शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरच्या शाही पराठयाचा डंका महाराष्ट्रासह गुजराथ, कर्नाटक आणि गोव्यातही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 11:15 IST

राजापूर तालुक्यातील डोंगर येथील साखरकर बंधूंची बेकरी व्यवसाय ते शाही पराठा उद्योगात यशस्वी वाटचाल

विनोद पवार 

राजापूर : कोणताही व्यवसाय असो तो करण्याची जिद्द, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा व सचोटीची जोड मिळाली तर तो यशस्वी होऊ शकतो, हे राजापूर तालुक्यातील डोंगर येथील साखरकर बंधूंच्या बेकरी व्यवसाय ते शाही पराठा उद्योगाच्या यशस्वी वाटचालीकडे पाहिल्यावर लक्षात येते.शाही पराठयाच्या माध्यमातुन मैदा, गहू, मेथी असे तीन प्रकारचे पराठा तसेच पुरी आणि पुरणपोळीच्या उत्पादनातुन साखरकर बंधूंनी राजापूरचे आणि डोंगर गावचे नाव संपुर्ण महाराष्ट्राबरोबरच गुजराथ, कर्नाटक आणि गोव्या पर्यंत पोहचविले आहे. त्यामुळे साखरकरांच्या शाही पराठयाचा डंका महाराष्ट्राबाहेरा बाहेरही होत आहे.तर साखरकरांच्या या पराठयाची भुरळ परदेशात राहणाऱ्यांनाही पडली असून अनेक जण जिथे मिळेल तेथून हे शाही पराठे, पुरी आणि पुरणपोळी परदेशात घेऊन जात आहेत. त्यामुळे साखरकरांच्या शाही पराठयाने सातासमुद्रापार धडक दिली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता लवकरच साखरकर बंधू या शाही पराठयाच्या माध्यमातुन मलबार लच्चा पराठयाचे उत्पादन करणार आहेत. त्यामुळे साखरकरांच्या शाही पराठयाची चव चाखणाऱ्यांना आता या नव्या मलबार लच्चा पराठयाची चव चाखता येणार आहे.साखरकर बंधुंच्या या शाही पराठयाच्या उत्पादनामुळे राजापूरची आणखी एक नवी ओळख उद्योग व्यवसायत निर्माण होत आहे. या व्यवसायाच्या माध्यमातुन साखरकर यांनी डोंगर, गोवळ, विल्ये भागातील ३० महिलांसह दोन पुरूष अशा ३२ जणांना प्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध करून दिला असून दररोज सुमारे अडीच टन इतके या वस्तुंचे उत्पादन होत आहे. आता साखरकरांची तिसरी पीढीही या व्यवसाय काम करत असून साखरकर परिवाराचे सिराज साखरकर व शरफुद्दीन साखरकर या दोन बंधूंबरोबर सिराज साखरकर यांचे सुपुत्र नवीन साखरकर हे या व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत. १९९८-९९ साली बेकरी उत्पादनाला सुरूवात डोंगर गावचे साखरकर कुटुंबीय हे एक हे एक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे कुटुंबीय आहे. सन १९९८-९९ साली साखरकर यांनी साखरकर बेकर्स या नावाने बेकरी उत्पादनाला सुरूवात केली. मात्र राजापूर शहर आणि तालुका परिसरात वेगळं काहीतरी करण्याची जिद्द असलेल्या आणि ध्यास घेतलेल्या साखरकर बंधूंनी दहा वर्षापुर्वी बेकरी व्यवसायातुन या पराठा व्यवसायात पदार्पण केले.परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध या व्यवसायाच्या माध्यमातुन साखरकर यांनी या परिसरातील ३० महिला व दोन पुरूष अशा ३२ जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अगदी यंत्राद्वारे पिठ मळण्यापासून ते पॅकिंग आणि आर्डर पाठविण्यापर्यंत सर्व कामे या महिला करत आहेत. कोरोना काळात लॉकडाऊमध्येही चांगल्या प्रकारे उत्पादन व विक्री सुरू होती. ग्रामीण भागातील गरजू महिलांना या व्यवसायाच्या माध्यमातुन आर्थिक शक्ती मिळाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी