शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

रत्नागिरी : ३४३ बांधकामे नियमित करण्याला फटका, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोहिम थंडावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 16:38 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील सरकारी जमिनीवरील ३४३ अनधिकृत घरे शासनाच्या धोरणानुसार कायम करण्यात येणार होती़ मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामे नियमित करता येणार नाही, असा निर्णय दिल्याने जिल्ह्यातील ३४३ अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या मोहिमेला फटका बसणार आहे़. 

ठळक मुद्देअनधिकृत बांधकामे नियमित करता येणार नाहीत, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयग्रामपंचायतींनी अनधिकृत बांधकामांची केली होती पाहणी, जिल्हा परिषदेला अहवाल

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सरकारी जमिनीवरील ३४३ अनधिकृत घरे शासनाच्या धोरणानुसार कायम करण्यात येणार होती़ मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामे नियमित करता येणार नाही, असा निर्णय दिल्याने जिल्ह्यातील ३४३ अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या मोहिमेला फटका बसणार आहे़. दि़ ३१ डिसेंबर, २०१५ पूर्वीच्या अवैध, अनधिकृत इमारतींना सरंक्षण देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्यात दुरुस्ती केली होती़ त्याचा फायदा राज्यभरातील सरकारी जमिनींवर असलेल्या अनधिकृत, अवैध बांधकामांना मिळणार होता़ कारण ही सर्व बांधकामे नियमित करण्यात येणार होती़. 

सरकारी जमिनींवरील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने अशा बांधकामांची पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिले होते़ त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी तपासणी करुन सदरचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला होता. शासनाच्या धोरणानुसार ही अनधिकृत, अवैध बांधकामे अधिकृत करण्याच्या दृष्टीने धावपळ सुरु झाली होती़ मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने शासनाने घेतलेल्या अनधिकृत, बेकायदेशीर, अवैध बांधकामांना कायम करता येणार नसल्याचा निर्णय दिल्याने जिल्ह्यातील अवैध, अनधिकृत ३४३ बांधकामांना नियमित करण्याचे मनसुबे उधळले आहेत़ मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या मोहिमेलाही चाप बसला आहे़. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत ३४३ घरे अनधिकृत आहे़. 

तालुकानिहाय अनधिकृत बांधकामे

  1. रत्नागिरी २६५
  2. चिपळूण ४७
  3. दापोली १०
  4. लांजा ५
  5. मंडणगड १६ 

एकूण- ३४३

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी