शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
4
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
5
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
6
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
7
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
8
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
9
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
10
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
11
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
12
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
13
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
14
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
15
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
16
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
17
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
18
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
19
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
20
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

दिलासा! पावसाच्या सरींनी रत्नागिरीकर चिंब, येत्या तीन दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

By शोभना कांबळे | Updated: September 8, 2023 13:18 IST

यंदा जुलैचा दुसरा पंधरवडा वगळता पावसाने निराशाच केली

रत्नागिरी : ऑगस्ट महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी (८ सप्टेंबर) सकाळपासून पुन्हा काेसळण्यास सुरूवात केली. पावसाच्या संततधारेने रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, येत्या तीन दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या चिंतेने ग्रासलेल्या नागरिकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.यंदा जुलैचा दुसरा पंधरवडा वगळता पावसाने निराशाच केली आहे. यंदा जून, जुलै महिन्याचे पहिले पंधरा दिवस आणि ऑगस्टमध्ये फारसा पाऊस पडलेला नाही. गेल्या वर्षीही साधारण ३ हजार मिलिमीटर सरासरी एवढा वार्षिक पाऊस पडला हाेता. गेल्यावर्षी जून महिन्याच्या सुरूवातीच्या काळात तसेच ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगली मदत केली होती.यंदा जूनच्या शेवटी मान्सूनचे आगमन झाले. मात्र, जुलै महिन्याचे १६ - १७ दिवस पावसाची पाठच होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यातही फारसा पाऊस पडला नाही. त्यामुळे यंदा पाण्याची टंचाई लवकर भासणार असल्याची भीती व्यक्त होत होती. पाऊस गायब झाल्याने उकाड्यालाही सुरूवात होऊ लागल्याने नागरिक हैराण होत होते.परंतु, एक-दोन दिवसांपासून पावसाच्या सरींना अधूनमधून सुरूवात झाली होती. गुरूवारी सकाळीही चांगल्या सरी पडल्या. शुक्रवारी पहाटेपासून पावसाने अधिकच जोर घेतला. दुपारपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. त्यांनतर थोडी विश्रांती घेतली. मात्र, दिवसभर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दिसत होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस