शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

रत्नागिरी कॉँग्रेसला दोन वर्ष जिल्हाध्यक्षच नाही

By admin | Updated: June 21, 2017 16:10 IST

नेत्यांमधील अंतर्गत वाद : अनेक कार्यकर्त्यांनी धरली अन्य पक्षांची वाट

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी , दि. २१ : नेत्यांमधील अंतर्गत लाथाळ्या व गटबाजीमुळे कॉँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्षपद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे कॉँग्रेस कार्यकर्त्यांची मोठीच कोंडी झाली आहे. वरिष्ठ नेतेही जिल्हाध्यक्ष पदाबाबत कोणताही निर्णय घेत नसल्याने जिल्ह्यात कॉँग्रेस पक्ष मोडीतच काढायचा प्रयत्न सुरू आहे का? असा प्रश्न जिल्ह्यातील कॉँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. नेत्यांमधील अंतर्गत वादामुळे दोन वर्षांच्या काळात कॉँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी अन्य पक्षांची वाट धरली आहे.जिल्हाध्यक्षांची नियुक्ती दोन दिवसात न केल्यास जिल्ह्यातील कॉँग्रेसजन त्यांच्या पदांचे राजीनामे देतील, असा इशारा २१ मार्च रोजी जिल्ह्यातील कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कॉँग्रेसभवन येथील पत्रकार परिषदेत दिला होता. हा इशारा देण्यामागे कार्यकर्त्यांचा उद्देश नक्कीच प्रामाणिक होता. त्यामुळे त्यांनी राजीनामे देणे न देणे हा वेगळा विषय आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये केवळ माजी खासदार नीलेश राणे यांचे समर्थक होते, असे मानण्याचे कारण नाही. राणे यांनी या विषयावर मार्ग काढण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील असंख्य कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी आपापल्या पदांचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. दोन वर्षे पक्षाला जिल्हाध्यक्ष नाही तरीही कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम सुरु ठेवले आहे. यातून अजूनही सामान्य कार्यकर्त्यांना कॉँग्रेसचे अस्तित्व टिकून राहावे, असे वाटते. जिल्ह्यात कॉँग्रेसकडे कार्यकर्ते आहेत, मात्र नेतृत्व नसल्याने त्यांची स्थिती दिशाहीन जहाजासारखी झाली आहे. जिल्ह्यातील कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत कॉँग्रेसच्या वरिष्ठांना आतातरी पक्षाला जिल्हाध्यक्ष द्या, असा संदेश दिला होता. आपल्या पदांचा राजीनामा देणार असल्याचा इशारा देऊन कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मात्र, त्यांच्या या मागणीला अजूनही वरिष्ठांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील उरल्यासुरल्या कॉँग्रेसजनांमध्येही नैराश्याचे वातावरण आहे. जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांमधील कॉँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय हवा आहे. त्यामुळेच जिल्हाध्यक्ष द्या, अन्यथा सर्व तालुक्यातील कॉँग्रेसचे पदाधिकारी सामुहिक राजीनामे देतील, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला होता. या इशाऱ्याला आता तीन महिन्यांचा कालावधी होत आला, तरीही वरिष्ठांनी मागणीची दखल न घेतल्याने जिल्हा कॉँग्रेसमध्ये संतापाची भावना आहे. जिल्हाध्यक्षपद नियुक्तीबाबत सर्व कॉँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लवकरात लवकर मार्ग काढण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.