शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

रत्नागिरी : पत्नीच्या अवयवदानातून स्मृती राहणार चिरंतन, शिल्पा रेडीज यांच्या मृत्यूनंतर पतीचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 13:29 IST

आपली जवळची व्यक्ती कायमस्वरूपी निघून जाण्याचे दु:ख कधीच मागे सारता येत नाही. पण प्रत्यक्ष पत्नीच्या निधनानंतरही दु:ख बाजुला सारून तिचे अवयव दान केले तर इतर व्यक्तिंचे जीवन प्रकाशमय होईल, अवयवाच्या माध्यमातून पत्नीचेही अस्तित्व राहील, अशा भावनिक हेतूने रत्नागिरीतील अजय रेडीज यांनी पत्नी शिल्पा रेडीज यांचे आपल्या कुटुंबियांच्या सहविचाराने अवयवदान करून समाजाला अवयवदानाचे श्रेष्ठत्व पटवून दिले.

ठळक मुद्देपत्नीच्या अवयवदानातून स्मृती राहणार चिरंतनशिल्पा रेडीज यांच्या मृत्यूनंतर पतीचा उपक्रम समाजाला पटवून दिले अवयवदानाचे श्रेष्ठत्व

रत्नागिरी : आपली जवळची व्यक्ती कायमस्वरूपी निघून जाण्याचे दु:ख कधीच मागे सारता येत नाही. पण प्रत्यक्ष पत्नीच्या निधनानंतरही दु:ख बाजुला सारून तिचे अवयव दान केले तर इतर व्यक्तिंचे जीवन प्रकाशमय होईल, अवयवाच्या माध्यमातून पत्नीचेही अस्तित्व राहील, अशा भावनिक हेतूने रत्नागिरीतील अजय रेडीज यांनी पत्नी शिल्पा रेडीज यांचे आपल्या कुटुंबियांच्या सहविचाराने अवयवदान करून समाजाला अवयवदानाचे श्रेष्ठत्व पटवून दिले.अजय रेडीज यांच्या पत्नी शिल्पा (४५ वर्षे) गेली काही वर्षे एका खासगी आस्थापनेत काम करत होत्या. त्या सदैव हसमुख, मनमोकळ्या स्वभावाच्या होत्या. नेहमीच सहकार्याच्या भावनेने काम करताना त्यांचा जनसंपर्कही चांगला होता.

खेड येथील माहेर असलेल्या शिल्पा रेडीज सासरीही सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना काही वर्षांपूर्वी हृदयाचा त्रास होत होता. मात्र, दीड - दोन वर्षांपूर्वी मुंबईत त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांच्या तब्बेतीची कुठलीच तक्रार नव्हती.गेल्या आठवड्यात त्यांना अचानक त्रास होऊ लागला. अस्वस्थ वाटू लागल्याने ज्या रूग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती, त्या मुंबईतील प्रसिद्ध खासगी रूग्णालयात तातडीने हलवावे लागले. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

जिच्याबरोबर सोळा - सतरा वर्षांचा संसार केला, ती पत्नीच आपल्याला आणि बारा वर्षाच्या मुलाला सोडून गेल्याने अजय रेडीज यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, तेही सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे असल्याने त्यांनी स्वत:ला सावरले. त्यांच्या बहिणी, मेहुणे आदी कुटुंबियांच्या विचाराने पत्नीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिल्पा रेडीज यांचे डोळे, यकृत, मूत्रपिंड दान केल्याने पाच गरजू व्यक्तिंना नवीन जीवन मिळणार आहे.नवजीवन मिळतेमृत्यूनंतर देह नश्वर ठरतो. मात्र, आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अवयवदान केले तर अनेक गरजू लोकांना त्यांचा लाभ मिळतो, त्यातून नवजीवन मिळते. प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतरही तिचे अवयवदान करून अवयवदान श्रेष्ठ दान असल्याचे दाखवून दिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHealthआरोग्य