसाठी १ कोटी ४४ लाख ५२ हजारांचा निधी, लांजा तालुक्याकरिता १४३ कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी २ कोटी ६५ लाख २५ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राजापूर तालुक्यातील ९८ कामांसाठी १ कोटी २२ लाख २६ हजारांचा निधी मंजूर केला आहे.

चिपळूण तालुक्याला १९५ कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी २ कोटी ७३ लाख ६८ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. गुहागर तालुक्यामध्ये एकूण ११६ कामे करण्यात येणार असून, त्यासाठी १ कोटी ३० लाख ५० हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. संगमेश्वर तालुक्यासाठी २०२ कामांचे उद्दिष्ट असून, २ कोटी २५ लाख १९ हजार रूपयांची निधी मंजूर झाला आहे.दापोली तालुक्याला एकूण ९९ कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी १ कोटी ३२ लाख ४८ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. खेड तालुक्याकरिता एकूण २७८ कामांचे उद्दिष्ट असून, ४ कोटी १५ लाख २ हजाराचा निधी त्यासाठी मंजूर केला आहे. मंडणगड तालुक्यातील ५५ कामांसाठी १ कोटी ७ लाख ३८ हजार रूपये इतका निधी मंजूर झालाआहे.तीव्र उतारामुळे पाणी अडविणे कठीणजलयुक्त शिवार अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या एका बंधाऱ्यात एक दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होत असेल तर त्यासाठी ८० हजार रूपये खर्च करण्याचा निकष लावण्यात आला आहे. साधारणत: सिमेंट नालाबांध बांधण्यासाठी जर १० ते १५ लाख रूपये खर्च करण्यात आले तर त्यामध्ये दहा दक्षलक्ष घनमीटर पाणीसाठा होणे अपेक्षित आहे. मात्र, कोकणात तीव्र उतार आहे. पाणी उंचावरून पडत असल्याने अशाप्रकारे बंधारा बांधणे शक्य नाही.समतल जमिनीमुळे बंधाऱ्याचे काम रखडणारराज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये समतल जमीन असल्याने अशाप्रकारे बंधारे बांधण्यासाठीचा निकष योग्य आहे. या निकषामुळे जिल्ह्यातील बंधाऱ्यांचे काम रखडणार आहे. सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम न होता केवळ अनगड दगडी बंधारे, जाळी बंधारे शिवाय वृक्षलागवडसारखी छोटी कामे जिल्ह्यात करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीJalyukt Shivarजलयुक्त शिवार