शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
5
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
6
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
7
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
8
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
9
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
10
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
11
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
12
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
13
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
14
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?
15
“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ
16
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
17
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
18
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
19
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
20
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य

रत्नागिरी जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’चे काम धीम्यागतीने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 13:26 IST

कोकणात उन्हाळी शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे, शेतकऱ्यांची स्वत:ची सिंचन व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ योजना सुरू केली आहे.

रत्नागिरी : कोकणात उन्हाळी शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे, शेतकऱ्यांची स्वत:ची सिंचन व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ योजना सुरू केली आहे. जिल्ह्यासाठी ४०० शेततळ्यांचे उद्दिष्ट असताना ३१७ शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केले होते. १९९ शेततळ्यांना प्रत्यक्ष मंजुरी मिळाली, पैकी ६७ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. १५५ शेततळ्यांची आखणी करून देण्यात आली असून, २५ शेततळ्यांची कामे सुरू आहेत. तर ६७ शेततळी बांधण्यासाठी आतापर्यंत २५ लाख २३ हजार रुपयांचा निधी शेतक-यांना वितरीत करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्हा डोंगराळ भागात द-याखो-यांमध्ये वसलेला आहे. कोकणात सर्वाधिक पाऊस पडूनसुध्दा पावसाचे पाणी साचून न राहता तीव्र उतारामुळे वाया जाते. जिल्ह्यात एकूण ७० हजार ३३४  हेक्टर क्षेत्रावर भातलागवड केली जाते. ही भातलागवड संपूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. तर खरीप हंगामात भाताबरोबर फळभाज्यांचेही उत्पन्न घेतले जाते. आॅक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये भाताची काढणी झाल्यानंतर रब्बीच्या पिकांची तयारी केली जाते. 

यावेळी नदीकाठच्या ओलसर जमिनीवर पावटा, कुळीथ, कडवा, तूर, तसेच भाजीपाला आदी पिके घेण्यात येतात. या पिकाला अधूनमधून नदी अथवा विहिरीचे पाणी दिले जाते. एकूणच पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणीच शेती करण्यात येते. शेतकरी जागृत होऊ लागले असून, त्यांच्याकडून ऊन्हाळी भात, भाजीपाला, कलिंगडाची लागवड करण्यात येत आहे.

जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली असून, यातील ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. तर ९१ हजार ५०३ हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली असून, यातील ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. याशिवाय नारळ व अन्य बागायतीदेखील फुलवण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश लागवड ही डोंगरउतारावर करण्यात आली आहे. कातळावरील लागवडीसाठी पाण्याची आवश्यकता भासते. अनेकांनी बागायतीमध्ये दूरवरून वाहिनी टाकून पाण्याची व्यवस्था केली आहे. 

परंतु, बहुतांश लागवड ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. जिल्ह्यातील फलोत्पादन बहरावे व येथील शेतकऱ्यांनी पावसाचे पाणी साठवून त्यावर शेती फुलवावी यासाठी शासनाकडून ‘शेततळी’ हा पर्याय सूचवण्यात आला आहे. यासाठी चौरस आकारातील खोल खड्डा खणून अथवा रिकाम्या चिऱ्याच्या खाणीवर प्लास्टिकच्या जाड कागदाचे आच्छादन पावसापूर्वी टाकण्यात आल्यानंतर पावसाचे पाणी साचून हे शेततळे भरते. 

या शेततळ्यातील पाण्याचा वापर शेतीसाठी केला जाऊ शकतो. ही शेततळी कोकणासाठी फायदेशीर ठरली आहेत, त्याप्रमाणे नुकसानदायकही ठरत आहेत. कडक ऊन्हामुळे बाष्पीभवन होत असल्याने  शेततळ्यातील पाण्याची पातळी कमी होते. शेततळ्यासाठी जेवढा खर्च केला जातो, त्या तुलनेत पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे ऐन ऊन्हाळ्यात शेततळ्यामध्ये खडखडात असतो.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी