शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

रत्नागिरी मतदारसंघाला दुसºयांदा मंत्रीपद ? मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा : उदय सामंत यांचे नाव पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:49 IST

रत्नागिरी : महाराष्टÑ राज्य स्थापनेनंतर तब्बल ५३ वर्षांनी २०१३ साली रत्नागिरी विधानसभा मतदार संघाला सर्वप्रथम मंत्रीपद मिळाले होते.

प्रकाश वराडकर ।रत्नागिरी : महाराष्टÑ राज्य स्थापनेनंतर तब्बल ५३ वर्षांनी २०१३ साली रत्नागिरी विधानसभा मतदार संघाला सर्वप्रथम मंत्रीपद मिळाले होते. राष्टÑवादी कॉँग्रेसचे तत्कालिन आमदार उदय सामंत हे मंत्री झाले होते. आता पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे घोंगावत असून, गुजरात निवडणुकांच्या निकालानंतर होणाºया संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात आता सेनेत असलेले आमदार उदय सामंत यांच्या रुपाने रत्नागिरीला दुसºयांदा मंत्रीपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्टÑाच्या सागरी किनाºयावरील ओखी वादळ शमते न शमते तोच राज्याच्या राजकारणात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे घोंगावू लागले आहेत. गुजरात निवडणुका तसेच विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर हा विस्तार होण्याचे संकेत मिळत असून, मंत्रीपदासाठी शिवसेनेतर्फे चर्चेत असलेल्या तीन नेत्यांमध्ये रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्या नावाचा समावेश असल्याची चर्र्र्चा शिवसेना वर्तुळात आहे.

आतापर्यंत सामंत यांच्यासह राज्य मंत्रिमंडळात जिल्ह्यातील एकूण सहा जणांना प्रतिनिधीत्व मिळाले आहे. याआधी राजापूर, दापोली, चिपळूण व गुहागर मतदारसंघांना मंत्रीपदे मिळाली होती. २०१३मध्ये राष्टÑवादीत असलेले आमदार उदय सामंत यांच्या रुपाने रत्नागिरीला सर्वप्रथम मंत्रीपद मिळाले होते. जिल्ह्यात याआधी ज्यांना मंत्रीपदे मिळाली, त्यात दापोलीचे बाबुराव बेलोसे, राजापूरचे ल. र. हातणकर (कॉँग्रेस), चिपळूणचे हुसेन दलवाई (कॉँग्रेस), देवरुख - संगमेश्वरचे रवींद्र माने (शिवसेना), खेडचे रामदास कदम (शिवसेना), गुहागर मतदारसंघातून निवडून आलेले भास्कर जाधव (राष्टÑवादी काँग्रेस) यांचा समावेश आहे. रत्नागिरीत निवडून आलेले शिवसेनेचे तत्कालिन आमदार शिवाजी गोताड यांना राज्य मार्ग परिवहन मंडळाचे अध्यक्षपद मिळाले होते, तर त्याआधी बॅ. ए. आर. अंतुले हे मुख्यमंत्रीपदी असताना तत्कालिन आमदार श्यामराव पेजे यांची मंत्रीपदाची संधी हुकली होती. २०१३मध्ये मंत्री झाल्यानंतर २०१४च्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी राष्टÑवादीला रामराम केला व शिवसेनेत प्रवेश करून रत्नागिरीतून विधानसभा निवडणूक जिंकली.मंत्रीपद : सेनेचे अन्य आमदारही इच्छुकसेनेत प्रवेश केल्यानंतर सामंत यांनातत्काळ मंत्रीपद दिले गेले असते तर पक्षात असंतोषाची शक्यता होती.शिवसेनेतून मंत्रीपदासाठी जिल्ह्यातील आणखी काही आमदारही मातोश्रीकडे डोळे लावून बसले आहेत.सेनेत आपली ताकद सिध्द केल्यानंतर आता उदय सामंत यांना मंत्रीपदाच्या संधीचे दार उघडले जाण्याची दाट शक्यता.महाराष्टÑ विधानसभेच्या २०१४मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी आमदार उदय सामंत यांनी राष्टÑवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. सेनेतर्फे रत्नागिरीतून विधानसभेवर ते पुन्हा निवडून आले. त्यानंतर गेल्या तीन वर्षांच्या काळात मंत्रीपदाने त्यांना अनेकदा हुलकावणी दिली आहे. मात्र, या काळात त्यांनी आपल्या कामाच्या रूपाने जिल्ह्यातील सेनेत आपले स्थान मजबूत केल्याने यावेळी संधी नक्की असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणUday Samantउदय सामंत