शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

रत्नागिरीत संततधार, शाळा सोडल्या, राजापूर पुन्हा जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 17:46 IST

रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी संततधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. वेरवली कोंड येथे विद्युत भारीत तार तुटून दोन म्हैशी जागीच ठार झाल्याची घटना सकाळी ७.३० वाजता घडली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत संततधार, शाळा सोडल्या, राजापूर पुन्हा जलमय

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी संततधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. वेरवली कोंड येथे विद्युत भारीत तार तुटून दोन म्हैशी जागीच ठार झाल्याची घटना सकाळी ७.३० वाजता घडली आहे.रत्नागिरी शहरातही पावसाचा सकाळपासूनच जोर असल्यामुळे शहरातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील अडरे नदीला पूर आला परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने विद्यार्थी, कामगारांना पुन्हा माघारी फिरावे लागले. वशिष्ठी नदीने पुन्हा पातळी सोडल्यामुळे चिपळूण बाजारपेठेत पाणी झाले असून शहर जलमय झाले आहे.नदीतील पाणी शेतात घुसल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कान्हे पुलावरून पाणी जात असल्याने हा मार्गही बंद झाला आहे. असाच पाऊस राहिल्यास पंचक्रोशीतील जनजीवन विस्कळित होणार आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. पावसामुळे चांदेराई बाजारपेठेत पाणीच पाणी झाले असून चांदेराइ - लांजा मार्ग बंद करण्यात आला आहे. या मार्गावर ५ फूट पाणी आहे.संगमेश्वर तालुक्यात सलग  मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. संगमेश्वर, माखजनला पुराचा धोका निर्माण झाला आहे. सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे लांजा चिंचुर्टी येथे जाणाºया घाटातील मार्गावरील मोरी वाहून गेल्याने एस.टी. वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे येथील नागरिक व विद्यार्थ्यांना १० किलोमीटरवर पायपीट करावी लागत आहे.राजापूर शहरातपुन्हा पुराचे पाणीअर्जुना व कोदवली नद्यांना पाण्याची पातळी वाढत आहे शाळा-महाविद्यालये सोडून दिली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे शहरात येणारे सर्व मार्ग बंद झाले आहेत. व्यापारी व नागरिकांनी सुरक्षित स्थळी सामान हलवले आहे. सोमवारी सकाळ पासूनच पावसाचा जोर वाढला होता. सोमवारी सकाळपासून शहरातील जवाहर चौकात पुराच्या पाण्याचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. सोमवारी शिवाजी पथ मछी मार्केट, वरची पेठ भागात पुराचे पाणी भरले होते . पावसाचा जोर अद्यापही कायम असल्यामुळे पाणी वाढत आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी