शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

राम मंदिर आपली अस्मिता असून, ते पूर्ण करण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले : उदय सामंत

By मनोज मुळ्ये | Updated: January 22, 2024 15:28 IST

रत्नागिरी : राम मंदिर ही आपली अस्मिता असून, ते पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले आहे. अयाेध्येतील ...

रत्नागिरी : राम मंदिर ही आपली अस्मिता असून, ते पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले आहे. अयाेध्येतील हा अभूतपूर्व साेहळा रत्नागिरीतील नागरिकांनाही पाहता यावा यासाठी थेट प्रेक्षपणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. त्यामुळे आपणही या क्षणाचे साक्षीदार बनलाे. रत्नागिरीचा हा पॅटर्न राज्यात नव्हे तर देशातही राबवला गेला, असे प्रतिपादन राज्याचे उद्याेगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

असंख्य भारतीयांचे स्वप्न साकार होत असून, रामभक्तांसाठी आजचा दिवस उत्सवाचा असणार आहे. अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे लोकार्पण आणि प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा सुरु असताना तो अभूतपूर्व सोहळा मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या जनतेसमवेत जयेश मंगल कार्यालय येथे थेट पाहिला. यावेळी ते बाेलत हाेते.

पालकमंत्री उदय सामंत यांनी अयोध्येतील हा अभूतपूर्व सोहळा जिल्ह्यातील नागरिकांना अनुभवता यावा यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यासाठी रत्नागिरीतील जयेश मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. तो सोहळा त्यांनी जनतेसोबत उपस्थित राहून पाहिला.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, ॲड. राजशेखर मलुष्टे, बाळू साळवी, किशोर मोरे, अलिमिया काझी, प्रशांत सुर्वे, दीपक पवार, अभिजित गोडबोले, महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, स्मितल पावसकर, वैभवी खेडेकर यांच्यासह अनेक रत्नागिरीकर उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतNarendra Modiनरेंद्र मोदीRam Mandirराम मंदिर