शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

रत्नागिरी : शिमगोत्सवानंतर मुंबईला जाणाऱ्या गुरव कुटुंबियांवर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 11:38 IST

खेड तालुक्यातील शिवफाटा येथे काल (गुरूवारी) मध्यरात्री १.३० वाजता बोलेरो आणि ईको कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सोलगाव (ता. राजापूर) येथील राजेंद्र अनंत गुरव (४५) यांचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देशिमगोत्सवानंतर मुंबईला जाणाऱ्या गुरव कुटुंबियांवर काळाचा घालाजखमींना चिपळूण आणि डेरवण येथे उपचारासाठी दाखल

रत्नागिरी : खेड तालुक्यातील शिवफाटा येथे काल (गुरूवारी) मध्यरात्री १.३० वाजता बोलेरो आणि ईको कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सोलगाव (ता. राजापूर) येथील राजेंद्र अनंत गुरव (४५) यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात ईको गाडीतील आणखी पाचजण जखमी झाले असून, त्यांना नजीकच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे कुटुंब शिमगोत्सवासाठी आपल्या गावी आले होते. शिमगोत्सव आटोपून हे कुटुंब मुंबईला जात असताना हा अपघात झाला.या अपघातात सूरज चंद्रकांत गुरव (२२), स्वप्नील चंद्रकांत गुरव (३१), स्वानंदी स्वप्नील गुरव (२५), नयना उर्फ सान्वी सचिन गुरव (२५) आणि प्रेम गुरव (१६) हे जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने चिपळूण आणि डेरवण येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच खेडमधील मदत फाऊंडेशनच्या प्रसाद गांधी, बुराण टांके, विवेक बनकर, अमित वनकुटे, सुजित घोडेराय यांनी घटनास्थळी जाऊन मदत केली.अपघातानंतर बोलेरो गाडीच्या चालकाने मात्र घटनास्थळावरून पलायन केले. त्याठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी ही गाडी वापरण्यात येत आहे.

हा अपघाता इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. अपघाताचे वृत्त सोलगाव येथील गावी समजताच अनेकांना धक्का बसला. त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात