शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

रत्नागिरी : जिल्ह्यात २६२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक, २५ फेब्रुवारीला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 6:24 PM

रत्नागिरी : मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच २६६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारीला मतदान होणार असून, ५ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, उमेदवारांमध्ये अर्ज भरण्याबाबत अजूनही उदासीनता दिसून येत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात २६२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक२५ फेब्रुवारीला मतदान

रत्नागिरी : मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच २६६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारीला मतदान होणार असून, ५ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, उमेदवारांमध्ये अर्ज भरण्याबाबत अजूनही उदासीनता दिसून येत आहे.मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदांसह सर्व सदस्य पदांसाठी तसेच रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. सरपंच व सर्व सदस्यपदांसाठी होणाऱ्या या निवडणुकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

मंडणगड तालुक्यातील वाल्मिकीनगर, गुहागर तालुक्यातील असगोली, चिपळूण तालुक्यातील टेरव आणि संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

जिल्ह्यातील २६५ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असलेल्या एकूण ४४४ जागांसाठीही २५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यात सर्वात जास्त ग्रामपंचायती संगमेश्वर तालुक्यात (५४) असून, सर्वात कमी ग्रामपंचायती रत्नागिरी तालुक्यात (१२) आहेत.जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. त्यासाठी ५ ते १० फेब्रुवारी २०१८ या कालावधीत अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, अर्ज भरण्याबाबत अजूनही उमेदवारांमध्ये म्हणावा तितका उत्साह दिसून येत नाही.चार ठिकाणी सार्वत्रिक निवडणूकमंडणगड : वाल्मिकीनगरगुहागर : असगोलीचिपळूण : टेरवसंगमेश्वर : तळेकांटे

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRatnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक