शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

जिल्ह्यातील १५३० शेतकऱ्यांकडून १७ हजार ७८५ क्विंटल भाताची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:29 IST

रत्नागिरी : रत्नागिरी मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील १५३० शेतकऱ्यांकडून १७ हजार ७८५.४५ क्विंटल भात खरेदी करण्यात आला आहे. ...

रत्नागिरी : रत्नागिरी मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील १५३० शेतकऱ्यांकडून १७ हजार ७८५.४५ क्विंटल भात खरेदी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १५ केंद्रांवर भात खरेदी सुरू असून, प्रतिक्विंटल १८६८ रुपये दर देण्यात येत आहे. यावर्षी २२ हजार क्विंटल धान्य खरेदीचे उद्दिष्ट असून, दि.३१ मार्चपर्यंत अवधी असल्याने उद्दिष्टपूर्ती होण्याची शक्यता आहे.

दी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे शेतकऱ्यांकडून शासन ठरवून देईल, त्या दराने शेतमालाची खरेदी करून पुरवठा समितीकडे वितरित करण्यात येते. या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन २०१३-१४ मध्ये विक्रमी प्रतिसाद लाभला होता. त्यावर्षी २४ हजार ४९८.४६ क्विंंटल भाताची खरेदी झाली होती. यासाठी शासनाने प्रतिक्विंटल १३१० रुपये दर दिला होता. त्यावेळी जिल्ह्यातील १९५९ शेतकऱ्यांनी आपल्याकडील भाताची विक्री केली होती. मात्र, भात गोडावूनमध्ये शिल्लक राहिल्याने पुढील दोन वर्षे भाताची खरेदीच झाली नव्हती.

दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात खरेदी-विक्री संघ आणि विविध कार्यकारी सोसायटी यांच्यातर्फे धान्याची खरेदी करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील १९० शेतकऱ्यांकडून ३९६४ क्विंटल, दापोली येथे ६४ शेतकऱ्यांकडून ६०६ आणि केळशी येथील १९८ शेतकऱ्यांकडून १११४.८०, गुहागर येथील १८७ शेतकऱ्यांकडून १२१७.६०, रत्नागिरी येथील १५३ शेतकऱ्यांकडून १२७२,४०, संगमेश्वर येथील ११९ शेतकऱ्यांकडून १६००.४०, लांजा येथील २२ शेतकऱ्यांकडून १३३.६०, राजापुुरातील ४६ शेतकऱ्यांकडून ४९५.०५, पाचल येथील ३६ शेतकऱ्यांकडून ४७०.६०, चिपळुणातील १५६ शेतकऱ्यांकडून २५४८.४०, मिरवण येथील १०४ शेतकऱ्यांकडून १६६७.२० आकलेतील ४० शेतकऱ्यांकडून ४३९.२०, शिरगाव येथील १७८ शेतकऱ्यांकडून १६४८.८०, शिरळ येथील ४१ शेतकऱ्यांकडून ६०८.४० क्विंटल भाताची खरेदी आतापर्यंत करण्यात आली. मार्केटिंग फेडरेशनने यावर्षी २२ हजार क्विंटल धान्य खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले असून, ४ हजार २१४.५५ क्विंटल भात खरेदीची गरज असून, दि. ३१ मार्चपर्यंत पूर्तता होण्याची शक्यता आहे.

..................

यावर्षी भात खरेदीसाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दि. ३१ मार्चपर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे. त्यामुळे उद्दिष्टपूर्तीच्या समीप पोहोचलो आहोत. भात खरेदीनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात येत आहेत. वहाळ वगळता अन्य सर्व केंद्रांवर चांगला प्रतिसाद लाभला आहे.

- पी. जे. चिले, अधिकारी, दी मार्केटिंग फेडरेशन, रत्नागिरी.