शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

रत्नागिरी : गणेशोत्सव कालावधीत ग्राहकांनी खबरदारी घ्यावी..महावितरणचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 16:06 IST

गणेशोत्सव सुरू झाला आहे. घरोघरी गणेशमूर्ती आणण्यात आल्या आहेत. आराशीला सुशोभित करण्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाईही केली जाते. मात्र, विद्युत रोषणाई करीत असताना खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणच्या कोकण परिमंडळातर्फे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सव कालावधीत ग्राहकांनी खबरदारी घ्यावीमहावितरणचे आवाहन : विद्युत रोषणाई करताना सावधान

रत्नागिरी : गणेशोत्सव सुरू झाला आहे. घरोघरी गणेशमूर्ती आणण्यात आल्या आहेत. आराशीला सुशोभित करण्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाईही केली जाते. मात्र, विद्युत रोषणाई करीत असताना खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणच्या कोकण परिमंडळातर्फे करण्यात आले आहे.गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असली तरी तात्पुरती सवलतीच्या दरात वीजजोडणी घेणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात अवघी १९ आहे. रत्नागिरी शहरात ६, राजापूर १, लांजा १, चिपळूण शहर ४, खेडमध्ये १, दापोली १ मध्ये २, दापोली २ मध्ये १, मिळून १६ जोडण्या घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातून सिंगल फेजचे एकूण १० व थ्री फेजचे ६ मिळून १६ जोडण्यांची मागणी केली होती, त्यानुसार महावितरणकडून जोडण्या देण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असताना महावितरणने उत्सव कालावधीत महावितरणने सवलतीच्या दरात वीजपुरठा घेण्याचे आवाहन केले आहे. उत्सव कालावधीसाठी सवलतीच्या दरात वीज पुरवठा केला जातो. प्रतियुनिट ४ रूपये ३८ पैसे दराने वीज दर आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून उत्सव कालावधीसाठी वीज जोडणी देत असताना अनामत रक्कम घेण्यात येते. अनामत रकमेतून वीज वापराच्या रकमेशिवाय उर्वरित रक्कम संबंधित सार्वजनिक मंडळांना परत करण्यात येणार आहे.वीज वाहिन्यांसाठी गणेशमूर्ती अडचणीच्या ठरणार नाहीत, अशा प्रकारे ठेवून प्राणांतिक अपघात टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. शिवाय गणपती उत्सवाच्या कालावधीत वीज जोडणी व रोषणाई मान्यताप्राप्त ठेकेदाराकडून करण्याचे आवाहन केले आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विद्युत संचाच्या जोडणीची तपासणी विद्युत निरीक्षकांकडून करून घ्यावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी खड्डे करताना वीज वाहिन्या किंवा भूमिगत वाहिन्यांना धोका होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरगुती, सार्वजनिक ठिकाणी वाहिन्या उघड्या राहणार नाहीत, अशी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अखंड वीजपुरवठाविजेच्या लघुदाब व उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा या देखाव्याला स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावे, तसेच श्रींच्या मिरवणुकीवेळी वीज वाहिन्यांना स्पर्श होणार नाही, अशी खबरदारी घ्यावी. उत्सवाच्या काळात अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे, असे अधीक्षक अभियंता प्रभाकर पेठकर यांनी सांगितले.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी