शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

‘निपुण’मध्ये रत्नागिरी पुन्हा राज्यात अव्वल; विद्यार्थ्यांचे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने मूल्यमापन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:44 IST

पाचव्या क्रमांकावर काेल्हापूर जिल्हा , ‘निपुण महाराष्ट्र’च्या दिशेने डिजिटल पाऊल

रत्नागिरी : शासनाच्या निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या कामाचा सुमारे ७६ टक्के भाग पूर्ण झाला असून, निपुण महाराष्ट्र उपक्रमात रत्नागिरी जिल्हा अव्वल ठरला आहे.तसेच या उपक्रमात बुलढाणा दुसऱ्या क्रमांकावर असून, तिसऱ्या क्रमांकावर जळगाव, चाैथ्या क्रमांकावर धुळे आणि पाचव्या क्रमांकावर काेल्हापूर जिल्हा आहे.इयत्ता दुसरी ते पाचवी वर्गातील विद्यार्थ्यांचे वाचन आणि लेखन कौशल्य यांचे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने मूल्यमापन केले जाणार आहे. आतापर्यंत शेकडो शाळांची तपासणी पूर्ण झाल्याचे शिक्षण विभागाकडून समजते. पूर्वी खासगी अनुदानित तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासली जात असे. मात्र, आता प्रत्येक विद्यार्थ्याचे मूल्यांकन अचूक आणि निष्पक्ष व्हावे यासाठी या कार्यक्रमात एआय आधारित ॲपचा वापर केला जात आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती किंवा अधोगती वैयक्तिक पातळीवर तपासली जाते.ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली असून, मागील दहा ते बारा दिवसांत शाळांमधील विद्यार्थ्यांचे लेखन, वाचन कौशल्य तपासण्यात आले आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एआय प्रणाली शाबासकीची थाप देत कौतुक करते. तर अप्रगत विद्यार्थ्यांना लेखन, वाचन पुन्हा सराव करण्याचा संदेश पाठवते. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यकतेनुसार कमी-जास्त मार्गदर्शनही मिळते.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली एआय प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जात आहे. शिक्षकांनी या उपक्रमासाठी प्रतिसाद द्यावा. याची मुदत २७ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे याची यंत्रणेने नोंद घ्यावी. - किरण लोहार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, रत्नागिरी.