शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

रत्नागिरीत संततधार, शाळा सोडल्या, राजापूर पुन्हा जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 17:46 IST

रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी संततधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. वेरवली कोंड येथे विद्युत भारीत तार तुटून दोन म्हैशी जागीच ठार झाल्याची घटना सकाळी ७.३० वाजता घडली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत संततधार, शाळा सोडल्या, राजापूर पुन्हा जलमय

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी संततधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. वेरवली कोंड येथे विद्युत भारीत तार तुटून दोन म्हैशी जागीच ठार झाल्याची घटना सकाळी ७.३० वाजता घडली आहे.रत्नागिरी शहरातही पावसाचा सकाळपासूनच जोर असल्यामुळे शहरातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील अडरे नदीला पूर आला परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने विद्यार्थी, कामगारांना पुन्हा माघारी फिरावे लागले. वशिष्ठी नदीने पुन्हा पातळी सोडल्यामुळे चिपळूण बाजारपेठेत पाणी झाले असून शहर जलमय झाले आहे.नदीतील पाणी शेतात घुसल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कान्हे पुलावरून पाणी जात असल्याने हा मार्गही बंद झाला आहे. असाच पाऊस राहिल्यास पंचक्रोशीतील जनजीवन विस्कळित होणार आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. पावसामुळे चांदेराई बाजारपेठेत पाणीच पाणी झाले असून चांदेराइ - लांजा मार्ग बंद करण्यात आला आहे. या मार्गावर ५ फूट पाणी आहे.संगमेश्वर तालुक्यात सलग  मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. संगमेश्वर, माखजनला पुराचा धोका निर्माण झाला आहे. सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे लांजा चिंचुर्टी येथे जाणाºया घाटातील मार्गावरील मोरी वाहून गेल्याने एस.टी. वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे येथील नागरिक व विद्यार्थ्यांना १० किलोमीटरवर पायपीट करावी लागत आहे.राजापूर शहरातपुन्हा पुराचे पाणीअर्जुना व कोदवली नद्यांना पाण्याची पातळी वाढत आहे शाळा-महाविद्यालये सोडून दिली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे शहरात येणारे सर्व मार्ग बंद झाले आहेत. व्यापारी व नागरिकांनी सुरक्षित स्थळी सामान हलवले आहे. सोमवारी सकाळ पासूनच पावसाचा जोर वाढला होता. सोमवारी सकाळपासून शहरातील जवाहर चौकात पुराच्या पाण्याचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. सोमवारी शिवाजी पथ मछी मार्केट, वरची पेठ भागात पुराचे पाणी भरले होते . पावसाचा जोर अद्यापही कायम असल्यामुळे पाणी वाढत आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी