शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

‘निपुण’मध्ये रत्नागिरी पुन्हा राज्यात अव्वल; विद्यार्थ्यांचे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने मूल्यमापन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:44 IST

पाचव्या क्रमांकावर काेल्हापूर जिल्हा , ‘निपुण महाराष्ट्र’च्या दिशेने डिजिटल पाऊल

रत्नागिरी : शासनाच्या निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या कामाचा सुमारे ७६ टक्के भाग पूर्ण झाला असून, निपुण महाराष्ट्र उपक्रमात रत्नागिरी जिल्हा अव्वल ठरला आहे.तसेच या उपक्रमात बुलढाणा दुसऱ्या क्रमांकावर असून, तिसऱ्या क्रमांकावर जळगाव, चाैथ्या क्रमांकावर धुळे आणि पाचव्या क्रमांकावर काेल्हापूर जिल्हा आहे.इयत्ता दुसरी ते पाचवी वर्गातील विद्यार्थ्यांचे वाचन आणि लेखन कौशल्य यांचे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने मूल्यमापन केले जाणार आहे. आतापर्यंत शेकडो शाळांची तपासणी पूर्ण झाल्याचे शिक्षण विभागाकडून समजते. पूर्वी खासगी अनुदानित तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासली जात असे. मात्र, आता प्रत्येक विद्यार्थ्याचे मूल्यांकन अचूक आणि निष्पक्ष व्हावे यासाठी या कार्यक्रमात एआय आधारित ॲपचा वापर केला जात आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती किंवा अधोगती वैयक्तिक पातळीवर तपासली जाते.ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली असून, मागील दहा ते बारा दिवसांत शाळांमधील विद्यार्थ्यांचे लेखन, वाचन कौशल्य तपासण्यात आले आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एआय प्रणाली शाबासकीची थाप देत कौतुक करते. तर अप्रगत विद्यार्थ्यांना लेखन, वाचन पुन्हा सराव करण्याचा संदेश पाठवते. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यकतेनुसार कमी-जास्त मार्गदर्शनही मिळते.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली एआय प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जात आहे. शिक्षकांनी या उपक्रमासाठी प्रतिसाद द्यावा. याची मुदत २७ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे याची यंत्रणेने नोंद घ्यावी. - किरण लोहार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, रत्नागिरी.