शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पोस्टातून १२ हजार भाऊरायांपर्यंत पाेहोचल्या राख्या; महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही रत्नागिरीतून रवाना

By शोभना कांबळे | Updated: August 30, 2023 17:07 IST

शाेभना कांबळे रत्नागिरी : भाऊ-बहिणीचे नाते अधिक दृढ करणाऱ्या, त्यांच्या नात्यातील गोडवा अधिक वाढविणाऱ्या, आवडत्या रक्षाबंधन सणासाठी जिल्ह्यातील बहिणींनी ...

शाेभना कांबळेरत्नागिरी : भाऊ-बहिणीचे नाते अधिक दृढ करणाऱ्या, त्यांच्या नात्यातील गोडवा अधिक वाढविणाऱ्या, आवडत्या रक्षाबंधन सणासाठी जिल्ह्यातील बहिणींनी रत्नागिरी टपाल कार्यालयावर विश्वास टाकत तब्बल आपल्या १२ हजार भाऊरायांपर्यंत राख्या पोहोच केल्या आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यांमध्ये पोस्टाच्या आकर्षक, रंगीत आणि वाॅटरप्रूफ लिफाफ्यामधून या राख्या पाठविण्यात आल्या आहेत.रत्नागिरी विभागाने जिल्ह्यासाठी ३ हजार विशेष अशा आकर्षक, रंगीत आणि वाॅटरप्रूफ लिफाफ्यांची मागणी केली होती. हे आकर्षक, वाॅटरप्रूफ लिफाफे केवळ दहा रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले होते. पोस्टाच्या सर्व कार्यालयात हे लिफाफे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते. गतवर्षीही पोस्टाच्या या आकर्षक लिफाफ्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला होता.एका लिफाफ्यात मोठ्या दोन आणि लहान तीन ते चार राख्या राहू शकतील अशा प्रकारे हे आकर्षक, रंगीत आणि वाॅटरप्रूफ लिफाफे मागविण्यात आले होते. टपाल खात्याने तब्बल २१ दिवस आधी हे लिफाफे उपलब्ध करून दिले असल्याने या राख्या पाठविण्यासाठी बहिणींना मुबलक वेळ मिळाला. या राख्यांच्या मेल बॅगेला वेगळे लेबल लावले होते. त्यामुळे वितरण करताना राख्यांच्या बॅगा अधिक सुरक्षितरीत्या पोहोच झाल्या.

गेल्या वर्षी २९९० एवढ्या राख्या रत्नागिरी जिल्ह्यातून रवाना झाल्या होत्या. हे लक्षात घेऊन येथील पोस्ट कार्यालयाने यंदा ३००० विशेष लिफाफ्यांची मागणी केली हाेती. यंदा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, साध्या दोन हजार पाकिटांतूनही नागपूर, सोलापूर, अमरावती, कुडाळ, पुणे, कोल्हापूर, सातारा, मिरज, मुंबई आणि गोवा राज्यातही राख्या पाठविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्येही तब्बल सात हजार राख्या पोस्टाच्या माध्यमातून पाठविण्यात आल्या आहेत. यंदाही पोस्टाने बहिणींच्या राख्या वेळेवर पोहोच केल्या आहेत.

पोस्टाची हायटेक सेवा आता सर्वदूरस्वातंत्र्यपूर्व काळापासून सामान्य नागरिकांशी जोडलेली पोस्टाची नाळ अजूनही कायम आहे. आधुनिक काळानुसार पोस्ट विभागही आता हायटेक झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने ग्राहकांना जलद सेवा मिळत आहे. पोस्टाच्या सर्व सेवांना पसंतीही मिळत आहे.

रक्षाबंधनासाठी रत्त्नागिरी जिल्ह्यातून राख्या पाठविणाऱ्या भगिनींची संख्या जास्त आहे, हे लक्षात घेऊन यंदाही आकर्षक, रंगीत आणि वाॅटरप्रूफ लिफाफे मागविले हाेते. मात्र, या लिफाफ्यांबरोबरच साध्या लिफाफ्यातून मिळून बारा हजार राख्या महाराष्ट्रासह गोवा आणि अन्य राज्यांत पोहोचल्या आहेत. - नंदकुमार कुरळपकर, डाकघर अधीक्षक, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPost Officeपोस्ट ऑफिसRaksha Bandhanरक्षाबंधन