शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

रत्नागिरी  जिल्हा केरोसीनमुक्तीसाठी प्रशासनाची जोरदार मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 17:38 IST

जिल्हा केरोसीनमुक्त होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात खेड, दापोली, राजापूर, रत्नागिरी ही चार तालुका मुख्यालये निवडण्यात आली असून, या

ठळक मुद्देपहिला टप्पा सुरु : चार मुख्य शहरांमध्ये सर्वेक्षण अंतिम टप्प्यातरेशनदुकानदाराने याला आक्षेप घेतला तर असे ग्राहक त्यांच्याशीच हुज्जत घालतात, असेही काही दुकानदारांनी सांगितले.

रत्नागिरी : जिल्हा केरोसीनमुक्त होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात खेड, दापोली, राजापूर, रत्नागिरी ही चार तालुका मुख्यालये निवडण्यात आली असून, या शहरातील प्रत्येक घरामध्ये सर्वेक्षण करण्यात आले असून, ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.

शासनाला केरोसीन वापरणाºया शिधापत्रिकांवर सुमारे ५० टक्के अनुदान द्यावे लागते. रॉकेलचा अन्य दुकानांमध्ये ६५ रूपये दर आहे. मात्र, रेशनदुकानावर ३० रूपये प्रतिलीटर दराने शिधापत्रिकाधारकांना केरोसीन दिले जाते. त्यावरील रक्कम शासन अनुदान म्हणून भरते. या अनुदानापोटी शासनाला ५० टक्के रक्कम भरावी लागते. त्यामुळे हा खर्च वाचावा, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे. त्याचबरोबर केरोसीनमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते, हे प्रदूषण थांबवणे, हाही यामागचा उद्देश आहे.

चुलींचा तसेच केरोसीनचा वापर थांबवण्यासाठी शासनाने ज्यांचे आर्थिक उत्पन्न कमी आहे, अशांसाठी ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ जाहीर केली आहे. सामान्य गृहिणीला या योजनेचा लाभ मिळावा, तसेच अधिकाधिक लाभार्थ्यांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा केरोसीनमुक्त करण्यासाठी पहिल्या टप्प्यात खेड, दापोली, राजापूर, रत्नागिरी ही चार शहरे निवडण्यात आली आहेत. या शहरांमधील प्रत्येक घरामध्ये पुरवठा विभागातर्फे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. 

ज्या घरामध्ये अजूनही गॅस घेतलेला नाही, त्यांच्याकडून घरात गॅसजोडणी नसल्याने केरोसीन वापरत असून, गॅसजोडणी असल्याचे निदर्शनाला आल्यास कोणत्याही कारवाईला आपण सामोरे जाऊ, असे हमीपत्र लिहून घेतले जात आहे. या चारही शहरांमधील सर्वेक्षण सध्या अंतिम टप्प्यात आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील ही चारही शहरे केरोसीनमुक्त झाल्यानंतर पुढील टप्प्यात जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये याबाबतचे सर्वेक्षण केले जाणार आहे. भविष्यात अशा कुटुंबांना ‘उज्ज्वला योजने’चा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यातील अधिकाधिक आर्थिक दुर्बल घटकांना शासनाच्या उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाल्यास आपोआपच जिल्हा केरोसीनमुक्त होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे जळाऊसाठी लाकडाचा होणारा वापर बंद होऊन त्यापासून होणारे प्रदूषणही कमी होणार आहे. 

नवी यादी होणार

महाराष्ट्रात चुलीजवळ तसेच केरोसीनच्या स्टोव्हमुळे भाजण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडू लागल्या आहेत. त्यातील बहुतांशी घटना संशयास्पदही आहेत. त्यामुळे अशा घटनांना आळा बसावा, यासाठी शासनाने महाराष्ट्र केरोसीनमुक्त करण्याची मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. लवकरच हे सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर केरोसिनसाठी नवी यादी तयार होईल.

गॅसधारकही रॉकेल नेतात

ज्यांच्या शिधापत्रिकांवर गॅसजोडणी असल्याचा शिक्का आहे, त्यांना रॉकेल दिले जात नाही. मात्र, गॅस एजन्सी नवीन जोडणी देतानाच असा शिक्का शिधापत्रिकांवर देत नसल्याने असे गॅसधारकही रॉकेल नेत असल्याचे निदर्शनाला येत आहे. रेशनदुकानदाराने याला आक्षेप घेतला तर असे ग्राहक त्यांच्याशीच हुज्जत घालतात, असेही काही दुकानदारांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात अशा ग्राहकांबरोबरच रॉकेल वितरक दुकानदारही अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGovernmentसरकार