शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीवर दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
6
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
7
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
8
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
9
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
10
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
11
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
12
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
13
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
14
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
15
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
16
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
17
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
18
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
19
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
20
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू

चिपळुणात घरपट्टी वसुलीचा उच्चांक

By admin | Updated: March 26, 2015 00:13 IST

पंचायत समिती : मार्चअखेरपर्यंत ९२ टक्क्यांपर्यंत होणार काम

चिपळूण : तालुक्यातील १३० ग्रामपंचायतीकडून वसूल होणारी घरपट्टी व पाणीपट्टी करवसुली यावर्षी समाधानकारक झालेली असून मार्चअखेरपर्यंत ती ९२ टक्क्यांहून अधिक होईल, अशी माहिती पंचायत समितीतर्फे देण्यात आली आहे. दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च दरम्यान तालुक्यातील ग्रामपंचायतीकडून करवसुली केली जाते. तालुक्यातील एकूण १३० ग्रामपंचायतीकडून घरपट्टीपोटी २ कोटी ९० लाख २५ हजार ८०२ रुपये इतक्या करवसुलीचे उद्दिष्ट आहे. यावर्षी फेब्रुवारीअखेरपर्यंत २ कोटी ६१ लाख २३ हजार २२२ रुपये इतकी वसुल झाली आहे तर २९ लाख २ हजार ५८० रुपये वसुली बाकी आहे. पाणीपट्टी वसुलीपोटी २ कोटी १२ लाख ७५ हजार ३४२ रुपये येणे अपेक्षित असताना त्यापैकी १ कोटी ५१ लाख ५ हजार ४९३ रुपये वसुली झाली आहे. अजूनही ३६ लाख १६ हजार ८०८ रुपये इतकी शिल्लक रक्कम आहे. चिपळुणात यापूर्वी कळवंडेसह काही ग्रामपंचायती या दरवर्षी १ एप्रिलला संपूर्ण वर्षाची घरपट्टी भरणा करणारा उपक्रम राबवत आलेल्या आहेत. ठरलेल्या वेळी ग्रामस्थ करांचा भरणा करत नाहीत. असे असताना अलिकडच्या काळापासून या करवसुलीत तालुक्याने चांगली प्रगती केली आहे. मागील वर्षी घरपट्टी ९३ टक्के तर पाणीपट्टी ८० टक्के वसूल झाली होती. यावर्षी वसुलीचे प्रमाण सारखे असून ३१ मार्चपूर्वी गतवर्षीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. घरपट्टीची वसुली चांगली होत असताना पाणीपट्टीची वसुली रोडवली आहे. पाणी वेळेवर तसेच पुरेसे मिळत नाही, अशा अनेक तक्रारी सांगत अनेक ग्रामस्थ पाणीपट्टीची आपली ठरलेली रक्कम भरणा करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे पाणीपट्टी वसुली करण्यात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती मागे पडताना दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)घरपट्टीउद्दिष्ट२ कोटी ९० लाख २५ हजार ८०२ रुपये वसुली२ कोटी ६१ लाख २३ हजार २२२ रुपयेपाणीपट्टीउद्दिष्ट२ कोटी १२ लाख ७५ हजार ३४२ रुपये वसुली१ कोटी ५१ लाख ५ हजार ४९३ रुपये