शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

राजापूर किनारपट्टीवर वाऱ्यासह पाऊस, कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 13:39 IST

जिल्ह्यासाठी दाेन एनडीआरएफची टीमही तैनात ठेवण्यात आली आहे.  जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे.  साखरपा, राजापूर या भागात झाडे काेसळून पडली आहेत.

रत्नागिरी : जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील समुद्रकिनारपट्टीवर वारे वाहू लागले आहेत़  वाऱ्याचा वेग कमी असला तरी पावसाची संततधार जाेरात आहे. किनारपट्टीतील आंबाेळगड, मुसाकाझी, आवळीचीवाडी या भागातील कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. काेकण किनारपट्टीवर रविवारी ताेक्ते वादळ धडकणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे.

जिल्ह्यासाठी दाेन एनडीआरएफची टीमही तैनात ठेवण्यात आली आहे.  जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे.  साखरपा, राजापूर या भागात झाडे काेसळून पडली आहेत. सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवर ताेक्ते वादळामुळे माेठ्या लाटा उसळल्या हाेत्या. त्याचवेळी रत्नागिरी जिल्ह्यात कमी वेगाने वारे वाहू लागले हाेते. मात्र, पावसाची संततधार सुरूच हाेती. दुपारी १२़ २० च्या दरम्याने हे वादळ राजापूरच्या दिशेने सरकले आणि किनारपट्टीवर वारे वाहू लागले.

राजापूर तालुक्यातील सागवे, नाटे, जैतापूर, आंबाेळगड, मुसाकाझी या भागात वाऱ्यासह पाऊस काेसळत हाेता़ वादळाच्या पार्श्वभूमीवर आंबाेळगड येथील ६८ कुटुंबातील २५४ व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.  त्याचबराेबर मुसाकाझी येथील दाेन कुटुंब, आवळीचीवाडी येथील ७ कुटुंबातील ३५ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. नाटे आणि परिसरातही वारे वाहू लागले असून, पावसानेही हजेरी लावली आहे.  जैतापूर परिसरात वाऱ्यामुळे घरांची पडझडही झाली आहे़  तसेच राजापूर - डाेंगर मार्गावर झाड काेसळून वाहतूक ठप्प झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcycloneचक्रीवादळ