शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीचा आरसा केवळ केस विंचरण्यापुरताच, ३६१९ स्वारांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 11:52 IST

TraficPolice Bike Ratnagiri- सुरक्षा आणि अपघात टाळण्यासाठी दुचाकीला आरसा लावणे बंधनकारक आहे. पण स्वारांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिसांनी आतापर्यंत असे आरसे न लावणाऱ्या तब्बल ३,६१९ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

ठळक मुद्देदुचाकीचा आरसा केवळ केस विंचरण्यापुरताच, ३६१९ स्वारांवर दंडात्मक कारवाईदुचाकीला आरसा बंधनकारक, दुचाकीस्वारांना नियमांचा विसर

रत्नागिरी : सुरक्षा आणि अपघात टाळण्यासाठी दुचाकीला आरसा लावणे बंधनकारक आहे. पण स्वारांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिसांनी आतापर्यंत असे आरसे न लावणाऱ्या तब्बल ३,६१९ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.बाजू काढून पुढे जाताना किंवा वळताना सुरक्षिततेसाठी दुचाकींना दोन्ही बाजुला आरसा लावणे परिवहन विभागाकडून सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, त्याकडे बरेच दुचाकीस्वारांचे दुर्लक्ष होत असते. आरसा लावलेला नसल्याने बाजू काढून जाताना किंवा वळताना मागून आलेले वाहन न दिसल्याने दुचाकीवर मागून आलेले वाहन आपटल्याने अनेक गंभीर आजार झाले आहेत. त्यामुळे दुचाकींवर सक्तीने आरसे बसविण्याचा नियम करण्यात आला आहे. परंतु दुचाकीस्वारांना या नियमांचाच विसर पडला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेने धडक कारवाइई राबविली. जानेवारी ते २५ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या या धडक मोहिमेत तब्बल ३९१९ स्वारांच्या दुचाकीला आरसेच नसल्याचे दिसून आल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाहन चालविताना वाहनचालक आणि इतर जनता यांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम करण्यात आले आहेत. मात्र, वाहनचालकांकडून या नियमांची पायमल्ली केली जात आहे. वाहनचालकांनी सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.आरसा नाही म्हणून २०० रुपये दंडवाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे, म्हणून वाहतूक शाखेकडून मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत दुचाकींना आरसे नसलेल्या ३,६१९ स्वारांकडून २०० रूपयांप्रमाणे ७,२३,८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.दुचाकीचालकांना हे बंधनकारकदुचाकी स्वारांसाठी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रवासादरम्यान हेल्मेट सक्तीचे आहे. याचबरोबर प्रदुषणमुक्त प्रमाणपत्र, गाडीचा विमा, आर. सी. बुक तसेच अन्य गाडीची कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे.

वाहतुकीचे नियम हे वाहन चालक आणि नागरिकांंच्या सुरक्षिततेसाठी आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे मार्गांवर अपघात होताना दिसतात. दुचाकीस्वार हेल्मेट, आरसा याचा वापर करीत नसल्यानेही अनेक गंभीर अपघात झाले असून त्यात प्रसंगी दुचाकीस्वारांना प्राण गमवावा लागला आहे. आपल्याच सुरक्षिततेची काळजी या स्वारांनी घेतली तर पोलीसांना कायद्याचा बडगा उगारावा लागणार नाही. त्यामुळे अपघातही कमी होतील.- शिरीष सासने, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसbikeबाईकRatnagiriरत्नागिरी