शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

राजापूरच्या शाही पराठयाचा डंका महाराष्ट्रासह गुजराथ, कर्नाटक आणि गोव्यातही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 11:15 IST

राजापूर तालुक्यातील डोंगर येथील साखरकर बंधूंची बेकरी व्यवसाय ते शाही पराठा उद्योगात यशस्वी वाटचाल

विनोद पवार 

राजापूर : कोणताही व्यवसाय असो तो करण्याची जिद्द, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा व सचोटीची जोड मिळाली तर तो यशस्वी होऊ शकतो, हे राजापूर तालुक्यातील डोंगर येथील साखरकर बंधूंच्या बेकरी व्यवसाय ते शाही पराठा उद्योगाच्या यशस्वी वाटचालीकडे पाहिल्यावर लक्षात येते.शाही पराठयाच्या माध्यमातुन मैदा, गहू, मेथी असे तीन प्रकारचे पराठा तसेच पुरी आणि पुरणपोळीच्या उत्पादनातुन साखरकर बंधूंनी राजापूरचे आणि डोंगर गावचे नाव संपुर्ण महाराष्ट्राबरोबरच गुजराथ, कर्नाटक आणि गोव्या पर्यंत पोहचविले आहे. त्यामुळे साखरकरांच्या शाही पराठयाचा डंका महाराष्ट्राबाहेरा बाहेरही होत आहे.तर साखरकरांच्या या पराठयाची भुरळ परदेशात राहणाऱ्यांनाही पडली असून अनेक जण जिथे मिळेल तेथून हे शाही पराठे, पुरी आणि पुरणपोळी परदेशात घेऊन जात आहेत. त्यामुळे साखरकरांच्या शाही पराठयाने सातासमुद्रापार धडक दिली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता लवकरच साखरकर बंधू या शाही पराठयाच्या माध्यमातुन मलबार लच्चा पराठयाचे उत्पादन करणार आहेत. त्यामुळे साखरकरांच्या शाही पराठयाची चव चाखणाऱ्यांना आता या नव्या मलबार लच्चा पराठयाची चव चाखता येणार आहे.साखरकर बंधुंच्या या शाही पराठयाच्या उत्पादनामुळे राजापूरची आणखी एक नवी ओळख उद्योग व्यवसायत निर्माण होत आहे. या व्यवसायाच्या माध्यमातुन साखरकर यांनी डोंगर, गोवळ, विल्ये भागातील ३० महिलांसह दोन पुरूष अशा ३२ जणांना प्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध करून दिला असून दररोज सुमारे अडीच टन इतके या वस्तुंचे उत्पादन होत आहे. आता साखरकरांची तिसरी पीढीही या व्यवसाय काम करत असून साखरकर परिवाराचे सिराज साखरकर व शरफुद्दीन साखरकर या दोन बंधूंबरोबर सिराज साखरकर यांचे सुपुत्र नवीन साखरकर हे या व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत. १९९८-९९ साली बेकरी उत्पादनाला सुरूवात डोंगर गावचे साखरकर कुटुंबीय हे एक हे एक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे कुटुंबीय आहे. सन १९९८-९९ साली साखरकर यांनी साखरकर बेकर्स या नावाने बेकरी उत्पादनाला सुरूवात केली. मात्र राजापूर शहर आणि तालुका परिसरात वेगळं काहीतरी करण्याची जिद्द असलेल्या आणि ध्यास घेतलेल्या साखरकर बंधूंनी दहा वर्षापुर्वी बेकरी व्यवसायातुन या पराठा व्यवसायात पदार्पण केले.परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध या व्यवसायाच्या माध्यमातुन साखरकर यांनी या परिसरातील ३० महिला व दोन पुरूष अशा ३२ जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अगदी यंत्राद्वारे पिठ मळण्यापासून ते पॅकिंग आणि आर्डर पाठविण्यापर्यंत सर्व कामे या महिला करत आहेत. कोरोना काळात लॉकडाऊमध्येही चांगल्या प्रकारे उत्पादन व विक्री सुरू होती. ग्रामीण भागातील गरजू महिलांना या व्यवसायाच्या माध्यमातुन आर्थिक शक्ती मिळाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी