शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी कॉँग्रेसला दोन वर्ष जिल्हाध्यक्षच नाही

By admin | Updated: June 21, 2017 16:10 IST

नेत्यांमधील अंतर्गत वाद : अनेक कार्यकर्त्यांनी धरली अन्य पक्षांची वाट

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी , दि. २१ : नेत्यांमधील अंतर्गत लाथाळ्या व गटबाजीमुळे कॉँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्षपद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे कॉँग्रेस कार्यकर्त्यांची मोठीच कोंडी झाली आहे. वरिष्ठ नेतेही जिल्हाध्यक्ष पदाबाबत कोणताही निर्णय घेत नसल्याने जिल्ह्यात कॉँग्रेस पक्ष मोडीतच काढायचा प्रयत्न सुरू आहे का? असा प्रश्न जिल्ह्यातील कॉँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. नेत्यांमधील अंतर्गत वादामुळे दोन वर्षांच्या काळात कॉँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी अन्य पक्षांची वाट धरली आहे.जिल्हाध्यक्षांची नियुक्ती दोन दिवसात न केल्यास जिल्ह्यातील कॉँग्रेसजन त्यांच्या पदांचे राजीनामे देतील, असा इशारा २१ मार्च रोजी जिल्ह्यातील कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कॉँग्रेसभवन येथील पत्रकार परिषदेत दिला होता. हा इशारा देण्यामागे कार्यकर्त्यांचा उद्देश नक्कीच प्रामाणिक होता. त्यामुळे त्यांनी राजीनामे देणे न देणे हा वेगळा विषय आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये केवळ माजी खासदार नीलेश राणे यांचे समर्थक होते, असे मानण्याचे कारण नाही. राणे यांनी या विषयावर मार्ग काढण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील असंख्य कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी आपापल्या पदांचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. दोन वर्षे पक्षाला जिल्हाध्यक्ष नाही तरीही कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम सुरु ठेवले आहे. यातून अजूनही सामान्य कार्यकर्त्यांना कॉँग्रेसचे अस्तित्व टिकून राहावे, असे वाटते. जिल्ह्यात कॉँग्रेसकडे कार्यकर्ते आहेत, मात्र नेतृत्व नसल्याने त्यांची स्थिती दिशाहीन जहाजासारखी झाली आहे. जिल्ह्यातील कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत कॉँग्रेसच्या वरिष्ठांना आतातरी पक्षाला जिल्हाध्यक्ष द्या, असा संदेश दिला होता. आपल्या पदांचा राजीनामा देणार असल्याचा इशारा देऊन कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मात्र, त्यांच्या या मागणीला अजूनही वरिष्ठांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील उरल्यासुरल्या कॉँग्रेसजनांमध्येही नैराश्याचे वातावरण आहे. जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांमधील कॉँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय हवा आहे. त्यामुळेच जिल्हाध्यक्ष द्या, अन्यथा सर्व तालुक्यातील कॉँग्रेसचे पदाधिकारी सामुहिक राजीनामे देतील, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला होता. या इशाऱ्याला आता तीन महिन्यांचा कालावधी होत आला, तरीही वरिष्ठांनी मागणीची दखल न घेतल्याने जिल्हा कॉँग्रेसमध्ये संतापाची भावना आहे. जिल्हाध्यक्षपद नियुक्तीबाबत सर्व कॉँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लवकरात लवकर मार्ग काढण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.