शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रत्नागिरी : ३४३ बांधकामे नियमित करण्याला फटका, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोहिम थंडावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 16:38 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील सरकारी जमिनीवरील ३४३ अनधिकृत घरे शासनाच्या धोरणानुसार कायम करण्यात येणार होती़ मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामे नियमित करता येणार नाही, असा निर्णय दिल्याने जिल्ह्यातील ३४३ अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या मोहिमेला फटका बसणार आहे़. 

ठळक मुद्देअनधिकृत बांधकामे नियमित करता येणार नाहीत, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयग्रामपंचायतींनी अनधिकृत बांधकामांची केली होती पाहणी, जिल्हा परिषदेला अहवाल

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सरकारी जमिनीवरील ३४३ अनधिकृत घरे शासनाच्या धोरणानुसार कायम करण्यात येणार होती़ मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामे नियमित करता येणार नाही, असा निर्णय दिल्याने जिल्ह्यातील ३४३ अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या मोहिमेला फटका बसणार आहे़. दि़ ३१ डिसेंबर, २०१५ पूर्वीच्या अवैध, अनधिकृत इमारतींना सरंक्षण देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्यात दुरुस्ती केली होती़ त्याचा फायदा राज्यभरातील सरकारी जमिनींवर असलेल्या अनधिकृत, अवैध बांधकामांना मिळणार होता़ कारण ही सर्व बांधकामे नियमित करण्यात येणार होती़. 

सरकारी जमिनींवरील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने अशा बांधकामांची पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिले होते़ त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी तपासणी करुन सदरचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला होता. शासनाच्या धोरणानुसार ही अनधिकृत, अवैध बांधकामे अधिकृत करण्याच्या दृष्टीने धावपळ सुरु झाली होती़ मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने शासनाने घेतलेल्या अनधिकृत, बेकायदेशीर, अवैध बांधकामांना कायम करता येणार नसल्याचा निर्णय दिल्याने जिल्ह्यातील अवैध, अनधिकृत ३४३ बांधकामांना नियमित करण्याचे मनसुबे उधळले आहेत़ मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या मोहिमेलाही चाप बसला आहे़. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत ३४३ घरे अनधिकृत आहे़. 

तालुकानिहाय अनधिकृत बांधकामे

  1. रत्नागिरी २६५
  2. चिपळूण ४७
  3. दापोली १०
  4. लांजा ५
  5. मंडणगड १६ 

एकूण- ३४३

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी