शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

रत्नागिरी : पत्नीच्या अवयवदानातून स्मृती राहणार चिरंतन, शिल्पा रेडीज यांच्या मृत्यूनंतर पतीचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 13:29 IST

आपली जवळची व्यक्ती कायमस्वरूपी निघून जाण्याचे दु:ख कधीच मागे सारता येत नाही. पण प्रत्यक्ष पत्नीच्या निधनानंतरही दु:ख बाजुला सारून तिचे अवयव दान केले तर इतर व्यक्तिंचे जीवन प्रकाशमय होईल, अवयवाच्या माध्यमातून पत्नीचेही अस्तित्व राहील, अशा भावनिक हेतूने रत्नागिरीतील अजय रेडीज यांनी पत्नी शिल्पा रेडीज यांचे आपल्या कुटुंबियांच्या सहविचाराने अवयवदान करून समाजाला अवयवदानाचे श्रेष्ठत्व पटवून दिले.

ठळक मुद्देपत्नीच्या अवयवदानातून स्मृती राहणार चिरंतनशिल्पा रेडीज यांच्या मृत्यूनंतर पतीचा उपक्रम समाजाला पटवून दिले अवयवदानाचे श्रेष्ठत्व

रत्नागिरी : आपली जवळची व्यक्ती कायमस्वरूपी निघून जाण्याचे दु:ख कधीच मागे सारता येत नाही. पण प्रत्यक्ष पत्नीच्या निधनानंतरही दु:ख बाजुला सारून तिचे अवयव दान केले तर इतर व्यक्तिंचे जीवन प्रकाशमय होईल, अवयवाच्या माध्यमातून पत्नीचेही अस्तित्व राहील, अशा भावनिक हेतूने रत्नागिरीतील अजय रेडीज यांनी पत्नी शिल्पा रेडीज यांचे आपल्या कुटुंबियांच्या सहविचाराने अवयवदान करून समाजाला अवयवदानाचे श्रेष्ठत्व पटवून दिले.अजय रेडीज यांच्या पत्नी शिल्पा (४५ वर्षे) गेली काही वर्षे एका खासगी आस्थापनेत काम करत होत्या. त्या सदैव हसमुख, मनमोकळ्या स्वभावाच्या होत्या. नेहमीच सहकार्याच्या भावनेने काम करताना त्यांचा जनसंपर्कही चांगला होता.

खेड येथील माहेर असलेल्या शिल्पा रेडीज सासरीही सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना काही वर्षांपूर्वी हृदयाचा त्रास होत होता. मात्र, दीड - दोन वर्षांपूर्वी मुंबईत त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांच्या तब्बेतीची कुठलीच तक्रार नव्हती.गेल्या आठवड्यात त्यांना अचानक त्रास होऊ लागला. अस्वस्थ वाटू लागल्याने ज्या रूग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती, त्या मुंबईतील प्रसिद्ध खासगी रूग्णालयात तातडीने हलवावे लागले. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

जिच्याबरोबर सोळा - सतरा वर्षांचा संसार केला, ती पत्नीच आपल्याला आणि बारा वर्षाच्या मुलाला सोडून गेल्याने अजय रेडीज यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, तेही सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे असल्याने त्यांनी स्वत:ला सावरले. त्यांच्या बहिणी, मेहुणे आदी कुटुंबियांच्या विचाराने पत्नीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिल्पा रेडीज यांचे डोळे, यकृत, मूत्रपिंड दान केल्याने पाच गरजू व्यक्तिंना नवीन जीवन मिळणार आहे.नवजीवन मिळतेमृत्यूनंतर देह नश्वर ठरतो. मात्र, आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अवयवदान केले तर अनेक गरजू लोकांना त्यांचा लाभ मिळतो, त्यातून नवजीवन मिळते. प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतरही तिचे अवयवदान करून अवयवदान श्रेष्ठ दान असल्याचे दाखवून दिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHealthआरोग्य