शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

रामदास कदम-सूर्यकांत दळवी यांचे पक्ष बदलले, तरी संघर्ष सुरूच! आता संघर्षाचा नवा अध्याय

By मनोज मुळ्ये | Updated: March 19, 2024 10:15 IST

दापाेलीत भाजप वाढविण्यासाठी दळवी यांनी पुढाकार घेतला आहे

मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: सर्व पक्ष संपवून भाजपला एकट्यालाच शिल्लक राहायचे आहे का, अशी टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आणि राज्यात खळबळ उडाली. आपली ही टीका वरिष्ठ नव्हे तर स्थानिक पदाधिकाऱ्यांसाठी होती, असेही त्यांनी नंतर सांगितले. त्यांचा रोख माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर होता आणि त्यातूनच दापोली विधानसभा मतदारसंघात कदम आणि दळवी यांच्यातील संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

१९९० साली रामदास कदम खेडमध्ये आणि सूर्यकांत दळवी दापोलीतून आमदार म्हणून विजयी झाले. १९९०, ९५, ९९, २००४ असे दोघे आपापल्या मतदारसंघात विजयी झाले. २००९ साली मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर कदम यांना गुहागरमधून निवडणूक लढवावी लागली. त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून दोघांत वाद सुरू झाले. आपल्या मुलाला, योगेश कदम यांना दापोलीतून उभे करायचे असल्याने २०१४ साली मला पाडण्यात आल्याचा आरोप सूर्यकांत दळवी यांनी अनेकदा केला. रामदास कदम यांनीही २००९च्या पराभवाला सूर्यकांत दळवी यांना जबाबदार धरले. पुढे दळवींनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे रामदास कदम यांच्या शिवसेनेशी (शिंदे गट) भाजपची युती असल्याने या दोघांतील संघर्षाचा नवा अध्याय सुरू आहे. 

...म्हणून आगपाखड

दापाेलीत भाजप वाढविण्यासाठी दळवी यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटनाचे काही कार्यक्रम केले. मंडणगडमधील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी चव्हाण यांच्याकडे बैठक लावली. यामुळे रामदास कदम चिडले आहेत. लोटे येथील सभेपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर केलेली आगपाखड ही याच रागातून होती.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी