शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

रामदास कदम-सूर्यकांत दळवी यांचे पक्ष बदलले, तरी संघर्ष सुरूच! आता संघर्षाचा नवा अध्याय

By मनोज मुळ्ये | Updated: March 19, 2024 10:15 IST

दापाेलीत भाजप वाढविण्यासाठी दळवी यांनी पुढाकार घेतला आहे

मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: सर्व पक्ष संपवून भाजपला एकट्यालाच शिल्लक राहायचे आहे का, अशी टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आणि राज्यात खळबळ उडाली. आपली ही टीका वरिष्ठ नव्हे तर स्थानिक पदाधिकाऱ्यांसाठी होती, असेही त्यांनी नंतर सांगितले. त्यांचा रोख माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर होता आणि त्यातूनच दापोली विधानसभा मतदारसंघात कदम आणि दळवी यांच्यातील संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

१९९० साली रामदास कदम खेडमध्ये आणि सूर्यकांत दळवी दापोलीतून आमदार म्हणून विजयी झाले. १९९०, ९५, ९९, २००४ असे दोघे आपापल्या मतदारसंघात विजयी झाले. २००९ साली मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर कदम यांना गुहागरमधून निवडणूक लढवावी लागली. त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून दोघांत वाद सुरू झाले. आपल्या मुलाला, योगेश कदम यांना दापोलीतून उभे करायचे असल्याने २०१४ साली मला पाडण्यात आल्याचा आरोप सूर्यकांत दळवी यांनी अनेकदा केला. रामदास कदम यांनीही २००९च्या पराभवाला सूर्यकांत दळवी यांना जबाबदार धरले. पुढे दळवींनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे रामदास कदम यांच्या शिवसेनेशी (शिंदे गट) भाजपची युती असल्याने या दोघांतील संघर्षाचा नवा अध्याय सुरू आहे. 

...म्हणून आगपाखड

दापाेलीत भाजप वाढविण्यासाठी दळवी यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटनाचे काही कार्यक्रम केले. मंडणगडमधील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी चव्हाण यांच्याकडे बैठक लावली. यामुळे रामदास कदम चिडले आहेत. लोटे येथील सभेपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर केलेली आगपाखड ही याच रागातून होती.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी