शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची उसंत, जगबुडी नदी इशारा पातळीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 14:32 IST

गेले दाेन दिवस खेड तालुक्यातील जगबुडी व राजापूर तालुक्यातील कोदवली या दोन्ही नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या वर हाेते.

रत्नागिरी : गेला आठवडाभर संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर रविवारपासूनच कमी झाला आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. राजापूर तालुक्यातील काेदवली नदीचेही पाणी इशारा पातळीच्या खाली आले आहे. मात्र, खेड तालुक्यातील जगबुडी नदीचे पाणी अजूनही इशारा पातळीच्या वर आहे. या नदीची पाणी पातळी ६.२५ मीटर इतकी आहे.जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८:३० वाजता सरासरी ५२.६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात दि. २७ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट घोषित केले असून, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, सोमवारी सकाळी कडकडीत ऊन पडले हाेते. दुपारनंतर सरीवर काेसळणाऱ्या पावसाने सायंकाळी ४ वाजल्यानंतर पुन्हा काेसळण्यास सुरुवात केली. गेले दाेन दिवस खेड तालुक्यातील जगबुडी व राजापूर तालुक्यातील कोदवली या दोन्ही नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या वर हाेते.मात्र, दुपारी काेदवली नदीचे पाणी इशारा पातळीच्या खाली आले. मात्र, जगबुडी नदीचे पाणी इशारा पातळीच्या वर हाेते. तसेच वाशिष्ठी (चिपळूण), शास्त्री, सोनवी (संगमेश्वर), काजळी, मुचकुंदी (लांजा), बावनदी या सर्व नद्यांची पाण्याची पातळी वाढली आहे. मात्र, नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. कोयना धरण भरले असून कोळकेवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.दरम्यान, रायगड येथील दुर्घटनेनंतर चिपळूण तालुक्यातील सवतसडा आणि अडरे धरणाच्या परिसरात निसर्गप्रेमींना बंदी घालण्यात आली आहे. ६ ऑगस्टपर्यंतही बंदी असणार आहे. याविषयी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले असून, सोमवारी त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसfloodपूर