शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

‘निपुण’मध्ये रत्नागिरी पुन्हा राज्यात अव्वल; विद्यार्थ्यांचे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने मूल्यमापन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:44 IST

पाचव्या क्रमांकावर काेल्हापूर जिल्हा , ‘निपुण महाराष्ट्र’च्या दिशेने डिजिटल पाऊल

रत्नागिरी : शासनाच्या निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या कामाचा सुमारे ७६ टक्के भाग पूर्ण झाला असून, निपुण महाराष्ट्र उपक्रमात रत्नागिरी जिल्हा अव्वल ठरला आहे.तसेच या उपक्रमात बुलढाणा दुसऱ्या क्रमांकावर असून, तिसऱ्या क्रमांकावर जळगाव, चाैथ्या क्रमांकावर धुळे आणि पाचव्या क्रमांकावर काेल्हापूर जिल्हा आहे.इयत्ता दुसरी ते पाचवी वर्गातील विद्यार्थ्यांचे वाचन आणि लेखन कौशल्य यांचे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने मूल्यमापन केले जाणार आहे. आतापर्यंत शेकडो शाळांची तपासणी पूर्ण झाल्याचे शिक्षण विभागाकडून समजते. पूर्वी खासगी अनुदानित तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासली जात असे. मात्र, आता प्रत्येक विद्यार्थ्याचे मूल्यांकन अचूक आणि निष्पक्ष व्हावे यासाठी या कार्यक्रमात एआय आधारित ॲपचा वापर केला जात आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती किंवा अधोगती वैयक्तिक पातळीवर तपासली जाते.ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली असून, मागील दहा ते बारा दिवसांत शाळांमधील विद्यार्थ्यांचे लेखन, वाचन कौशल्य तपासण्यात आले आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एआय प्रणाली शाबासकीची थाप देत कौतुक करते. तर अप्रगत विद्यार्थ्यांना लेखन, वाचन पुन्हा सराव करण्याचा संदेश पाठवते. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यकतेनुसार कमी-जास्त मार्गदर्शनही मिळते.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली एआय प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जात आहे. शिक्षकांनी या उपक्रमासाठी प्रतिसाद द्यावा. याची मुदत २७ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे याची यंत्रणेने नोंद घ्यावी. - किरण लोहार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, रत्नागिरी.