शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले; जगबुडी, वाशिष्ठीसह नद्यांचे पाणी वाढल्याने पुर परिस्थिती 

By शोभना कांबळे | Updated: July 19, 2023 18:07 IST

काही ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर, चिपळूण व खेड तालुक्यांतील शाळांना सुट्टी 

रत्नागिरी : वादळी पावसाने बुधवार सकाळपासून जिल्ह्याला झोडपण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील जगबुडी, गडनदी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून वाशिष्ठी, अर्जुना, नारिंगी नद्या इशारा पातळी ओलांडून वाहत आहेत. त्यामुळे खेड, चिपळूण, राजापूर, संगमेश्वर या शहरांमध्ये पुराचे पाणी भरले. त्यामुळे काही लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. परशुराम घाटातील रस्ता दरड कोसळल्याने वाहतुकीकरीता बंद ठेवण्यात आला असून दरड हटविण्याचे काम सुरू आहे.रत्नागिरी जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस पडण्यास सुरूवात झाली आहे. खेडमधील जगबुडी नदीने बुधवारी धोका पातळी ओलांडून १०.८० मीटरची पातळी गाठली. खेड शहरात अनेक भागात दुपारपर्यंत सुमारे ३ फूट इतके पुराचे पाणी भरले. तेथील दुकानदार यांनी दुकाने बंद करून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत.शहरातील काही भागातील तसेच बोरघर, खारी, खांबतळे येथील काही नागरिकांचे स्थलांतर केले आहे. भोस्तेत जगबुडी नदीचे पाणी आल्याने भोस्ते-अलसुरे वाहतूक बंद आहे. नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे चालू आहे. नारिंगी नदीच्या पुरामुळे दापोली खेड रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. काही ठिकाणी झाडे कोसळणे, रस्त्याला भेगा पडण्याच्या घटना घडल्या आहेत. काही गावांचा संपर्क तुटला आहे. खेड शहरात ५ बोटी तैनात करण्यात आल्या असून अलसुरे येथे 1 बोट तैनात करण्यात आली आहे.चिपळूण तालुक्यातही वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. शहरातील काही ठिकाणी १ फूटापर्यंत पाणी भरलेले आहे. नगरपालिकेच्या बोटी सांस्कृतिक केंद्र, शंकरवाडी, बाजारपेठ विसर्जन घाट, एस. टी. स्टॅंढ, नगरपालिका कार्यालय अशा ५ ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. एनडीआरएफ, नगरपालिका, पोलिस, तलाठी यांची पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. मिरजोळी जुवाड येथील १९ कुटुंबातील ६५ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे

  • कुंभार्ली घाटात दरड कोसळली होती. मात्र, दरड बाजूला करण्यात आली आहे.
  • कोकण रेल्वे मार्गावर कोणतीही समस्या नाही. वाहतूक सुरळीत सुरू आहे.
  • जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी पूरस्थिती लक्षात घेऊन चिपळूण व खेड या दोन्ही तालुक्यांतील शाळांना सुट्टी दिली आहे.
  • मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादुरशेख पुलाजवळून एक गाई व एक म्हैस वशिष्ठी नदीत वाहून गेल्या आहेत.
  • जुना कॉटेज, भेंडी नाका येथिल ट्रान्सफॉर्मर पुरामुळे बंद करून ठेवल्याने विद्युत पुरवठा बंद आहे.
  • संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील मुंबई -गोवा महामार्गावर गडनदीचे पाणी आता धोका पातळीवर आहे. दक्षता म्हणून एक मार्गी वाहतूक सुरू आहे.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसfloodपूर