शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

Ratnagiri: चिपळूणमध्ये मुख्यमंत्री 'लाडकी बहीण' पहिल्याच दिवशी रुसली! 

By संदीप बांद्रे | Updated: July 1, 2024 19:46 IST

Ratnagiri News: राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. सोमवारी पहिल्या दिवशी उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील तलाठी कार्यालयात महिला व कुटुंब प्रमुखांची गर्दी झाली होती.

- संदीप बांद्रे चिपळूण - राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. सोमवारी पहिल्या दिवशी उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील तलाठी कार्यालयात महिला व कुटुंब प्रमुखांची गर्दी झाली होती. मात्र शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तलाठी कार्यालयात तलाठी भाऊसाहेबच न आल्याने दुपारपासून सायंकाळी उशीरापर्यंत अनेकांना भाऊंची प्रतिक्षा करावी लागली. या प्रकारामुळे पहिल्याच दिवशी लाकडी बहीण रुसली, अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुरवणी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर केल्यानंतर महिलांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरमहिना दिड हजार रूपये अर्थसहाय्य केले जाणार असल्याने त्याचा लाभ घेण्यासाठी महिलांमध्ये उत्साह पहायला मिळत आहे. १ ते १५ जूलै या कालावधीत योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याची मुदत आहे. मात्र या प्रस्तावात वार्षिक उत्पन्नाचा दाखला, तसेच अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधारकार्ड , रेशनकार्ड, बँक पासबुक व फोटो सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार वार्षिक उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी सोमवारी पहिल्या दिवसापासूनच विविध ठिकाणच्या तलाठी कार्यालयात गर्दी झाली. चिपळूण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तलाठी कार्यालयातही महिलांसह कुटुंबातील सदस्यांनी उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी गर्दी केली होती. परंतू येथील तलाठी भाऊसाहेबांकडे चिपळूणसह कामथे गावचा अतिरीक्त कार्यभार असल्याने ते चिपळूण तलाठी कार्यालयात उशीरापर्यंत आले नाहीत. त्यामुळे दुपारपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत अनेक नागरिक कार्यालया बाहेर भर पावसात ताटकळत उभे होते. यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता भाऊसाहेब येताहेत एवढेच सांगितले जात होते. अखेर काहीजण कंटाळून परत गेले. परंतू काही महिला व अन्य नागरिक कार्यालया बाहेरच सायंकाळी उशीरापर्यंत भाऊसाहेबांची वाट पहात उभे होते.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी तहसीलदार प्रविण लोकरे यांच्याशी संपर्क साधला. चिपळूण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तलाठी कार्यालयावर बहुतांशी नागरिक अवलंबून आहेत. त्यामुळे या कार्यालयातील तलाठ्यांना अतिरीक्त कार्यभार दिल्याने शहरातील नागरिकांची मोठी गैरसोय नियमीत होत आहे. तेव्हा या कार्यालयात पुर्णवेळ तलाठी मिळण्याची मागणी तहसीलदारांकडे केली. त्यामुळे आता तहसीलदार लोकरे हे याविषयी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :ChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार