शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : गणेशोत्सव कालावधीत ग्राहकांनी खबरदारी घ्यावी..महावितरणचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 16:06 IST

गणेशोत्सव सुरू झाला आहे. घरोघरी गणेशमूर्ती आणण्यात आल्या आहेत. आराशीला सुशोभित करण्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाईही केली जाते. मात्र, विद्युत रोषणाई करीत असताना खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणच्या कोकण परिमंडळातर्फे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सव कालावधीत ग्राहकांनी खबरदारी घ्यावीमहावितरणचे आवाहन : विद्युत रोषणाई करताना सावधान

रत्नागिरी : गणेशोत्सव सुरू झाला आहे. घरोघरी गणेशमूर्ती आणण्यात आल्या आहेत. आराशीला सुशोभित करण्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाईही केली जाते. मात्र, विद्युत रोषणाई करीत असताना खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणच्या कोकण परिमंडळातर्फे करण्यात आले आहे.गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असली तरी तात्पुरती सवलतीच्या दरात वीजजोडणी घेणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात अवघी १९ आहे. रत्नागिरी शहरात ६, राजापूर १, लांजा १, चिपळूण शहर ४, खेडमध्ये १, दापोली १ मध्ये २, दापोली २ मध्ये १, मिळून १६ जोडण्या घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातून सिंगल फेजचे एकूण १० व थ्री फेजचे ६ मिळून १६ जोडण्यांची मागणी केली होती, त्यानुसार महावितरणकडून जोडण्या देण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असताना महावितरणने उत्सव कालावधीत महावितरणने सवलतीच्या दरात वीजपुरठा घेण्याचे आवाहन केले आहे. उत्सव कालावधीसाठी सवलतीच्या दरात वीज पुरवठा केला जातो. प्रतियुनिट ४ रूपये ३८ पैसे दराने वीज दर आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून उत्सव कालावधीसाठी वीज जोडणी देत असताना अनामत रक्कम घेण्यात येते. अनामत रकमेतून वीज वापराच्या रकमेशिवाय उर्वरित रक्कम संबंधित सार्वजनिक मंडळांना परत करण्यात येणार आहे.वीज वाहिन्यांसाठी गणेशमूर्ती अडचणीच्या ठरणार नाहीत, अशा प्रकारे ठेवून प्राणांतिक अपघात टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. शिवाय गणपती उत्सवाच्या कालावधीत वीज जोडणी व रोषणाई मान्यताप्राप्त ठेकेदाराकडून करण्याचे आवाहन केले आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विद्युत संचाच्या जोडणीची तपासणी विद्युत निरीक्षकांकडून करून घ्यावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी खड्डे करताना वीज वाहिन्या किंवा भूमिगत वाहिन्यांना धोका होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरगुती, सार्वजनिक ठिकाणी वाहिन्या उघड्या राहणार नाहीत, अशी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अखंड वीजपुरवठाविजेच्या लघुदाब व उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा या देखाव्याला स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावे, तसेच श्रींच्या मिरवणुकीवेळी वीज वाहिन्यांना स्पर्श होणार नाही, अशी खबरदारी घ्यावी. उत्सवाच्या काळात अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे, असे अधीक्षक अभियंता प्रभाकर पेठकर यांनी सांगितले.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी