शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

रत्नागिरी कॉँग्रेसला दोन वर्ष जिल्हाध्यक्षच नाही

By admin | Updated: June 21, 2017 16:10 IST

नेत्यांमधील अंतर्गत वाद : अनेक कार्यकर्त्यांनी धरली अन्य पक्षांची वाट

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी , दि. २१ : नेत्यांमधील अंतर्गत लाथाळ्या व गटबाजीमुळे कॉँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्षपद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे कॉँग्रेस कार्यकर्त्यांची मोठीच कोंडी झाली आहे. वरिष्ठ नेतेही जिल्हाध्यक्ष पदाबाबत कोणताही निर्णय घेत नसल्याने जिल्ह्यात कॉँग्रेस पक्ष मोडीतच काढायचा प्रयत्न सुरू आहे का? असा प्रश्न जिल्ह्यातील कॉँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. नेत्यांमधील अंतर्गत वादामुळे दोन वर्षांच्या काळात कॉँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी अन्य पक्षांची वाट धरली आहे.जिल्हाध्यक्षांची नियुक्ती दोन दिवसात न केल्यास जिल्ह्यातील कॉँग्रेसजन त्यांच्या पदांचे राजीनामे देतील, असा इशारा २१ मार्च रोजी जिल्ह्यातील कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कॉँग्रेसभवन येथील पत्रकार परिषदेत दिला होता. हा इशारा देण्यामागे कार्यकर्त्यांचा उद्देश नक्कीच प्रामाणिक होता. त्यामुळे त्यांनी राजीनामे देणे न देणे हा वेगळा विषय आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये केवळ माजी खासदार नीलेश राणे यांचे समर्थक होते, असे मानण्याचे कारण नाही. राणे यांनी या विषयावर मार्ग काढण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील असंख्य कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी आपापल्या पदांचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. दोन वर्षे पक्षाला जिल्हाध्यक्ष नाही तरीही कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम सुरु ठेवले आहे. यातून अजूनही सामान्य कार्यकर्त्यांना कॉँग्रेसचे अस्तित्व टिकून राहावे, असे वाटते. जिल्ह्यात कॉँग्रेसकडे कार्यकर्ते आहेत, मात्र नेतृत्व नसल्याने त्यांची स्थिती दिशाहीन जहाजासारखी झाली आहे. जिल्ह्यातील कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत कॉँग्रेसच्या वरिष्ठांना आतातरी पक्षाला जिल्हाध्यक्ष द्या, असा संदेश दिला होता. आपल्या पदांचा राजीनामा देणार असल्याचा इशारा देऊन कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मात्र, त्यांच्या या मागणीला अजूनही वरिष्ठांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील उरल्यासुरल्या कॉँग्रेसजनांमध्येही नैराश्याचे वातावरण आहे. जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांमधील कॉँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय हवा आहे. त्यामुळेच जिल्हाध्यक्ष द्या, अन्यथा सर्व तालुक्यातील कॉँग्रेसचे पदाधिकारी सामुहिक राजीनामे देतील, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला होता. या इशाऱ्याला आता तीन महिन्यांचा कालावधी होत आला, तरीही वरिष्ठांनी मागणीची दखल न घेतल्याने जिल्हा कॉँग्रेसमध्ये संतापाची भावना आहे. जिल्हाध्यक्षपद नियुक्तीबाबत सर्व कॉँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लवकरात लवकर मार्ग काढण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.