शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

कोकण रेल्वे मार्गावरील सौंदळ ‘व्हॉल्ट स्टेशन’चे आश्वासन हवेतच विरले!; राजापुरातील पूर्व परिसरासाठी उपयुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 19:05 IST

खराब बनलेला रस्ता आणि अन्य समस्या अधिकच बिकट

राजापूर : कोकण रेल्वे मार्गावरील  सौंदळ येथील व्हॉल्ट स्थानकाचे (थांबा) क्रॉसिंग स्थानकात रूपांतर करण्याबाबतचे आश्वासन कोकण रेल्वे  प्रशासनाने  देऊन दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्यापही काेणतीच हालचाल न झाल्याने त्या आश्वासनाचे काय झाले, असा प्रश्न केला जात आहे. दरम्यान, सौंदळ येथील व्हॉल्ट स्थानकात सार्वजनिक स्वच्छतागृहासह खराब बनलेला रस्ता आणि अन्य समस्या अधिकच बिकट बनत चालल्या आहेत.कोकण रेल्वे मार्गावर सौंदळ येथे थांबा मिळावा, अशी सातत्याने मागणी तालुक्याच्या पूर्व परिसरातून होत होती. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सौंदळ हॉल्टला मान्यता दिली होती. वर्षभरातच सौंदळ व्हॉल्टचे काम मार्गी लागून त्याचे उद्घाटन प्रभूंच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर गेल्या तीन वर्षांत येथे दोन पॅसेंजर थांबत होत्या. कोरोनाच्या काळात दोन्ही पॅसेंजर बंद होत्या. त्यापैकी एक असलेली सावंतवाडी-दिवा ही पॅसेंजर कोरोना संपताच पूर्ववत सुरू झाली.तिला एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला. तथापि, दुसरी पॅसेंजर अद्याप सुरू झालेली नाही. व्हॉल्ट स्थानक असलेल्या सौंदळचे कायमस्वरूपी स्थानकात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी गेली काही वर्षे सातत्याने सुरू आहे. मात्र, ही मागणी अद्यापही कागदावरच राहिली आहे. राजापूर तालुक्यातील बहुसंख्य परिसरासह लगतच्या  कोल्हापूर जिल्ह्यातील अणुस्करा परिसरातील प्रवाशांना सौंदळ येथील व्हॉल्ट स्थानकाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणारा आहे.भविष्यात सौंदळ येथे अद्ययावत स्थानकाची उभारणी झाल्यास तालुक्याच्या पूर्व परिसरातील प्रवाशांना साेयीचे ठरेल. सध्या या स्थानकात स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून, स्थानकाकडे जाण्यासाठी चांगला रस्ताही नाही. स्थानकात अन्य सुविधा नसल्याने प्रवाशांची गैरसाेय हाेत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वेRajapurराजापुर