शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची उसंत, जगबुडी नदी इशारा पातळीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 14:32 IST

गेले दाेन दिवस खेड तालुक्यातील जगबुडी व राजापूर तालुक्यातील कोदवली या दोन्ही नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या वर हाेते.

रत्नागिरी : गेला आठवडाभर संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर रविवारपासूनच कमी झाला आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. राजापूर तालुक्यातील काेदवली नदीचेही पाणी इशारा पातळीच्या खाली आले आहे. मात्र, खेड तालुक्यातील जगबुडी नदीचे पाणी अजूनही इशारा पातळीच्या वर आहे. या नदीची पाणी पातळी ६.२५ मीटर इतकी आहे.जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८:३० वाजता सरासरी ५२.६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात दि. २७ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट घोषित केले असून, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, सोमवारी सकाळी कडकडीत ऊन पडले हाेते. दुपारनंतर सरीवर काेसळणाऱ्या पावसाने सायंकाळी ४ वाजल्यानंतर पुन्हा काेसळण्यास सुरुवात केली. गेले दाेन दिवस खेड तालुक्यातील जगबुडी व राजापूर तालुक्यातील कोदवली या दोन्ही नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या वर हाेते.मात्र, दुपारी काेदवली नदीचे पाणी इशारा पातळीच्या खाली आले. मात्र, जगबुडी नदीचे पाणी इशारा पातळीच्या वर हाेते. तसेच वाशिष्ठी (चिपळूण), शास्त्री, सोनवी (संगमेश्वर), काजळी, मुचकुंदी (लांजा), बावनदी या सर्व नद्यांची पाण्याची पातळी वाढली आहे. मात्र, नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. कोयना धरण भरले असून कोळकेवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.दरम्यान, रायगड येथील दुर्घटनेनंतर चिपळूण तालुक्यातील सवतसडा आणि अडरे धरणाच्या परिसरात निसर्गप्रेमींना बंदी घालण्यात आली आहे. ६ ऑगस्टपर्यंतही बंदी असणार आहे. याविषयी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले असून, सोमवारी त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसfloodपूर