शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी, चिपी विमानतळांना उद्या सुरेश प्रभू यांची भेट, विमानसेवा लवकर सुरु होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 18:18 IST

कोकणच्या पर्यटन व औद्योगिक विकासासाठी महत्त्वाची असलेली प्रवासी विमानसेवा लवकर सुरु होण्याची शक्यता आहे. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू हे १ एप्रिल रोजी रत्नागिरी विमानतळ व सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाची पाहणी करणार आहेत.

ठळक मुद्देरत्नागिरी, चिपी विमानतळांना उद्या सुरेश प्रभू यांची भेटप्रवासी विमानसेवा लवकर सुरु होणार

रत्नागिरी : कोकणच्या पर्यटन व औद्योगिक विकासासाठी महत्त्वाची असलेली प्रवासी विमानसेवा लवकर सुरु होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू हे १ एप्रिल रोजी रत्नागिरी विमानतळ व सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाची पाहणी करणार आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेनंतर सुरू होणारी विमानसेवा कोकणच्या शीरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवणार आहे.सुरेश प्रभू हे १ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात कोकण विकासासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशनतर्फे अंबर हॉल, रत्नागिरी येथे आयोजित महिला सबलीकरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

यानंतर ते हेलिकॉप्टरने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातील व कुडाळ येथे ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशन आयोजित महिला सबलीकरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर गेली २० वर्षे रखडलेल्या चिपी विमानतळाची ते पाहणी करणार आहेत.

यावेळी ते अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेणार आहेत. हवाईमंत्री असल्याने विमानतळ सुरू करण्याचा मार्ग ते सोपा करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.रत्नागिरी विमानतळ हे तटरक्षक दलाच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर या विमानतळाच्या विस्ताराचे काम वेगात सुरू होते. येथील धावपट्टीची लांबीही वाढवण्यात आली असून, येथून प्रथम तटरक्षक दलाची विमान वाहतूक सुरू होईल व मे २०१८मध्ये प्रवासी विमान वाहतूक सुरू होणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते.सिंधुदुगार्तील चिपी विमानतळाकरिता आतापर्यंत अनेक मुहूर्त जाहीर झाले. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येत्या जूनमध्ये विमान टेक आॅफ करेल, असे आश्वासन दिले आहे. मात्र, अधिवेशन काळात आमदार नितेश राणे यांनी चिपी विमानतळाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उत्तर देताना या विमानतळाचे उदघाटन नेमके कधी होईल, याबाबत ठोस आश्वासन दिलेले नाही. मात्र, या दौऱ्यामुळे ही विमानतळे लवकरच सुरू होतील, अशी आशा आहे.राऊंड टेबल कॉन्फरन्स रत्नागिरीतकोकण विकासाच्या दृष्टीने कृषी, मत्स्य, पर्यटन व वाहतूक या क्षेत्रातील विविध संधी तसेच नव्याने होणाऱ्या प्रकल्पांना गती देण्याकरिता केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली देशातील एपेडा, एमपेडा, भारतीय कृषी संस्था तसेच केंद्रीय पर्यटन बोर्ड, औद्योगिक विकास संस्था, रबर बोर्ड, स्पाईस बोर्ड, काजू निर्यात बोर्ड, आरोग्य प्राधिकरण, लेदर इंडस्ट्रीज, जेम्स अँड ज्वेलरी इंडस्ट्रीज, टेक्सटाईल्स इंडस्ट्रीज, फूड प्रोसेसिंग, नाबार्ड, शिपिंग पोर्ट आणि अनेक राष्ट्रीय बँकांचे प्रतिनिधी यांच्या प्रमुखांची राऊंड टेबल कॉन्फरन्स मंत्री सुरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीत होत आहे.

कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी येथील तरुणांना कोकणातच नोकरी, व्यवसाय उपलब्ध करण्यासाठी ही कॉन्फरन्स महत्त्वाची ठरणार आहे. 

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूChipi airportचिपी विमानतळRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग