शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पोस्टातून १२ हजार भाऊरायांपर्यंत पाेहोचल्या राख्या; महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही रत्नागिरीतून रवाना

By शोभना कांबळे | Updated: August 30, 2023 17:07 IST

शाेभना कांबळे रत्नागिरी : भाऊ-बहिणीचे नाते अधिक दृढ करणाऱ्या, त्यांच्या नात्यातील गोडवा अधिक वाढविणाऱ्या, आवडत्या रक्षाबंधन सणासाठी जिल्ह्यातील बहिणींनी ...

शाेभना कांबळेरत्नागिरी : भाऊ-बहिणीचे नाते अधिक दृढ करणाऱ्या, त्यांच्या नात्यातील गोडवा अधिक वाढविणाऱ्या, आवडत्या रक्षाबंधन सणासाठी जिल्ह्यातील बहिणींनी रत्नागिरी टपाल कार्यालयावर विश्वास टाकत तब्बल आपल्या १२ हजार भाऊरायांपर्यंत राख्या पोहोच केल्या आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यांमध्ये पोस्टाच्या आकर्षक, रंगीत आणि वाॅटरप्रूफ लिफाफ्यामधून या राख्या पाठविण्यात आल्या आहेत.रत्नागिरी विभागाने जिल्ह्यासाठी ३ हजार विशेष अशा आकर्षक, रंगीत आणि वाॅटरप्रूफ लिफाफ्यांची मागणी केली होती. हे आकर्षक, वाॅटरप्रूफ लिफाफे केवळ दहा रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले होते. पोस्टाच्या सर्व कार्यालयात हे लिफाफे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते. गतवर्षीही पोस्टाच्या या आकर्षक लिफाफ्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला होता.एका लिफाफ्यात मोठ्या दोन आणि लहान तीन ते चार राख्या राहू शकतील अशा प्रकारे हे आकर्षक, रंगीत आणि वाॅटरप्रूफ लिफाफे मागविण्यात आले होते. टपाल खात्याने तब्बल २१ दिवस आधी हे लिफाफे उपलब्ध करून दिले असल्याने या राख्या पाठविण्यासाठी बहिणींना मुबलक वेळ मिळाला. या राख्यांच्या मेल बॅगेला वेगळे लेबल लावले होते. त्यामुळे वितरण करताना राख्यांच्या बॅगा अधिक सुरक्षितरीत्या पोहोच झाल्या.

गेल्या वर्षी २९९० एवढ्या राख्या रत्नागिरी जिल्ह्यातून रवाना झाल्या होत्या. हे लक्षात घेऊन येथील पोस्ट कार्यालयाने यंदा ३००० विशेष लिफाफ्यांची मागणी केली हाेती. यंदा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, साध्या दोन हजार पाकिटांतूनही नागपूर, सोलापूर, अमरावती, कुडाळ, पुणे, कोल्हापूर, सातारा, मिरज, मुंबई आणि गोवा राज्यातही राख्या पाठविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्येही तब्बल सात हजार राख्या पोस्टाच्या माध्यमातून पाठविण्यात आल्या आहेत. यंदाही पोस्टाने बहिणींच्या राख्या वेळेवर पोहोच केल्या आहेत.

पोस्टाची हायटेक सेवा आता सर्वदूरस्वातंत्र्यपूर्व काळापासून सामान्य नागरिकांशी जोडलेली पोस्टाची नाळ अजूनही कायम आहे. आधुनिक काळानुसार पोस्ट विभागही आता हायटेक झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने ग्राहकांना जलद सेवा मिळत आहे. पोस्टाच्या सर्व सेवांना पसंतीही मिळत आहे.

रक्षाबंधनासाठी रत्त्नागिरी जिल्ह्यातून राख्या पाठविणाऱ्या भगिनींची संख्या जास्त आहे, हे लक्षात घेऊन यंदाही आकर्षक, रंगीत आणि वाॅटरप्रूफ लिफाफे मागविले हाेते. मात्र, या लिफाफ्यांबरोबरच साध्या लिफाफ्यातून मिळून बारा हजार राख्या महाराष्ट्रासह गोवा आणि अन्य राज्यांत पोहोचल्या आहेत. - नंदकुमार कुरळपकर, डाकघर अधीक्षक, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPost Officeपोस्ट ऑफिसRaksha Bandhanरक्षाबंधन