शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

दुचाकीचा आरसा केवळ केस विंचरण्यापुरताच, ३६१९ स्वारांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 11:52 IST

TraficPolice Bike Ratnagiri- सुरक्षा आणि अपघात टाळण्यासाठी दुचाकीला आरसा लावणे बंधनकारक आहे. पण स्वारांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिसांनी आतापर्यंत असे आरसे न लावणाऱ्या तब्बल ३,६१९ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

ठळक मुद्देदुचाकीचा आरसा केवळ केस विंचरण्यापुरताच, ३६१९ स्वारांवर दंडात्मक कारवाईदुचाकीला आरसा बंधनकारक, दुचाकीस्वारांना नियमांचा विसर

रत्नागिरी : सुरक्षा आणि अपघात टाळण्यासाठी दुचाकीला आरसा लावणे बंधनकारक आहे. पण स्वारांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिसांनी आतापर्यंत असे आरसे न लावणाऱ्या तब्बल ३,६१९ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.बाजू काढून पुढे जाताना किंवा वळताना सुरक्षिततेसाठी दुचाकींना दोन्ही बाजुला आरसा लावणे परिवहन विभागाकडून सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, त्याकडे बरेच दुचाकीस्वारांचे दुर्लक्ष होत असते. आरसा लावलेला नसल्याने बाजू काढून जाताना किंवा वळताना मागून आलेले वाहन न दिसल्याने दुचाकीवर मागून आलेले वाहन आपटल्याने अनेक गंभीर आजार झाले आहेत. त्यामुळे दुचाकींवर सक्तीने आरसे बसविण्याचा नियम करण्यात आला आहे. परंतु दुचाकीस्वारांना या नियमांचाच विसर पडला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेने धडक कारवाइई राबविली. जानेवारी ते २५ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या या धडक मोहिमेत तब्बल ३९१९ स्वारांच्या दुचाकीला आरसेच नसल्याचे दिसून आल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाहन चालविताना वाहनचालक आणि इतर जनता यांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम करण्यात आले आहेत. मात्र, वाहनचालकांकडून या नियमांची पायमल्ली केली जात आहे. वाहनचालकांनी सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.आरसा नाही म्हणून २०० रुपये दंडवाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे, म्हणून वाहतूक शाखेकडून मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत दुचाकींना आरसे नसलेल्या ३,६१९ स्वारांकडून २०० रूपयांप्रमाणे ७,२३,८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.दुचाकीचालकांना हे बंधनकारकदुचाकी स्वारांसाठी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रवासादरम्यान हेल्मेट सक्तीचे आहे. याचबरोबर प्रदुषणमुक्त प्रमाणपत्र, गाडीचा विमा, आर. सी. बुक तसेच अन्य गाडीची कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे.

वाहतुकीचे नियम हे वाहन चालक आणि नागरिकांंच्या सुरक्षिततेसाठी आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे मार्गांवर अपघात होताना दिसतात. दुचाकीस्वार हेल्मेट, आरसा याचा वापर करीत नसल्यानेही अनेक गंभीर अपघात झाले असून त्यात प्रसंगी दुचाकीस्वारांना प्राण गमवावा लागला आहे. आपल्याच सुरक्षिततेची काळजी या स्वारांनी घेतली तर पोलीसांना कायद्याचा बडगा उगारावा लागणार नाही. त्यामुळे अपघातही कमी होतील.- शिरीष सासने, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसbikeबाईकRatnagiriरत्नागिरी