शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

राजापूर शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 4:24 PM

rajapur, shiv sena, ratnagiri, politics मागील काही दिवस राजापूर तालुका शिवसेनेअंतर्गत खदखदत असलेल्या संघर्षाला अखेर तोंड फुटले आहे. तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी सभापतींसह प्रशासनाला अंधारात ठेवून भू येथील पशुवैद्यकीय इमारतीच्या वास्तूचे उद्घाटन परस्पर केल्याचा घणाघाती आरोप पंचायत समितीचे प्रभारी सभापती प्रकाश गुरव यांनी केला आहे.

ठळक मुद्देराजापूर शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

राजापूर : मागील काही दिवस राजापूर तालुका शिवसेनेअंतर्गत खदखदत असलेल्या संघर्षाला अखेर तोंड फुटले आहे. तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी सभापतींसह प्रशासनाला अंधारात ठेवून भू येथील पशुवैद्यकीय इमारतीच्या वास्तूचे उद्घाटन परस्पर केल्याचा घणाघाती आरोप पंचायत समितीचे प्रभारी सभापती प्रकाश गुरव यांनी केला आहे.अनेक वर्षे तालुकाप्रमुख पदी असलेल्या कुवळेकर यांनी पक्षवाढीसाठी काहीच केले नाही. ते तालुकाप्रमुख नाहीत तर तालुका संघटनेला कायमचे बसणारे कुलूप असून, कुवळेकर यांना पदावरून तत्काळ दूर करावे व नवीन तालुकाप्रमुख नियुक्त व्हावा, यासाठी आपण पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे प्रभारी सभापती प्रकाश गुरव यांनी पत्रकारांना सांगितले.गेल्या काही दिवसांपासून राजापूर तालुका शिवसेनेंतर्गत कमालीचा संघर्ष खदखदत असून, पक्षाच्या काही बैठकांदरम्यान जोरदार वादावादी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. संघटनेंतर्गत सरळसरळ गट एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र दिसत आहे.नुकताच भू येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या उद्घाटनावरून सेनेतील वाद चव्हाट्यावर आला. राजापूरचे प्रभारी सभापती प्रकाश गुरव यांच्यासह प्रशासनालाच अंधारात ठेवून कुवळेकर यांनी दवाखान्याचे उद्घाटन परस्पर केल्याने गुरव संतापले आहेत. राज्य घटनेने दिलेल्या अधिकारानुसार पंचायत समितीमधील विकासकामांची भूमिपूजने किंवा उद्घाटनांचे अधिकार सभापती व प्रशासनाचे असताना तालुकाप्रमुखांनी हे उद्घाटन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.हस्तक्षेप करू देणार नाहीनुकत्याच झालेल्या सभापती व उपसभापती निवड प्रक्रियेवरून झालेल्या वादालाही तालुकाप्रमुखच कारणीभूत होते. आपल्याला प्रभारी सभापतीपद मिळू नये, यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. आपण पंचायत समितीत असेपर्यंत तालुकाप्रमुख कुवळेकर यांना पंचायत समितीच्या कामात अजिबात हस्तक्षेप करू देणार नाही, असा इशारा प्रभारी सभापती गुरव यांनी दिला आहे.तालुकाप्रमुख बदलामागील दहा वर्षे प्रकाश कुवळेकर यांनी शिवसेनेच्या वाढीसाठी काहीच केले नाही. उलट पक्षातील गटबाजी अधिक कशी वाढेल, यासाठीच प्रयत्न केल्याचा आरोप प्रभारी सभापती गुरव यांनी केला. आता तालुकाप्रमुख बदलणे गरजेचे असून, तेथे सक्षम व्यक्तीची निवड केली जावी, यासाठी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी