शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

रत्नागिरीच्या शिक्षण विभागात खडखडाट, अधिकारीच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:23 IST

राज्यात शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाचा अक्षरश खेळखंडोबा सुरू आहे. राज्य शासनाने नुकत्याच (शिक्षण सेवा वर्ग १) शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये जिल्ह्यात असणाºया एकमेव शिक्षणाधिकाºयांची बदली करण्यात आली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीच्या शिक्षण विभागात खडखडाट, अधिकारीच नाहीत शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; देवीदास कुलाळ यांचीही बदली

रत्नागिरी / टेंभ्ये : राज्यात शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाचा अक्षरश खेळखंडोबा सुरू आहे. राज्य शासनाने नुकत्याच (शिक्षण सेवा वर्ग १) शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये जिल्ह्यात असणाऱ्या एकमेव शिक्षणाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.देविदास कुलाळ यांच्याकडे सध्या प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही विभागांचा कार्यभार आहे. असे असताना नवीन आदेशानुसार कुलाळ यांची कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाच्या सहसचिवपदी बदली करण्यात आली आहे. यामुळे सध्या जिल्ह्यात एकही शिक्षणाधिकारी कार्यरत नाहीत. तसेच १३पैकी वर्ग दोनचे केवळ एक अधिकारी कार्यरत असून, ते देखील ३० जूनला सेवानिवृत्त होत आहेत.दहावी व बारावीच्या निकालामध्ये गेली अनेक वर्षे राज्यात अव्वल असणाºया कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्याकडे राज्य शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. राज्य शासनाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार रत्नागिरीमध्ये सध्या कार्यरत असणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक विभागाची जबाबदारी सांभाळणारे शिक्षणाधिकारी कुलाळ यांची कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाच्या सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

यामुळे जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच प्राथमिक शिक्षणाधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी ही दोन्ही पदे रिक्त झाली आहेत. सध्या जिल्ह्यात शिक्षण सेवा वर्ग दोनचे एकमेव पद कार्यरत आहे. लांजा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी देसाई हे ३० जूनला सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर जिल्ह्यामध्ये वर्ग दोनचे एकही पद कार्यरत राहणार नाही. 

रत्नागिरी जिल्ह्यात सातत्यानं अधिकाऱ्यांची कमतरता पाहायला मिळते. शिक्षण क्षेत्रात ती जास्त प्रमाणात जाणवत आहे. सर्व अधिकारी कार्यरत असणे अशी स्थिती रत्नागिरीमध्ये कधीही पाहायला मिळालेली नाही . शैक्षणिक धोरणाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी वर्ग महत्त्वाचा आहे. राज्य संघटनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची कमतरता शासनाच्या निदर्शनास आणून देणार येणार आहोत.-भारत घुले,उपाध्यक्ष, महाराष्ट्र माध्यमिक अध्यापक संघ 

जिल्ह्यामध्ये एकही शिक्षणाधिकारी कार्यरत नसणे ही बाब अत्यंत दयनीय आहे. जिल्ह्यांमधील सर्व अधिकाºयांची पदे भरण्याबाबत जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करणार आहोत.-विजय पाटील,अध्यक्ष, मुख्याध्योपक संघ, रत्नागिरी

टॅग्स :TransferबदलीTeacherशिक्षकRatnagiriरत्नागिरी