शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

दुचाकीचा आरसा केवळ केस विंचरण्यापुरताच, ३६१९ स्वारांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 11:52 IST

TraficPolice Bike Ratnagiri- सुरक्षा आणि अपघात टाळण्यासाठी दुचाकीला आरसा लावणे बंधनकारक आहे. पण स्वारांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिसांनी आतापर्यंत असे आरसे न लावणाऱ्या तब्बल ३,६१९ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

ठळक मुद्देदुचाकीचा आरसा केवळ केस विंचरण्यापुरताच, ३६१९ स्वारांवर दंडात्मक कारवाईदुचाकीला आरसा बंधनकारक, दुचाकीस्वारांना नियमांचा विसर

रत्नागिरी : सुरक्षा आणि अपघात टाळण्यासाठी दुचाकीला आरसा लावणे बंधनकारक आहे. पण स्वारांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिसांनी आतापर्यंत असे आरसे न लावणाऱ्या तब्बल ३,६१९ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.बाजू काढून पुढे जाताना किंवा वळताना सुरक्षिततेसाठी दुचाकींना दोन्ही बाजुला आरसा लावणे परिवहन विभागाकडून सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, त्याकडे बरेच दुचाकीस्वारांचे दुर्लक्ष होत असते. आरसा लावलेला नसल्याने बाजू काढून जाताना किंवा वळताना मागून आलेले वाहन न दिसल्याने दुचाकीवर मागून आलेले वाहन आपटल्याने अनेक गंभीर आजार झाले आहेत. त्यामुळे दुचाकींवर सक्तीने आरसे बसविण्याचा नियम करण्यात आला आहे. परंतु दुचाकीस्वारांना या नियमांचाच विसर पडला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेने धडक कारवाइई राबविली. जानेवारी ते २५ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या या धडक मोहिमेत तब्बल ३९१९ स्वारांच्या दुचाकीला आरसेच नसल्याचे दिसून आल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाहन चालविताना वाहनचालक आणि इतर जनता यांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम करण्यात आले आहेत. मात्र, वाहनचालकांकडून या नियमांची पायमल्ली केली जात आहे. वाहनचालकांनी सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.आरसा नाही म्हणून २०० रुपये दंडवाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे, म्हणून वाहतूक शाखेकडून मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत दुचाकींना आरसे नसलेल्या ३,६१९ स्वारांकडून २०० रूपयांप्रमाणे ७,२३,८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.दुचाकीचालकांना हे बंधनकारकदुचाकी स्वारांसाठी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रवासादरम्यान हेल्मेट सक्तीचे आहे. याचबरोबर प्रदुषणमुक्त प्रमाणपत्र, गाडीचा विमा, आर. सी. बुक तसेच अन्य गाडीची कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे.

वाहतुकीचे नियम हे वाहन चालक आणि नागरिकांंच्या सुरक्षिततेसाठी आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे मार्गांवर अपघात होताना दिसतात. दुचाकीस्वार हेल्मेट, आरसा याचा वापर करीत नसल्यानेही अनेक गंभीर अपघात झाले असून त्यात प्रसंगी दुचाकीस्वारांना प्राण गमवावा लागला आहे. आपल्याच सुरक्षिततेची काळजी या स्वारांनी घेतली तर पोलीसांना कायद्याचा बडगा उगारावा लागणार नाही. त्यामुळे अपघातही कमी होतील.- शिरीष सासने, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसbikeबाईकRatnagiriरत्नागिरी