शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अन्य जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरीचे कृषी प्रदर्शन अव्वल- खासदार विनायक राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 17:05 IST

गेल्या वर्षीपासून रत्नागिरीत कृषी प्रदर्शन आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या मागे लागलो होतो. येथील कृषी प्रदर्शन देखणं, परिपूर्ण असून, प्रत्येक स्टॉल पाहता अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरीचे प्रदर्शन अव्वल ठरले आहे.

रत्नागिरी : गेल्या वर्षीपासून रत्नागिरीत कृषी प्रदर्शन आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या मागे लागलो होतो. येथील कृषी प्रदर्शन देखणं, परिपूर्ण असून, प्रत्येक स्टॉल पाहता अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरीचे प्रदर्शन अव्वल ठरले आहे. हे प्रदर्शन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समृद्धी व विकसनशीलतेकडे नेणारे असल्याचे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे आयोजित रत्नागिरी जिल्हा कृषी महोत्सव व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात खासदार राऊत बोलत होते. यावेळी आमदार उदय सामंत, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, उपाध्यक्ष संतोष थेराडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, नगराध्यक्ष राहुल पंडित, सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, बंड्या साळवी, शिक्षण सभापती दीपक नागले, बाबू म्हाप, परशुराम कदम, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.विदर्भ, मराठवाड्याने बागायतीकडे पाठ फिरवली असली तरी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी बागायती फुलवली आहे. यामध्ये माचाळ येथील स्ट्रॉबेरी लागवड कौतुकास्पद आहे. जिल्ह्यात दूध पंढरी उभारण्याची सूचना करून शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रशासन व सरकार नेहमीच उभे राहील, असे आश्वासन दिले. तुकडे पद्धतीला छेद देऊन गटशेती हा चांगला पर्याय आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ६०० एकरवर गटशेतीचा केलेला प्रयोग कौतुकास्पद ठरला आहे. चांदा ते बांदामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश करण्याचे मागणी करून आता शेतीमध्ये ठराविक जिल्ह्यांची मक्तेदारी राहिलेली नाही. रत्नागिरीचे शेतकरीदेखील प्रयोगशील असून, त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केले.सूत्रसंचालन विभागीय कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी केले तर जिल्हा कृषी अधीक्षक एस. एस. जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमात खानू (ता. लांजा) गावचे संदीप कांबळे यांच्या शोषखड्ड्याच्या प्रतिकृती(मॉडेल)चे अनावरण राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी