शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची उसंत, जगबुडी नदी इशारा पातळीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 14:32 IST

गेले दाेन दिवस खेड तालुक्यातील जगबुडी व राजापूर तालुक्यातील कोदवली या दोन्ही नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या वर हाेते.

रत्नागिरी : गेला आठवडाभर संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर रविवारपासूनच कमी झाला आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. राजापूर तालुक्यातील काेदवली नदीचेही पाणी इशारा पातळीच्या खाली आले आहे. मात्र, खेड तालुक्यातील जगबुडी नदीचे पाणी अजूनही इशारा पातळीच्या वर आहे. या नदीची पाणी पातळी ६.२५ मीटर इतकी आहे.जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८:३० वाजता सरासरी ५२.६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात दि. २७ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट घोषित केले असून, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, सोमवारी सकाळी कडकडीत ऊन पडले हाेते. दुपारनंतर सरीवर काेसळणाऱ्या पावसाने सायंकाळी ४ वाजल्यानंतर पुन्हा काेसळण्यास सुरुवात केली. गेले दाेन दिवस खेड तालुक्यातील जगबुडी व राजापूर तालुक्यातील कोदवली या दोन्ही नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या वर हाेते.मात्र, दुपारी काेदवली नदीचे पाणी इशारा पातळीच्या खाली आले. मात्र, जगबुडी नदीचे पाणी इशारा पातळीच्या वर हाेते. तसेच वाशिष्ठी (चिपळूण), शास्त्री, सोनवी (संगमेश्वर), काजळी, मुचकुंदी (लांजा), बावनदी या सर्व नद्यांची पाण्याची पातळी वाढली आहे. मात्र, नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. कोयना धरण भरले असून कोळकेवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.दरम्यान, रायगड येथील दुर्घटनेनंतर चिपळूण तालुक्यातील सवतसडा आणि अडरे धरणाच्या परिसरात निसर्गप्रेमींना बंदी घालण्यात आली आहे. ६ ऑगस्टपर्यंतही बंदी असणार आहे. याविषयी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले असून, सोमवारी त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसfloodपूर