शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

राजापूर किनारपट्टीवर वाऱ्यासह पाऊस, कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 13:39 IST

जिल्ह्यासाठी दाेन एनडीआरएफची टीमही तैनात ठेवण्यात आली आहे.  जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे.  साखरपा, राजापूर या भागात झाडे काेसळून पडली आहेत.

रत्नागिरी : जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील समुद्रकिनारपट्टीवर वारे वाहू लागले आहेत़  वाऱ्याचा वेग कमी असला तरी पावसाची संततधार जाेरात आहे. किनारपट्टीतील आंबाेळगड, मुसाकाझी, आवळीचीवाडी या भागातील कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. काेकण किनारपट्टीवर रविवारी ताेक्ते वादळ धडकणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे.

जिल्ह्यासाठी दाेन एनडीआरएफची टीमही तैनात ठेवण्यात आली आहे.  जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे.  साखरपा, राजापूर या भागात झाडे काेसळून पडली आहेत. सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवर ताेक्ते वादळामुळे माेठ्या लाटा उसळल्या हाेत्या. त्याचवेळी रत्नागिरी जिल्ह्यात कमी वेगाने वारे वाहू लागले हाेते. मात्र, पावसाची संततधार सुरूच हाेती. दुपारी १२़ २० च्या दरम्याने हे वादळ राजापूरच्या दिशेने सरकले आणि किनारपट्टीवर वारे वाहू लागले.

राजापूर तालुक्यातील सागवे, नाटे, जैतापूर, आंबाेळगड, मुसाकाझी या भागात वाऱ्यासह पाऊस काेसळत हाेता़ वादळाच्या पार्श्वभूमीवर आंबाेळगड येथील ६८ कुटुंबातील २५४ व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.  त्याचबराेबर मुसाकाझी येथील दाेन कुटुंब, आवळीचीवाडी येथील ७ कुटुंबातील ३५ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. नाटे आणि परिसरातही वारे वाहू लागले असून, पावसानेही हजेरी लावली आहे.  जैतापूर परिसरात वाऱ्यामुळे घरांची पडझडही झाली आहे़  तसेच राजापूर - डाेंगर मार्गावर झाड काेसळून वाहतूक ठप्प झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcycloneचक्रीवादळ