शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' गावात साकारली पहिली साैरऊर्जेवरील नळपाणी याेजना, लवकरच लाेकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 15:35 IST

योजनेची चाचणी यशस्वी

प्रशांत सुर्वेमंडणगड : ‘जल जीवन मिशन’अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली साैरऊर्जेवर आधारित नळपाणी योजना मंडणगड तालुक्यातील पालघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत केळवत या ठिकाणी साकारण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाले असून, या योजनेची यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली. या याेजनेचे लवकरच लाेकार्पण करण्यात येणार आहे.वीजबिल किंवा थकबाकी या डाेकेदुखीतून सुटका हाेण्यासाठी केळवत गावातील ग्रामस्थांनी साैरऊर्जेवर आधारीत नळपाणी याेजना यशस्वी करण्याचा निर्धार केला. गावातील नळपाणी याेजनेच्या पुनर्दुरुस्तीसाठी एक लाख चार हजार ४०० रुपये एवढा निधी खर्ची घालण्यात आला आहे. या याेजनेतून ७७ कुटुंबांना वैयक्तिक नळ जाेडणी देण्यात आली असून, एक लाख ४० हजार इतकी लाेकवर्गणी जमा करण्यात आली आहे. ही रक्कम पाणीपुरवठा स्वच्छता समितीच्या नावे ठेवण्यात आली आहे. याेजनेसाठी पाच एच.पी. साेलर बसविण्यात आले आहेत.    नळपाणी योजनेसाठी आवश्यक असलेल्या विजेसाठी सौरऊर्जेचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे  भविष्यात ही योजना कार्यरत राहण्यासाठी  वीजबिल देयक किंवा थकबाकी हा प्रश्न उद्भवणार नाही.  त्यामुळे ती चिंता मिटली आहे. तसेच या योजनेसाठी बसवण्यात आलेल्या पॅनेलची देखभाल व दुरुस्ती  पाच वर्षे पॅनेल बसविणारी  कंपनीच करणार आहे. योजनेचे ऑपरेटींग व मॅनेजमेंटसाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ ग्रामपंचायत स्तरावर निर्माण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे.जिल्ह्यातील पहिलीच साैरऊर्जेवरील ही नळपाणी याेजना असून, या याेजनेची यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली आहे. या चाचणीवेळी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता प्रतिभा शेरकर, अभियंता विष्णू पवार, जिल्हा समन्वयक कुमार शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी