शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणुक: काँग्रेसमधील गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 1:10 PM

काँग्रेसमध्ये निर्माण झालेली गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर पडणार का, या चर्चेला आता उधाण आले आहे.

रत्नागिरी: नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देऊन राज्यातील महाविकास आघाडीचे सत्ता समीकरण राबविण्याच्या बाजूने स्थानिक काँग्रेसमधील एक गट कार्यरत आहे, तर राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी दाखल केलेल्या मिलिंद कीर यांना पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमधील दुसरा गट सक्रिय आहे. परिणामी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर पडणार का, या चर्चेला आता उधाण आले आहे.

रलागिरीच्या नगराध्यक्ष पदावरून शिवसेनेचे राहुल पंडित यांनी सहा महिन्यांपूर्वीच राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. पद रिक्त असलेल्या काळात शिवसेनेचे तालुकाप्रमुख नगरसेवक बंड्या साळवी यांनी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. आता येत्या २९ डिसेंबरला थेट नगराध्यक्ष निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे तालुकाप्रमुख व प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप प्रताप तथा बंड्या साळवी यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर व भाजपचे जिल्हा अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी उमेदवारी दाखल केली आहे. मनसेचे रूपेश सावंत व अपक्ष मुकुंद जोशी हेसुध्दा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राजकीय समीकरणे सातत्याने बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीतर्फे अर्ज भरण्याऐवजी मिलिंद कीर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना शहर विकास आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन विकास आघाडी व अन्य घटक पक्षांचा पाठिंबा राहणार आहे.

काँग्रेसने या निवडणुकीत प्रथम आघाडीपासून अलिप्तता दाखवित स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर स्वतंत्र उमेदवार उभा करण्यास काँग्रेसमधील एक गटाने विरोध केला. हा गट महाविकास आघाडीच्या दिशेने जात शिवसेनेकडे झुकत असल्याचे दिसताच जिल्हाअध्यक्ष विजय भोसले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद कीर यांना काँग्रेस पाठिबा देत असल्याचे पत्र दिले आहे.

लांजावर ठरणार: 17 ची बैठक महत्वाची

राष्ट्रवादीला पाठींबा दिल्यानंतर काँग्रेसने पुन्हा भूमिका बदलली आहे. राष्ट्रवादीला पाठींबा द्यावा किंवा नाही, याबाबतचा निर्णय लांजा नगर पंचायत निवडणुकीत आघाडी करण्याबाबतच्या निर्णयावर अवलंबून आहे. 17 डिसेंबरला काँग्रेस व राष्ट्रवादीची या विषयावर संयुक्त बैठक होणार असून, त्यावेळी रत्नागिरीत राष्ट्रवादीला पाठींबा द्यायचा की नाही, हे ठरणार आहे. या सर्व राजकीय घडामोडींचा आढावा घेता काँग्रेसमधील गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका गटाचे सहकार्य शिवसेनेचे उमेदवार बंडया साळवी यांना मिळण्याची शक्यता आहे. परिणामी काँग्रेसमधील ही गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता अधिक आहे.