शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रामदास कदम-सूर्यकांत दळवी यांचे पक्ष बदलले, तरी संघर्ष सुरूच! आता संघर्षाचा नवा अध्याय

By मनोज मुळ्ये | Updated: March 19, 2024 10:15 IST

दापाेलीत भाजप वाढविण्यासाठी दळवी यांनी पुढाकार घेतला आहे

मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: सर्व पक्ष संपवून भाजपला एकट्यालाच शिल्लक राहायचे आहे का, अशी टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आणि राज्यात खळबळ उडाली. आपली ही टीका वरिष्ठ नव्हे तर स्थानिक पदाधिकाऱ्यांसाठी होती, असेही त्यांनी नंतर सांगितले. त्यांचा रोख माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर होता आणि त्यातूनच दापोली विधानसभा मतदारसंघात कदम आणि दळवी यांच्यातील संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

१९९० साली रामदास कदम खेडमध्ये आणि सूर्यकांत दळवी दापोलीतून आमदार म्हणून विजयी झाले. १९९०, ९५, ९९, २००४ असे दोघे आपापल्या मतदारसंघात विजयी झाले. २००९ साली मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर कदम यांना गुहागरमधून निवडणूक लढवावी लागली. त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून दोघांत वाद सुरू झाले. आपल्या मुलाला, योगेश कदम यांना दापोलीतून उभे करायचे असल्याने २०१४ साली मला पाडण्यात आल्याचा आरोप सूर्यकांत दळवी यांनी अनेकदा केला. रामदास कदम यांनीही २००९च्या पराभवाला सूर्यकांत दळवी यांना जबाबदार धरले. पुढे दळवींनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे रामदास कदम यांच्या शिवसेनेशी (शिंदे गट) भाजपची युती असल्याने या दोघांतील संघर्षाचा नवा अध्याय सुरू आहे. 

...म्हणून आगपाखड

दापाेलीत भाजप वाढविण्यासाठी दळवी यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटनाचे काही कार्यक्रम केले. मंडणगडमधील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी चव्हाण यांच्याकडे बैठक लावली. यामुळे रामदास कदम चिडले आहेत. लोटे येथील सभेपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर केलेली आगपाखड ही याच रागातून होती.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी